स्वामी कृपेने मिळाली नोकरी

समर्थ कृपा - विलास खानोलकर


श्री स्वामी समर्थांकडून नोकरी लागण्याचा मुळेकरांना आशीर्वाद मिळाला होता. मुळेकर हे गाणगापुरास निघाले होते; परंतु पैसे कमी होते म्हणून पैशांअभावी श्री स्वामींच्या दर्शनास जाताना त्यांनी नारळ न घेता एक पैशाच्या खारका घेतल्या. श्री स्वामी समर्थांपुढे खारका ठेवून त्यांना नमस्कार केला. तेच महाराज म्हणाले की, ‘जा नारळ घेऊन ये. मुळेकरांनी चार आण्याचा नारळ आणला. श्री स्वामींपुढे ठेवून दर्शन घेतले. त्यामुळे गाणगापूरला जाण्याच्या प्रवासात चार आणे कमी पडू लागले. पण त्यास गाणगापूरच्या प्रवासात महाराजांनी चार आण्याच्या दुप्पट आठ आणे दिले. पैशाची तूट भरून निघाली. गाणगापूरची यात्रा करून ते घरी आले. श्री स्वामींनी सांगितल्याप्रमाणे मामलेदार झाले.


पोलिटिकल एजंट साहेबाच्या कचेरीत नोकरी, अव्वल कारकून, मामलेदार - फर्स्टक्लास मामलेदार झाले. श्री स्वामी समर्थ हे भक्तवत्सल तर आहेतच, पण आपल्याकडे येणाऱ्या भक्तांची पुरेपूर काळजी घेणारेही आहेत. गाणगापूरला दत्तप्रभूच्या दर्शनास जाण्यासाठी मुळेकरांस पैशाची गरज होती. म्हणूनच श्री स्वामी महाराजांपुढे नारळ ठेवण्याऐवजी खारका ठेवण्याचे मुळेकरांच्या मनात आले.


श्री स्वामीविषयी त्यांच्या मनात प्रेमभाव होताच, परंतु प्रवासात पैसे कमी पडतील, या चिंतेपोटीच त्यांनी श्री स्वामींपुढे नारळाऐवजी खारका ठेवल्या. श्री स्वामींकडून या गोष्टीकडे कसे दुर्लक्ष होईल? म्हणून ते मुळेकरांना लगेच म्हणाले, ‘जा नारळ घेऊन ये.’ नारळाविषयी स्वामींच्या मनात दुर्लक्ष कसे होईल, याचे परम आश्चर्य मुळेकरांस वाटले. येथेही महाराज ‘जा’ असे अगदी सहज म्हणाले. यातूनही त्यांना मुळेकरांस हेच सांगावयाचे होते की, पुढील प्रवासाची काळजी का करतोस? निःशंक रहावे महाराजांच्या या वचनाची प्रचिती चार आण्याऐवजी आठ आणे मिळून आनंद झाला. मुळेकरांना श्री स्वामी समर्थांनी त्यास पक्की नोकरी लावून निःशंक केले. हा झाला लाख रुपयांचा स्वामी कृपेचा लाभ.

Comments
Add Comment

Horoscope: दसऱ्याला बनतोय गुरू-बुध शक्तीशाली योग, या राशींना होणार लाभ

मुंबई: केंद्र योग आणि गुरु-बुध युतीमुळे मेष, कर्क, आणि धनु या राशींना १ ऑक्टोबर २०२५ च्या आसपास मोठा आर्थिक आणि

Navratri Ashtami kanya pujan 2025 : मुलींच्या पूजनाने पूर्ण होतील सर्व मनोकामना! महाअष्टमीला कन्या पूजनाचा विधी आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

नवरात्रोत्सव हा हिंदू धर्मातील शक्ती उपासनेचा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा उत्सव आहे. या नऊ दिवसांमध्ये,

दसऱ्यानंतर ‘या’ राशींचे नशीब चमकणार! होणार धनलाभ आणि प्रगती

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे राशी परिवर्तन (गोचर) मानवी जीवनावर मोठा परिणाम करतात. लवकरच बुध ग्रह आपली

Navratri 2025 : नवरात्रीत कांदा आणि लसूण खाणं पाप? यावर प्रेमानंद महाराज काय म्हणाले?

शारदीय नवरात्र उत्सवाला २२ सप्टेंबरपासून भव्य सुरुवात झाली आहे. देशभरातील श्रद्धालूंनी या नऊ दिवसांच्या

माता शैलपुत्रीच्या आवडत्या फुलाचे रोप नवरात्रीत घरात नक्की लावा, देवीच्या आशीर्वादाने घरात भरभराट होईल.

माता शैलपुत्रीच्या आवडत्या फुलाचे रोप नवरात्रीत घरात नक्की लावा, देवीच्या आशीर्वादाने घरात भरभराट

नवरात्र उत्सवात गरबा नृत्यावर पावसाचे पाणी

नवरात्र उत्सवात गरबा नृत्यावर पावसाचे पाणी -विनायक बेटावदकर कल्याण शहरात मोठ्या उत्साहात गणपती उत्सव साजरा