Mumbai Local : प्रवाशांनो लक्ष द्या! उद्यापासून मालाडच्या फलाट क्रमांकांत होणार 'हे' बदल

मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाणाऱ्या लोकलबाबत (Mumbai Local) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रेल्वे प्रशासन सध्या गोरेगाव आणि कांदिवली दरम्यान सहावी मार्गिका बसवण्यासाठी ३५ दिवसांचा मेगाब्लॉक (Megablock) सुरु केला आहे. यामध्ये अनेक लोकल रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.


अशातच पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मालाड रेल्वे स्टेशनवरील मधल्या फलाटांचे क्रमांक देखील बदलण्यात येणार आहेत. त्यामुळे काही दिवस प्रवाशांना गर्दीचा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जाणून घ्या स्थानकावरील नवी रुपरेषाबाबत सविस्तर माहिती.



काय आहेत बदल?



  • प्लॅटफॉर्म क्रमांक १ - फलाट क्रमांक १ वर धीम्या लोकलमधील प्रवाशांसाठी पश्चिम दिशेच्या दरवाजातून चढण्या-उतरण्याची सुविधा आहे. परंतु आता चढण्या-उतरण्यासाठी पूर्वेकडील दरवाजाचा वापर करावा लागणार आहे. १ सप्टेंबर २०२४ पासून हे बदल लागू होतील.

  • प्लॅटफॉर्म क्रमांक २ - ८ सप्टेंबरपासून चर्चगेट दिशेला जाणाऱ्या धीम्या लोकलमध्ये पश्चिमेकडील दरवाजाचा वापर चढण्या-उतरण्यासाठी करावा लागणार आहे.

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती