Bhiwandi Crime : प्रेमसंबंधातील युवकाचा संशयास्पद मृत्यू; घरच्यांकडून पोलिसांसह घरच्यांचे पोलिसांवर व मुलीच्या नातेवाईकांवर आरोप!

भिवंडी : तालुक्यातील पडघा पोलीस ठाणे हद्दीतील एक धक्कादायक घटना (Bhiwandi Crime) समोर आली आहे. एका पंचवीस वर्षीय युवकाचा पोलिसांच्या ताब्यात असताना रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी मुलीच्या घरच्यांवर व पोलिसांवर मुलाच्या मृत्यू प्रकरणी दोषी असल्याचा आरोप केले आहे.



नेमके प्रकरण काय?


सविस्तर घटना भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाण्यातील पाच्छापूर याठिकाणी घडली आहे. मृत युवक अनिकेत जाधव (२४) याचे वाशिंद येथील नात्यातील अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. प्रेमातून त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला व अनेक दिवसांपासून ते मध्य प्रदेश या ठिकाणी राहत होते. पोलिसांना याची माहिती मिळताच वाशिंद पोलिसांनी मध्य प्रदेशातील पोलिसांच्या मदतीने त्या दोघांना  शोधून काढले. त्यानंतर मुलीच्या नातेवाईक दोघांनाही मध्यप्रदेशमधून महाराष्ट्रात आणत होते. परंतु महाराष्ट्रात येत असताना अनिकेत याचा राजधानी एक्सप्रेसमधून पडून मृत्यू झाला.


या अपघातानंतर अनिकेत याचा मृत्यू पोलिसांनी आणि मुलीच्या घरच्यांनीच केल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे. कारण पोलिसांच्या ताब्यात असताना सुद्धा अनिकेचा रेल्वे अपघातात मृत्यू होणे संशयास्पद असून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी अनिकेच्या कुटुंबीयांनी केली आहे. याबाबत सखोल चौकशी न झाल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपाइंचे किरण चन्ने यांनी दिला आहे. दरम्यान, या घटनेविषयी पोलिसांची प्रतिक्रिया विचारले असता पोलिसांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे.

Comments
Add Comment

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

राज्यातील २८ हजार प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती फडणवीस सरकारचा शेतकरी हिताचा

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या, मध्य, आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; वेळ पाहूनच बाहेर पडा

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर

राज्यात ‘वन स्टेट, वन पोर्टल’ संकल्पनेला गती; महा सारथी पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : राज्यात डिजिटल गव्हर्नन्स अधिक सक्षम व नागरिककेंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘वन स्टेट, वन