Government Job : पुणे महापालिकेत नोकरीची संधी; ६००हून अधिक जागांची भरती!

बारावी उत्तीर्णही करु शकतात अर्ज; जाणून घ्या सविस्तर


पुणे : सध्या अनेक युवक सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असतात. मात्र काहींचे उच्च शिक्षण नसल्यामुळे अनेकांचे सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न अपुरे राहते. अशाच काही तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे महापालिकेत (Pune Municipality) तरुणांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. बारावी ते पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पुणे महापालिकेत ६८२ जागांसाठी अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून तरुणांना सहा महिने विविध विभागांत काम करण्याची संधी मिळणार आहे.



कोणत्या पदांची भरती?


पुणे महापालिकेचच्या बरतीमध्ये मॅकेनिक, सुतार, पेंटर, शीट मेटल वर्क, मशिन टूल दुरुस्ती, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), ट्रॅफिक वॉर्डन, उद्यान विभागात माळी, हॉर्टीकल्चर मिस्त्री, क्षेत्रीय कार्यालयाकडील स्वच्छता विषयक कामे, अनुरेखक, आरेखक, लेखनिक, प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अभियंता, आपत्ती व्यवस्थापन विभाग, आणि पर्यावरण विभाग यांचा समावेश आहे.



कसा करावा अर्ज?


इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. उमेदवार https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करु शकणार आहेत. तसेच १५ सप्टेंबर २०२४ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असून त्याआधीच उमेदवारांनी अर्ज सादर करावे असे आवाहन करण्यात आले आहे.



किती वेतन मिळणार?


मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना शिष्यवृत्ती स्वरूपात वेतन दिले जाणार आहे. बारावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना ६ हजार रुपये, आयटीआय किंवा पदविका धारकांना ८ हजार रुपये, तर पदवीधर अथवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना १० हजार रुपये दरमहा वेतन मिळेल.



वयोमर्यादा


किमान १८ ते कमाल ३५ वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत.

Comments
Add Comment

Water storage : खरीप हंगामावर वरुणराजाची कृपादृष्टी, नाशिकसह इतर विभागांतील पाणीसाठा किती ? 

Nashik : जून महिना कोरडा गेल्यानंतरही झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणे भरली आहेत. त्यामुळे

Panic in Wardha : वर्ध्यात दहशत! १० गावांत हाय अलर्ट जारी; वनविभाग ॲक्शन मोडमध्ये

वर्धा: महाराष्ट्र आणि देशपातळीवर वन्यजीवांच्या वाढत्या वावरामुळे मानवी वस्त्यांवर आणि शेती परिसरांवर संकट

Nashik-Mumbai Highway : घोटी–सिन्नर फाटा उड्डाणपुलावर ट्रक दुभाजकाला धडकून उलटला अन्...महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

घोटी : नाशिक–मुंबई महामार्गावर (Nashik-Mumbai Highway) घोटी–सिन्नर (Ghoti Sinner) फाटा उड्डाणपुलावर आज एक भीषण अपघात घडला. विटांनी

Mumbai Pune Railway : घाटात दरड कोसळली तरी वाहतूक थांबणार नाही; मुंबई-पुणे रेल्वेप्रवास आता अधिक सुरक्षित, 'हा' मोठा बदल होणार!

मुंबई-पुणे रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. पावसाळ्यात दरडी कोसळल्यामुळे होणारा

Ahilyanagar : नीट परीक्षेत कमी गुण मिळाले अन् विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलले ; सुसाईड नोटमध्ये लिहिलं आत्महत्येचं कारण

Ahilyanagar : नीट परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याच्या नैराश्यातून १९ वर्षीय विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याची

BENDUR FESTIVAL : सर्जा-राजाप्रती कृतज्ञतेचा उत्सव; महाराष्ट्रातील पारंपरिक 'बेंदूर' सणाची परंपरा आणि महत्त्व

भारतीय संस्कृती ही कृषीसंस्कृतीवर आधारलेली असून, या मातीतील प्रत्येक सण-उत्सव हा थेट प्रकृती आणि