पैशांच्या नोटा छापण्यासाठी किती पैसे खर्च होतात? जाणून घ्या

मुंबई: भारतीय बाजारात नोटांचे चलन हे नाण्यांच्या तुलनेत अधिक आहे. याच कारणामुळे भारत सरकार नाण्यांच्या तुलनेत नोटांची छपाई करण्यावर जोर देते. जाणून घ्या की भारताला १०,२०, ५०, १००, २०० आणि ५०० रूपयांच्या नोट छापण्यासाठी किती खर्च येतो.



आरबीआय किती नोटा छापू शकते


कोणतेही सरकार अथवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हव्या तितक्या नोटा छापू शकत नाही. नोट किती छापल्या जाव्यात यासाठीही एक नियम आहे. खरंतर, आरबीआय भारतात किती नोटा छापू शकते हे न्यूनतम आरक्षित प्रणालीच्या आधारावर ठरवले जाते.


ही सिस्टीम भारतात १९५७ पासून काम करत आहे. या सिस्टीमनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला २०० कोटी रूपयांची संपत्ती आपल्याकडे ठेवावी लागेल. यात ११५ कोटी रूपयांचे स्वर्ण भांडार आणि ८५ कोटी रूपयांच्या विदेशी मुद्राचा समावेश आहे. इतका पैसा स्टोर केल्यानंतरच आरबीआय अर्थव्यवस्थेच्या आवश्यकतेनुसार अनिश्चित काळापर्यंत मुद्रा छापण्यासाठी स्वतंत्र होते.


भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण लिमिटेडकडू आरटीआयच्या माध्यमातून जेव्हा याबाबत उत्तर मागितले तेव्हा मिळालेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष २०२१-११मध्ये १० रूपयांच्या १ हजार नोट छापण्यासाठी ९६० रूपये खर्च करावे लागले होते. या हिशेबाने पाहिल्यास एक १० रूपयांची नोट छापण्यासाठी सरकारला ९६ पैसे खर्च करावे लागले होते.


या वर्षी २० रूपयांचे एक हजार नोट छापण्यासाठी ९५० रूपये खर्च करावे लागले होते. म्हणजेच एक २० रूपयांची नोट छापण्यासाठी ९५ पैसे खर्च आला होता. तर २०२१-२२मध्ये ५० रूपयांच्या एक हजार नोट छापण्यात १,१३० रूपये खर्च करावे लागले होते. म्हणजेच एक ५० रूपयांची नोट छापण्यात १ रूपये १३ पैसे आरबीआयला खर्च करावे लागतात.


आरबीआयला १०० रूपयांच्या एक हजार नोट छापण्यासाठी एकूण १७७० रूपये खर्च करावे लागले होते. म्हणजेच १०० रूपयांची एक नोट छापण्यासाठी आरबीआयला १.७७ रूपये खर्च करावे लागले. २००च्या नोटेबाबत बोलायचे झाल्यास या आर्थिक वर्षात २००च्या एक हजार नोट छापण्यासाठी आरबीआयला २३७० रूपये खर्च करावे लागले. म्हणजेच २००ची एक नोट छापण्यासाठी आरबीआयला २.३७ रूपये खर्च करावे लागतात.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला