Delhi Rains: मुसळधार पावसामुळे राजधानी दिल्लीत पाणीच पाणी

नवी दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे. नोएडा, गाझियाबाद, फरिदाबाद, ग्रेटर नोएडासह एनसीआरमधील अनेक भागांमध्ये पाणी भरल्याची स्थिती आहे. दिल्ली-एनसीआरमधील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याची दृश्ये समोर आली आहेत. यामुळे गाड्यांचा वेग मंदावला असून बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक जामची स्थिती निर्माण झाली आहे.



३१ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा


हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा बनत आहे. यामुळे दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात, हिमाचल आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये २९ ऑगस्टलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने ३१ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.



पाणी भरल्याने ट्रॅफिक जाम


अनेक ठिकाणी पाणी भरल्याने सकाळी सकाळी कामावर जाणाऱ्या लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. दिल्लीच्या घौला कुआं, एम्स चौराहा, मूलचंद चौराहा, आयआयओ, दिल्ली कँट, द्वारका सेक्टर १३, ८ आणि १९ चौराहा, महिलापालपूर-द्वारका अंडरपाससह अनेक भागांमध्ये ट्रॅफिक जाममुळे गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Comments
Add Comment

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या

आग्र्यात दुर्गा मातेच्या विसर्जनावेळी ६ जण बुडाले

दोन तरुणांचा मृत्यू, तर एकाला वाचवण्यात यश आगरामध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करत असताना ६ जण नदीमध्ये

आंध्र प्रदेशला चक्रीवादळाचा धोका

बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यामुळे चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला

जगाला हादरवणारी चीनची 'ती' धोकादायक मशीन... पण भारताने आकाशातच विणले सुरक्षा-जाल!

चीनने बनवले आकाशात तरंगणारे 'पवन टर्बाइन', तर भारताने 'स्ट्रेटोस्फीयर एअरशिप'ने सीमांवर ठेवलीय पाळत नवी दिल्ली: