Cyclone Asna : अरबी समुद्रात ४८वर्षांनंतर निर्माण झाले वादळ; गुजरातला धोका!

हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी


अहमदाबाद : मुसळधार पाऊस आणि पुरानंतर आता गुजरातला (Gujrat) असना चक्रीवादळाचा (Cyclone Asna) धोका निर्माण झालाय. तब्बल ४८ वर्षांनी अरबी समुद्रात निर्माण झालेले हे चक्रीवादळ ओमानच्या किनाऱ्याकडे सरकण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने (IMD) सौराष्ट्र आणि कच्छमध्ये रेड अलर्ट जारी केलाय. याठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.


हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सागरी भागात पावसासोबतच ताशी ७० किमी वेगाने वारे वाहत आहेत. पुढील ३ दिवस येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता या भागातील लोकांना सतर्कतेचा आणि सागरी क्षेत्रापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर दुसरीकडे, मच्छिमारांना पुढील काही दिवस समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सौराष्ट्र आणि कच्छवर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम-दक्षिणपश्चिम कडे सरकण्याची शक्यता आहे आणि कच्छ आणि लगतच्या पाकिस्तानी किनारपट्टीजवळील ईशान्य अरबी समुद्रात निर्माण होऊन शुक्रवारी चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. या वादळाला 'असना' असे नाव देण्यात आले आहे.


यंदा गुजरातमध्ये सौराष्ट्र आणि कच्छ प्रदेशात या वर्षी १ जून ते २९ ऑगस्ट दरम्यान ७९९ मिमी पाऊस पडला आहे, तर याच कालावधीत सरासरी ४३०.६ मिमी पाऊस झाला होता. या काळात सरासरीपेक्षा ८६ टक्के जास्त पाऊस झाला. मध्य आणि लगतच्या उत्तर बंगालच्या उपसागरावरील आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे आणि शुक्रवारपर्यंत पश्चिम-मध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरावर अधिक चिन्हांकित होण्याची शक्यता आहे. "ते उत्तर आंध्र प्रदेश आणि लगतच्या दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्याकडे सरकण्याची आणि रविवारपर्यंत पश्चिम-मध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरावर तीव्र दबाव निर्माण होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले.

Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी