Rain: वाहने-घरे पाण्यात, गुजरातचे रस्ते बनले नद्या, हवामान विभागाकडून रेड अलर्ट

गांधीनगर: गुजरातमध्ये पावसाने हाहाकार उडवला आहे. सुरत, कच्छसह अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात गेल्या ४८ तासांत मुसळधार पावसामुळे नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. यामुळे जिल्ह्यांतील अनेक सखल भागांमध्ये पाणी जमा झाले आहे. यातच हवामान विभागाने पावसापासून इतक्यात दिलासा नसल्याची शक्यता व्यक्त केली आहे. हवामान विभागाने तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.


मुसळधार पावसामुळे राजकोट येथील रस्त्यांवर पाणी साचले आहे. यामुळे वाहने पूर्णपणे बुडाली आहेत. घरांमध्ये इतके पाणी भरले आहे की वयस्कर व्यक्तींना खांद्यावर उचलून रेस्क्यू केले जात आहे. रस्त्याच्या वर वाहणाऱ्या पाण्याचा वेग इतका आहे की एका बाईकस्वाराने आपला बॅलन्स गमावला. त्याने स्वत:ला कसेतरी वाचवले मात्र बाईक पाण्यात वाहून गेली.


राजकोटचे रामनाथ महादेव मंदिरही अजूनही पावसाच्या विळख्यात आहे. आजूबाजूच्या भागांमध्ये मुसळधार पावसामुळे नद्या नाले दुथड्या भरून वाहत आहेत. अनेक पूल पाण्याखाली गेले आहे. गुजरातच्या खेडामध्ये शेढी नदीची पाण्याची पातळी इतकी वाढली की आजूबाजूचे गाव जलमग्न झाले.



हवामान विभागाचा रेड अलर्ट


हवामान विभागाने कच्छ, सौराष्ट्रसह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. अहमदाबाद, खेडा, आणंद, दाहोद, महिसागर, वडोदरा, पंचमहल, छोटाउदेपूर, भरूच, नर्मदामध्ये मुसळधार पावसाचा इशारा आहे. तर सूरत, तापी, नवसारी, डांग, वलसाड, दमन आणि दादरा नगर हवेली येथेही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

World Emoji Day : तुमचा आवडता इमोजी तुमच्या स्वभावाबद्दल काय सांगतो? जाणून घ्या!

WhatsApp, Instagram, Facebook किंवा DM... https://prahaar.in/2026/07/16/never-practice-these-8-habits-after-waking-up-in-the-morning-they-could-affect-your-health/ कुठेही Chat करताना आपण वापरत असलेले इमोजी आता

Murshidabad Train Accident : मुर्शिदाबादमध्ये भीषण अपघात! ट्रेन-स्कूल व्हॅनच्या धडकेत ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला.

Hydrogen Train : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला आज हिरवा झेंडा; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

जिंद : तब्बल ११० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९१६ मध्ये ईस्ट इंडिया रेल्वेने (East India Railway) जिंद–पानीपत रेल्वेमार्ग (Railway Line)

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती