पैशांच्या नोटा छापण्यासाठी किती पैसे खर्च होतात? जाणून घ्या

मुंबई: भारतीय बाजारात नोटांचे चलन हे नाण्यांच्या तुलनेत अधिक आहे. याच कारणामुळे भारत सरकार नाण्यांच्या तुलनेत नोटांची छपाई करण्यावर जोर देते. जाणून घ्या की भारताला १०,२०, ५०, १००, २०० आणि ५०० रूपयांच्या नोट छापण्यासाठी किती खर्च येतो.



आरबीआय किती नोटा छापू शकते


कोणतेही सरकार अथवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हव्या तितक्या नोटा छापू शकत नाही. नोट किती छापल्या जाव्यात यासाठीही एक नियम आहे. खरंतर, आरबीआय भारतात किती नोटा छापू शकते हे न्यूनतम आरक्षित प्रणालीच्या आधारावर ठरवले जाते.


ही सिस्टीम भारतात १९५७ पासून काम करत आहे. या सिस्टीमनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला २०० कोटी रूपयांची संपत्ती आपल्याकडे ठेवावी लागेल. यात ११५ कोटी रूपयांचे स्वर्ण भांडार आणि ८५ कोटी रूपयांच्या विदेशी मुद्राचा समावेश आहे. इतका पैसा स्टोर केल्यानंतरच आरबीआय अर्थव्यवस्थेच्या आवश्यकतेनुसार अनिश्चित काळापर्यंत मुद्रा छापण्यासाठी स्वतंत्र होते.


भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण लिमिटेडकडू आरटीआयच्या माध्यमातून जेव्हा याबाबत उत्तर मागितले तेव्हा मिळालेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष २०२१-११मध्ये १० रूपयांच्या १ हजार नोट छापण्यासाठी ९६० रूपये खर्च करावे लागले होते. या हिशेबाने पाहिल्यास एक १० रूपयांची नोट छापण्यासाठी सरकारला ९६ पैसे खर्च करावे लागले होते.


या वर्षी २० रूपयांचे एक हजार नोट छापण्यासाठी ९५० रूपये खर्च करावे लागले होते. म्हणजेच एक २० रूपयांची नोट छापण्यासाठी ९५ पैसे खर्च आला होता. तर २०२१-२२मध्ये ५० रूपयांच्या एक हजार नोट छापण्यात १,१३० रूपये खर्च करावे लागले होते. म्हणजेच एक ५० रूपयांची नोट छापण्यात १ रूपये १३ पैसे आरबीआयला खर्च करावे लागतात.


आरबीआयला १०० रूपयांच्या एक हजार नोट छापण्यासाठी एकूण १७७० रूपये खर्च करावे लागले होते. म्हणजेच १०० रूपयांची एक नोट छापण्यासाठी आरबीआयला १.७७ रूपये खर्च करावे लागले. २००च्या नोटेबाबत बोलायचे झाल्यास या आर्थिक वर्षात २००च्या एक हजार नोट छापण्यासाठी आरबीआयला २३७० रूपये खर्च करावे लागले. म्हणजेच २००ची एक नोट छापण्यासाठी आरबीआयला २.३७ रूपये खर्च करावे लागतात.

Comments
Add Comment

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना