Post Office Scheme: दर महिन्याला होईल २० हजारापेक्षा अधिक कमाई, पोस्ट ऑफिसची ही योजना आहे जबरदस्त

मुंबई:नोकरी करणाऱ्या लोकांसाठी रिटायरमेंटनंतर दर महिन्याला इनकम मिळवणे सोपे नसते. जर नोकरी करत असताना तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर हे काम सोपे होते. तसेच रिटायरमेंटनंतरही तुम्हाला दरमहा पैसे मिळत राहतात. आज आम्ही तुम्हाला अशा योजनेबद्दल सांगत आहोत जिथे तुम्ही एकरकमी गुंतवणूक करू महिन्याला कमाई करू शकता. ही एक सरकारी योजना आहे. रिटायरमेंट प्लानिंगसाठी ही प्रसिद्ध योजना आहे.


पोस्ट ऑफिसची ही जबरदस्त योजना वरिष्ठ नागरिक बचत योजना आहे. वरिष्ठ नागरिकांसाठी ही योजना पाच वर्षांपर्यंत दर महिन्याला २० हजार रूपये देऊ शकते. सरकारच्या या योजनेंतर्गत ८.२ टक्के व्याजदरही मिळते. यात महिन्याला गुंतवणूक करण्यापेक्षा एकचा पैसे टाकता येतात.



कोण करू शकते गुंतवणूक


यात केवळ ६० वर्षांच्या वरील व्यक्ती गुंतवणूक करू शकतात. या योजनेवर सध्या ८.२ टक्के व्याज मिळत आहे. कोणतीही भारतीय व्यक्ती जिचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक आहे ते या योजनेत एकरक्कम भरू शकतात. या योजनेत अधिकाधिक ३० लाख रूपयांची गुंतवणूक करू शकता. आधी ही रक्कम १५ लाख रूपये होती.



महिना २० हजार कसे मिळतील


जर तुम्ही सीनियग सीटिझन सेव्हिंग स्कीममध्ये ३० लाख रूपयांची गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला दरवर्षी २ लाख ४६ हजार रूपयांचे व्याज मिळेल. जर महिन्याची रक्कम काढायची झाली तर ही रक्कम २०,५०० रूपये होते.

Comments
Add Comment

एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम — प्रवाशांच्या सुरक्षित, आरोग्यदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा पुढाकार

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय

उमेदवारी अर्ज, प्रचार रथ, झेंडे आणि प्रचार साहित्यांची खरेदी आणि उबाठाने कापला पत्ता...

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : वडाळ्यातील माजी नगरसेवक अमेय घोले यांनी उबाठाला राम राम ठोकत शिवसेनेत प्रवेश

भांडुप बेस्ट अपघात प्रकरणी बेस्टतर्फे चौकशी

मृतांना बेस्ट तर्फे २ लाख,र मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत मुंबई : सोमवारी रात्री भांडुप पश्चिम या

आज मध्यरात्री उशिरापर्यंत धावणार 'मेट्रो १'

मुंबईकरांना इच्छितस्थळी जाणे सुकर होणार मुंबई : घाटकोपर,वर्सोवा,अंधेरी मेट्रो-१ मार्गिकेवरील सेवा उद्या

१ ते ३१ जानेवारी दरम्यान राज्यात ‘रस्ता सुरक्षा अभियान’

मुंबई : रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती

मतदानाच्या दिवशी, १५ जानेवारी रोजी भरपगारी सुट्टी

मुंबई : राज्यातील सर्व सरकारी,निमसरकारी आणि खासगी आस्थापना मधील सर्व कर्मचाऱ्यांना यंदाची संक्रात पावली आहे. १५