तरुणीची आत्महत्या! मन्सुरीच्या अटकेसाठी नाशकात महिलांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा

  117

नाशिक : नाशिकरोड येथील देवळाली गाव परिसरातील राजवाडा भागात राहणाऱ्या एका पंधरा वर्षाच्या युवतीने परिसरात राहणाऱ्या युवकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. सदर घटनेप्रकरणी संबंधित युवक व त्याच्या नातेवाईकांना कठोर शासन करून त्यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी परिसरात राहणाऱ्या संतप्त महिलांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. तसेच यासंबंधी नाशिकरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना निवेदन देण्यात आले.


देवळाली गाव राजवाडा परिसरात राहणाऱ्या एका युवतीला याच भागात राहणारा कलाम इजहार मन्सुरी हा युवक छेडछाड करून तिला त्रास देत होता. त्याचप्रमाणे सदरची युवती कॉलेजला जात असताना व येत असताना तिचा पाठलाग करून छळ करीत असे. या त्रासाला कंटाळून सदर युवतीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचा प्रकार चार ते पाच दिवसापूर्वी घडला होता. या घटनेनंतर नाशिकरोड पोलीस ठाण्यात कलाम इजहार मन्सुरी याच्याविरुद्ध तसेच इतर नातेवाईकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मात्र, यातील आरोपीवर पोलिसांनी अद्याप पाहिजे तशी कारवाई केली नसल्याने संतप्त झालेल्या देवळाली गाव राजवाडा येथील महिलांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून पोलिसांना जाब विचारला. तसेच संबंधित आरोपीला अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी या महिलांनी केली. या मोर्चात प्रज्ञा उघडे, ज्योती इंगळे, आशा खडसे, दीक्षा आढाव, वनिता उघडे, मीना भालेराव, छाया गौंड, वंदना अहिरे, ज्योती पंडित यांच्यासह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.

Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र

PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेत आता मिळणार इतके व्याज, सरकारने केली घोषणा

नवी दिल्ली: भारत सरकारने स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवरील व्याजदर कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेत आतापर्यंत

व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी एकत्रितपणे दिले : डॉ. विखे

अ.नगर : आ.संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे.त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे.माझ्या

नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांचा शेकडो सर्मथकांसह शिवसेनेत प्रवेश नांदगाव : नांदगाव नगरपालिकेचे राष्ट्रवादी