Mumbai News : प्रवाशांना दिलासा! तीन महिन्यांनंतर मांडवा – गेटवे जलवाहतूक पुन्हा सुरू

मुंबई : दरवर्षी जून ते ऑगस्ट महिन्यांच्या दरम्यान मुंबई-गेट वे ते मांडवा (Gateway To Mandwa) ही जलवाहतूक (Water Transport) सेवा बंद केली जाते. या महिन्यांच्या कालावधीत जोरदार पावसाचा अंदाज असल्यामुळे जलवाहतूक कंपन्यांकडून हा निर्णय घेण्यात येतो. यंदाही जून आणि ऑगस्ट महिन्यात गेट वे ते मांडवा ही जलवाहतूक सेवा बंद करण्यात आली होती. मात्र आता पाऊस ओसरला असल्यामुळे कंपन्यांनीही सेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन महिने ही सेवा बंद होती. मात्र आता सेवा सुरू झाल्यापासून गणेशोत्सवासाठी कोकणात विशेषतः अलिबाग मुरुड तालुक्यात येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवात अलिबागला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे तीन महिने बंद असलेली मुंबई-गेट वे ते मांडवा ही जलवाहतूक सेवा आजपासून पुन्हा सुरू करण्यात येत आहे. हवामानाचा अंदाज घेवून मेरीटाईम बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. तसेच हवामानाचा अंदाज घेऊन दिवसाला एक ते दोन फेऱ्या होणार आहेत, असे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.


दरम्यान, गणपती बाप्पाचे आगमन ७ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे अलिबागहून मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांना जलवाहतूक सुरू झाल्याने दिलासा मिळाला आहे. प्रवाशांना अलिबाग ते मुंबई असा रस्तेमार्गे पार करायला जास्त वेळ लागत होता. तसेच रोरो सेवेचे तिकिटाचे दरही अधिक असल्यामुळे सर्वसामान्यांना ते परवडत नव्हते. मात्र आता मांडवा- गेटवे सेवा सुरू झाल्याने नागरिकांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

Comments
Add Comment

Chief Minister Devendra Fadnavis : राज्याचे ‘क्वांटम व ‘डीप टेक’धोरण लवकरच आणण्यात येणार

मुंबई: महाराष्ट्राला अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात देशात अग्रस्थानी नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र

Chief Minister Devendra Fadnavis : मालाडमध्ये जागतिक दर्जाचे ‘मीडिया हब’ उभारण्यासाठी कंपनी स्थापन करण्यात येणार

मुंबई : मालाड येथील आकाशवाणी (प्रसार भारती) च्या जागेवर जागतिक दर्जाचा ‘एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब’

Amravati : १७ पैकी ४ मतदारसंघात 'मविआ' निवडणुकीआधीच स्पर्धेबाहेर

अमरावतीत शिवसेनेच्या बंडखोराचा अर्ज बाद; नाशिकमध्ये 'उबाठा'कडून शरणागती मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य

Labor Minister Adv. Akash Fundkar : राज्यात ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी न होण्यासाठी नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणार

मुंबई : आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यात माथाडी कामगारांकडून ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी करून

Tourism Policy of Maharashtra : हॉटेल्सना 'स्टार श्रेणी प्रमाणपत्रा'ची सक्ती हटवली

पर्यटन विभागाचा निर्णय; 'हॉटेल' आणि 'होमस्टे'च्या व्याख्यांमध्ये सुधारणा मुंबई : राज्यात पर्यटन क्षेत्राला चालना

Nitesh Rane : चिपी विमानतळ ते गोवा जलवाहतूक सुरू होणार

मंत्री नितेश राणे यांच्याकडे प्रस्ताव सादर; प्रमुख पर्यटनस्थळांमधील संपर्क वेगवान होणार मुंबई : सिंधुदुर्ग