IND vs BAN: भारत-बांग्लादेश कसोटीसाठी लवकर होणार संघाची घोषणा, भारतीय संघात यांना मिळू शकते संधी

  75

मुंबई: भारत आणि बांग्लादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना १९ सप्टेंबरला खेळवला जाईल. हा सामना चेन्नईत आयोजित करण्यात येईल. भारत-बांग्लादेश यांच्यात दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. यासाठी लवकरच संघाची घोषणा केली जाऊ शकते. भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात मैदानावर उतरणार आहे.


टीम इंडिया या मालिकेत अनुभवी खेळाडूंसह युवा खेळाडूंनाही संधी देऊ शकते. मात्र त्यांची निवड त्यांच्या फॉर्मवर अवलंबून आहे. सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल यांना संधी मिळू शकते.


यशस्वी जायसवाल चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे यशस्वी आणि शुभमन गिल यांची जागा साधारण निश्चित आहे. जर शुभमन गिलने दिलीप ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली तर त्याच्यासाठी ही महत्त्वाची संधी ठरू शकते. सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल यांनाही टीम इंडियात संधी मिळू शकते. सर्फराज आणि जुरेल यांनी भारतीय संघासाठी पदार्पण केले आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या रवींद्र जडेजालाही संधी मिळू शकते. जडेजा अनुभवी ऑलराऊंडर आहे.


टीम इंडिया स्पिनर्सवर विशेष लक्ष देऊ शकतात. कुलदीप यादव आणि रवीचंद्रन अश्विन भारतीय संघासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि मुकेश कुमार यांनाही संधी मिळू शकते. भारतीय संघ अर्शदीप सिंहच्या नावावरही विचार करू शकतो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीचे लक्ष खेळाडूंच्या दिलीप ट्रॉफीमधील प्रदर्शनावरही असणार आहे. विकेटकीपर ऋषभ पंतचे स्थान निश्चित आहे.


बांगलादेशविरुद् भारताचा संभाव्य संघ - रोहित शर्मा(कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, सर्फराज खान, देवदत्त पडिक्कल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप, अर्शदीप सिंह.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार