Delhi Rains: मुसळधार पावसामुळे राजधानी दिल्लीत पाणीच पाणी

  167

नवी दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे. नोएडा, गाझियाबाद, फरिदाबाद, ग्रेटर नोएडासह एनसीआरमधील अनेक भागांमध्ये पाणी भरल्याची स्थिती आहे. दिल्ली-एनसीआरमधील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याची दृश्ये समोर आली आहेत. यामुळे गाड्यांचा वेग मंदावला असून बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक जामची स्थिती निर्माण झाली आहे.



३१ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा


हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा बनत आहे. यामुळे दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात, हिमाचल आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये २९ ऑगस्टलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने ३१ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.



पाणी भरल्याने ट्रॅफिक जाम


अनेक ठिकाणी पाणी भरल्याने सकाळी सकाळी कामावर जाणाऱ्या लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. दिल्लीच्या घौला कुआं, एम्स चौराहा, मूलचंद चौराहा, आयआयओ, दिल्ली कँट, द्वारका सेक्टर १३, ८ आणि १९ चौराहा, महिलापालपूर-द्वारका अंडरपाससह अनेक भागांमध्ये ट्रॅफिक जाममुळे गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Comments
Add Comment

अभिनेता सलमान खानने घेतली राजनाथ सिंह यांची भेट

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानने आज, रविवारी दिल्लीत लखनौचे खासदार आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट

आसारामला मोठा झटका! हायकोर्टाने अंतरिम जामीन नाकारला, ३० ऑगस्टपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश

नवी दिल्ली: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूच्या अडचणी

एकाच पाषाणात १९० टन वजनाची गणेशमूर्ती

कोईम्बतूर : दक्षिण भारतातील ‘मँचेस्टर’ म्हणून ओळखले जाणारे कोईम्बतूर शहर अद्वितीय गणेश मंदिरासाठी प्रसिद्ध

रशियाकडून तेल खरेदी करत भारताने रोखले जागतिक संकट, अहवालात मोठा खुलासा

नवी दिल्ली: रशियाकडून भारत तेल खेरदी करत असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या विरोधात

दहशतवादी संघटनांना मदत करणारा समंदर चाचा उर्फ '​​Human GPS' चकमकीत ठार, भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश

जम्मू आणि काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश आलं आहे. दहशतवादी

जम्मू-काश्मीर: रामबनमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार; तीन ठार, पाच बेपत्ता

जम्मू-काश्मीर: जम्मू आणि काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस आणि भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे.