Mumbai Local : प्रवाशांनो लक्ष द्या! उद्यापासून मालाडच्या फलाट क्रमांकांत होणार 'हे' बदल

मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाणाऱ्या लोकलबाबत (Mumbai Local) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रेल्वे प्रशासन सध्या गोरेगाव आणि कांदिवली दरम्यान सहावी मार्गिका बसवण्यासाठी ३५ दिवसांचा मेगाब्लॉक (Megablock) सुरु केला आहे. यामध्ये अनेक लोकल रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.


अशातच पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मालाड रेल्वे स्टेशनवरील मधल्या फलाटांचे क्रमांक देखील बदलण्यात येणार आहेत. त्यामुळे काही दिवस प्रवाशांना गर्दीचा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जाणून घ्या स्थानकावरील नवी रुपरेषाबाबत सविस्तर माहिती.



काय आहेत बदल?



  • प्लॅटफॉर्म क्रमांक १ - फलाट क्रमांक १ वर धीम्या लोकलमधील प्रवाशांसाठी पश्चिम दिशेच्या दरवाजातून चढण्या-उतरण्याची सुविधा आहे. परंतु आता चढण्या-उतरण्यासाठी पूर्वेकडील दरवाजाचा वापर करावा लागणार आहे. १ सप्टेंबर २०२४ पासून हे बदल लागू होतील.

  • प्लॅटफॉर्म क्रमांक २ - ८ सप्टेंबरपासून चर्चगेट दिशेला जाणाऱ्या धीम्या लोकलमध्ये पश्चिमेकडील दरवाजाचा वापर चढण्या-उतरण्यासाठी करावा लागणार आहे.

Comments
Add Comment

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा

मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र,