Bhiwandi Crime : प्रेमसंबंधातील युवकाचा संशयास्पद मृत्यू; घरच्यांकडून पोलिसांसह घरच्यांचे पोलिसांवर व मुलीच्या नातेवाईकांवर आरोप!

भिवंडी : तालुक्यातील पडघा पोलीस ठाणे हद्दीतील एक धक्कादायक घटना (Bhiwandi Crime) समोर आली आहे. एका पंचवीस वर्षीय युवकाचा पोलिसांच्या ताब्यात असताना रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी मुलीच्या घरच्यांवर व पोलिसांवर मुलाच्या मृत्यू प्रकरणी दोषी असल्याचा आरोप केले आहे.



नेमके प्रकरण काय?


सविस्तर घटना भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाण्यातील पाच्छापूर याठिकाणी घडली आहे. मृत युवक अनिकेत जाधव (२४) याचे वाशिंद येथील नात्यातील अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. प्रेमातून त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला व अनेक दिवसांपासून ते मध्य प्रदेश या ठिकाणी राहत होते. पोलिसांना याची माहिती मिळताच वाशिंद पोलिसांनी मध्य प्रदेशातील पोलिसांच्या मदतीने त्या दोघांना  शोधून काढले. त्यानंतर मुलीच्या नातेवाईक दोघांनाही मध्यप्रदेशमधून महाराष्ट्रात आणत होते. परंतु महाराष्ट्रात येत असताना अनिकेत याचा राजधानी एक्सप्रेसमधून पडून मृत्यू झाला.


या अपघातानंतर अनिकेत याचा मृत्यू पोलिसांनी आणि मुलीच्या घरच्यांनीच केल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे. कारण पोलिसांच्या ताब्यात असताना सुद्धा अनिकेचा रेल्वे अपघातात मृत्यू होणे संशयास्पद असून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी अनिकेच्या कुटुंबीयांनी केली आहे. याबाबत सखोल चौकशी न झाल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपाइंचे किरण चन्ने यांनी दिला आहे. दरम्यान, या घटनेविषयी पोलिसांची प्रतिक्रिया विचारले असता पोलिसांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे.

Comments
Add Comment

महिलांसाठी मुंबई देशातील टॉप ५ शहरांमध्ये; बेंगळुरू पुन्हा एकदा अव्वल!

मुंबई  : भारतातील महिलांसाठी राहण्यायोग्य आणि करिअरसाठी पोषक शहरांच्या यादीत मुंबईने आपले स्थान अधिक भक्कम

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई होणार

मुंबई : महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीकरिता पुरेशा प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Devendra Fadnavis BMC Election 2026 : उद्धव आणि राज ठाकरेंचा जीव फक्त मुंबईतच का अडकलाय? फडणवीसांनी पुराव्यासह काढला भ्रष्टाचाराचा पाढा, नक्की काय म्हणाले?"

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)

वाढत्या बेकायदा घुसखोरांमुळे चौफेर सामाजिक संकटांचा धोका - नामवंत तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त

मुंबई  : तीन शेजारी देशांमधून भारतात घुसणाऱ्या असंख्य बेकायदा स्थलांतरितांमुळे भारताची सुरक्षा आणि विकास हे

Nitesh Rane : नालासोपारा मध्ये मंत्री नितेश राणे यांच्या प्रचार सभांचा झंझावात!

नालासोपारा : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील

भुयारी मेट्रो मार्गिकेमध्ये नेटवर्कची गैरसोय कायम !

तोडगा काढण्यात एमएमआरसीएल ढिम्म मुंबई : आरे ते कफ परेड या मेट्रो-३ भुयारी मेट्रोच्या संपूर्ण मार्गिकेमध्ये