श्री स्वामी समर्थांकडून नोकरी लागण्याचा मुळेकरांना आशीर्वाद मिळाला होता. मुळेकर हे गाणगापुरास निघाले होते; परंतु पैसे कमी होते म्हणून पैशांअभावी श्री स्वामींच्या दर्शनास जाताना त्यांनी नारळ न घेता एक पैशाच्या खारका घेतल्या. श्री स्वामी समर्थांपुढे खारका ठेवून त्यांना नमस्कार केला. तेच महाराज म्हणाले की, ‘जा नारळ घेऊन ये. मुळेकरांनी चार आण्याचा नारळ आणला. श्री स्वामींपुढे ठेवून दर्शन घेतले. त्यामुळे गाणगापूरला जाण्याच्या प्रवासात चार आणे कमी पडू लागले. पण त्यास गाणगापूरच्या प्रवासात महाराजांनी चार आण्याच्या दुप्पट आठ आणे दिले. पैशाची तूट भरून निघाली. गाणगापूरची यात्रा करून ते घरी आले. श्री स्वामींनी सांगितल्याप्रमाणे मामलेदार झाले.
पोलिटिकल एजंट साहेबाच्या कचेरीत नोकरी, अव्वल कारकून, मामलेदार – फर्स्टक्लास मामलेदार झाले. श्री स्वामी समर्थ हे भक्तवत्सल तर आहेतच, पण आपल्याकडे येणाऱ्या भक्तांची पुरेपूर काळजी घेणारेही आहेत. गाणगापूरला दत्तप्रभूच्या दर्शनास जाण्यासाठी मुळेकरांस पैशाची गरज होती. म्हणूनच श्री स्वामी महाराजांपुढे नारळ ठेवण्याऐवजी खारका ठेवण्याचे मुळेकरांच्या मनात आले.
श्री स्वामीविषयी त्यांच्या मनात प्रेमभाव होताच, परंतु प्रवासात पैसे कमी पडतील, या चिंतेपोटीच त्यांनी श्री स्वामींपुढे नारळाऐवजी खारका ठेवल्या. श्री स्वामींकडून या गोष्टीकडे कसे दुर्लक्ष होईल? म्हणून ते मुळेकरांना लगेच म्हणाले, ‘जा नारळ घेऊन ये.’ नारळाविषयी स्वामींच्या मनात दुर्लक्ष कसे होईल, याचे परम आश्चर्य मुळेकरांस वाटले. येथेही महाराज ‘जा’ असे अगदी सहज म्हणाले. यातूनही त्यांना मुळेकरांस हेच सांगावयाचे होते की, पुढील प्रवासाची काळजी का करतोस? निःशंक रहावे महाराजांच्या या वचनाची प्रचिती चार आण्याऐवजी आठ आणे मिळून आनंद झाला. मुळेकरांना श्री स्वामी समर्थांनी त्यास पक्की नोकरी लावून निःशंक केले. हा झाला लाख रुपयांचा स्वामी कृपेचा लाभ.
मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…
हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…
वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…