मालवण घटनेचे कल्याण कनेक्शन; जयदीप आपटे आणि त्यांचे कुटुंबीय सुरक्षिततेच्या भीतीने घर सोडून पसार!

  61

कल्याणमधील शिल्पकार चर्चेत


कल्याण : मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर पुतळा बनवणारे कल्याणमधील कलाकार जयदीप आपटे आणि त्यांचे कुटुंबीय सुरक्षिततेच्या भीतीने घर सोडून इतरत्र स्थलांतरित झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबाला भीती वाटत आहे की या घटनेमुळे कोणी त्यांच्यावर हल्ला करेल.


मिळालेल्या माहितीनुसार, आपटे हे पत्नी आणि आईसोबत कल्याणमधील बाजारपेठ परिसरात राहतात. बाजारपेठ दुधनाका परिसरात आपटे राहत असलेल्या इमारतील सदनिकेत सद्य स्थितीत तेथे कोणीही नव्हते आणि शेजाऱ्यांनीही काहीही बोलण्यास नकार दिला.


आपटे २०१९ मध्ये चर्चेत आले जेव्हा आपटे यांच्या माध्यमातून यूके स्थित शीख सैनिक संघटनेने ब्रिटीश सैन्यासोबत दोन्ही महायुद्धात लढलेल्या शीख सैनिकांच्या सन्मानार्थ यॉर्कशायरमध्ये बनवलेल्या शीख सैनिकाचा कांस्य पुतळा आपटे यांनी त्यांच्या २५०चौरस फुटांच्या कार्यशाळेत ६.५ फुटांचा पुतळा तयार केला होता. ब्रिटीश आर्मी, रॉयल ब्रिटिश लीजन आणि किर्कलीस कौन्सिल यांच्या सहकार्याने संस्थेने वेस्ट यॉर्कशायर येथे एका विशेष समारंभात पुतळ्याचे अनावरण केले होते.


आपटे यांनी कलाविश्वात त्यांचा प्रवास जेजे स्कूलमध्ये सुरू केला, जिथे त्यांनी शिल्पकला आणि मॉडेलिंगमध्ये डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी कल्याणमध्ये स्वतःची कार्यशाळा उघडली, जिथे त्यांनी यापूर्वी महात्मा गांधींचे पुत्र मणिलाल गांधी यांचा गुजरातमधील दांडी स्मारकासाठी पुतळा तयार केला आहे.


आपटे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. त्यांच्या एका मित्राने नाव न सांगण्याची इच्छा व्यक्त केली आणि ते म्हणाले, "मला माझ्या मित्र मंडळातून कळले आहे की जयदीपकडून ही चूक कशी झाली आणि कोणी केली हे फक्त तोच सांगू शकतो, पण तो स्वतःहून चूक करणार नाही हे मला माहीत आहे.

Comments
Add Comment

ज्या कंपन्यांमुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत असेल त्यांच्यावर कारवाई करू

मुंबई : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमधून रसायन मिश्रीत पाणी नदीत सोडले जाते. यामुळे पिण्याचे पाणी

Devendra Fadanvis : "...नंतर गाशा गुंडाळून गायब होतात", CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन

'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही'- मुख्यमंत्री फडणवीस मुंबई : आज विधानसभेत टोरेस कंपनीच्या (Torres Company)

Maharashtra Monsoon Session 2025 : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ, नाना पटोलेंचे दिवसभरासाठी निलंबन, राहुल नार्वेकर भडकले अन् थेट

मुंबई : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळतंय.

मराठी भाषेबाबत तडजोड, गळचेपी सहन करणार नाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली शिवसेनेची भूमिका मुंबई : मराठी भाषेबाबत आपण कधीही तडजोड सहन करणार नाही,

महाराष्ट्रात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट पोस्टपेड मीटर

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार राज्यात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी