Nitesh Rane : धर्माधर्मांत केला जाणारा फरक थांबवा, अन्यथा हिंदू समाज तिसरा डोळा उघडेल!

आमदार नितेश राणे यांनी प्रशासनासह मुस्लिम समाजाला दिला इशारा


रत्नागिरी : सध्या रत्नागिरीमध्ये (Ratnagiri) लांगूलचालनाचे विषय सुरु आहेत. रत्नागिरीमध्ये किल्ल्यांवर मुस्लिम संघटनेतर्फे (Muslim Association) अनधिकृत बांधकाम सुरु असून त्याला मदारचे स्वरुप दिले जात आहे. सातत्याने सुरु असलेल्या या विकृत बांधकामांबाबत शासनाच्या (Government) माध्यमातून पत्र लिहली जात आहेत. २०१६ सालीच अतिक्रमण काढून टाकण्याचा निर्णय लागू केला आहे. मात्र तरीही मुस्लिम समाजाकडून अतिक्रमण केले जात असल्यामुळे भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी रत्नागिरी प्रशासनाला रोखठोक सवाल विचारला आहे.


रत्नागिरीतील प्रशासनाला रत्नागिरीमध्ये हिंदू देखील राहतात याचा विसर पडला आहे. रत्नागिरी शहरामध्ये कुठल्याही हिंदूने शासकीय जमिनीवर छोटी चहाची टपरी बांधली तरीही ती काढण्यासाठी तातडीने पोलीस फोर्स मागवले जातात. परंतु रत्नागिरीतील किल्ल्यांवर मुस्लिम समाजाकडून मदारी उभारण्याचे काम सुरु असताना देखील शासन कोणतीही दखल घेत नाही. त्यामुळे रत्नागिरीमधील प्रशासनाने जो नियम हिंदू समाजाला लागतो तोच नियम मुस्लिम समाजाला देखील लागू केला पाहिजे असे स्पष्ट मत नितेश राणे यांनी मांडले. आजपर्यंत रत्नागिरीमध्ये शरिया कायदा लागू झालेला आहे का? त्याचबरोबर मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीमध्ये मदार या विषयाला परवानगी आहे का? मग अनधिकृत बांधकामांना काढण्यामध्ये काय अडचण आहे, असा सवाल रत्नागिरी प्रशासनासह मुस्लिम समाजाला विचारला.



...तर रत्नागिरीतील हिंदू समाज आक्रमक होणार


रत्नागिरीतील अनधिकृत बांधकामाबाबत रत्नागिरीचे जिल्हाधिकारी, एसपी आणि त्यांच्या प्रतिनिधींसोबत नितेश राणे आणि हिंदू संघटनेसोबत चर्चा केली. मात्र प्रशासनाने दिलेली कारणे आणि त्याबाबतचा आवाज उठवून रत्नागिरी हिंदू संघटनेचा संयम संपला आहे. त्यामुळे प्रशासनाने आता काम रोखण्यासाठी तारखा द्याव्या. तसेच तारखांच्या अनुसार जो-तो स्ट्रकचर निघाला नाही तर रत्नागिरीमधील हिंदू संघटना आक्रमक होईल. त्यानंतर रत्नागिरीमधील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी आणि नगरसेविका प्रतिनिधी यांच्याकडे राहिल. कारण त्यांनी अॅक्शन न घेतल्यामुळे तो दिवस उजाडेल.


त्याचबरोबर हिंदू आणि मुस्लिम यांच्यात प्रशासनाकडून केला जाणारा फरक थांबला पाहिजे, अन्यथा रत्नागिरीमधील हिंदू समाज आपला तिसरा डोळा उघडून तांडव करेल, आणि मग निर्माण होणारी परिस्थिती कोणाच्याही हातात राहणार नाही, असा गंभीर इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

Comments
Add Comment

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य

Fake cotton seeds : खरीपच्या तोंडावर मोठा घोटाळा उघड ! जामनेरमध्ये बनावट कापूस बियाण्यांचा साठा जप्त

Fake cotton seeds : जळगाव जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा मोठा डाव उधळून लावण्यात आला आहे.