पैशांच्या नोटा छापण्यासाठी किती पैसे खर्च होतात? जाणून घ्या

मुंबई: भारतीय बाजारात नोटांचे चलन हे नाण्यांच्या तुलनेत अधिक आहे. याच कारणामुळे भारत सरकार नाण्यांच्या तुलनेत नोटांची छपाई करण्यावर जोर देते. जाणून घ्या की भारताला १०,२०, ५०, १००, २०० आणि ५०० रूपयांच्या नोट छापण्यासाठी किती खर्च येतो.



आरबीआय किती नोटा छापू शकते


कोणतेही सरकार अथवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हव्या तितक्या नोटा छापू शकत नाही. नोट किती छापल्या जाव्यात यासाठीही एक नियम आहे. खरंतर, आरबीआय भारतात किती नोटा छापू शकते हे न्यूनतम आरक्षित प्रणालीच्या आधारावर ठरवले जाते.


ही सिस्टीम भारतात १९५७ पासून काम करत आहे. या सिस्टीमनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला २०० कोटी रूपयांची संपत्ती आपल्याकडे ठेवावी लागेल. यात ११५ कोटी रूपयांचे स्वर्ण भांडार आणि ८५ कोटी रूपयांच्या विदेशी मुद्राचा समावेश आहे. इतका पैसा स्टोर केल्यानंतरच आरबीआय अर्थव्यवस्थेच्या आवश्यकतेनुसार अनिश्चित काळापर्यंत मुद्रा छापण्यासाठी स्वतंत्र होते.


भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण लिमिटेडकडू आरटीआयच्या माध्यमातून जेव्हा याबाबत उत्तर मागितले तेव्हा मिळालेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष २०२१-११मध्ये १० रूपयांच्या १ हजार नोट छापण्यासाठी ९६० रूपये खर्च करावे लागले होते. या हिशेबाने पाहिल्यास एक १० रूपयांची नोट छापण्यासाठी सरकारला ९६ पैसे खर्च करावे लागले होते.


या वर्षी २० रूपयांचे एक हजार नोट छापण्यासाठी ९५० रूपये खर्च करावे लागले होते. म्हणजेच एक २० रूपयांची नोट छापण्यासाठी ९५ पैसे खर्च आला होता. तर २०२१-२२मध्ये ५० रूपयांच्या एक हजार नोट छापण्यात १,१३० रूपये खर्च करावे लागले होते. म्हणजेच एक ५० रूपयांची नोट छापण्यात १ रूपये १३ पैसे आरबीआयला खर्च करावे लागतात.


आरबीआयला १०० रूपयांच्या एक हजार नोट छापण्यासाठी एकूण १७७० रूपये खर्च करावे लागले होते. म्हणजेच १०० रूपयांची एक नोट छापण्यासाठी आरबीआयला १.७७ रूपये खर्च करावे लागले. २००च्या नोटेबाबत बोलायचे झाल्यास या आर्थिक वर्षात २००च्या एक हजार नोट छापण्यासाठी आरबीआयला २३७० रूपये खर्च करावे लागले. म्हणजेच २००ची एक नोट छापण्यासाठी आरबीआयला २.३७ रूपये खर्च करावे लागतात.

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या