Mumbai News : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्या 'या' भागातील पाणीपुरवठा खंडित

मुंबई : मुंबई महापालिकेने गणेशोत्सवापूर्वी पालिकेसंदर्भातील (Mumbai Municipality) कामे पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेने एच पश्चिम विभागातील जुने आणि जीर्ण झालेल्या मुख्य जलवाहिनींच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. यामुळे मुंबईत उद्या काही ठिकाणी पाणीपुरवठा खंडित राहणार असून नागरिकांनी पाणी साठवून ठेवावे आणि त्याचा जपून वापर करावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील पाली हिल जलाशय-१ मधील मुख्य जलवाहिनीची दुरूस्ती आणि वांद्रे पश्चिम येथील आर. के. पाटकर मार्गावर रामदास नाईक मार्ग ते मार्ग क्रमांक ३२ दरम्यान नव्याने टाकलेल्या ७५० मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या वांद्रे आणि खार परिसरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर नियमित वेळेनुसार पाणीपुरवठा पूर्ववत केला जाणार आहे.



कोणत्या भागात असणार पाणीपुरवठा बंद?



  • पेरी परिक्षेत्र - वांद्रे पश्चिमचा काही भाग, वरोडा मार्ग, हिल रोड, मॅन्युअल गोन्सालविस मार्ग, पाली गावठाण, कांतवाडी, शेरली राजन मार्ग

  • खार दांडा परिक्षेत्र - खार दांडा कोळीवाडा, दांडपाडा, चुइम गावठाण, खार पश्चिमेचा काही भाग, गझदरबांध झोपडपट्टीलगतचा काही भाग

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग परिक्षेत्र - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग लगतचा परिसर, पेस पाली गावठाण, पाली पठार, खार पश्चिममधील काही भाग.

Comments
Add Comment

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून

एकनाथ शिंदे - गणेश नाईक यांच्यात मनोमिलन?

मंत्रालयात बंद दाराआड चर्चा; नवी मुंबई पालिकेसह ठाण्यातील जागावाटपाचा तिढा सुटणार मुंबई : महाराष्ट्राच्या

BMC Election : दोन दिवसांत सुमारे ७ हजार उमदेवारी अर्जांची विक्री, दोन उमेदवारांनी भरले अर्ज

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने बुधवारी २४ डिसेंबर २०२५