Women T20 World Cup 2024: भारत-पाकिस्तान यांच्यात रंगणार सामना, पाहा कधी असेल हा सामना

Share

मुंबई: महिला टी-२० वर्ल्डकप २०२४चे नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पाकिस्तानशी दुबईत सामना रंगणार आहे.

भारतीय महिला संघ आणि पाकिस्तान यांच्यात ६ ऑक्टोबरला हा सामना रंगणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना न्यूझीलंडशी होणार आहे. हा सामना दुबईत खेळवला जाईल. याआधी भारतीय संघ २ वॉर्मअप सामने खेळणार आहे. स्पर्धेचे आयोजन ३ ऑक्टोबरला होईल.

स्पर्धेसाठी दोन ग्रुप बनवण्यात आले आहेत. ग्रुप ए मध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेला ठेवण्यात आले आहे. तर ग्रुप बीमध्ये दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांग्लादेश आणि स्कॉटलंडला ठेवण्यात आले आहे.

महिला टी-२० वर्ल्डक २०२४चा पहिला सामना बांग्लादेश आणि स्कॉटलंड यांच्यात खेळवला जाईल. हा सामना शारजाहमध्ये ३ ऑक्टोबरला खेळवला जाईल. यानंतर दुसरा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेळवला जाईल. हा सामना ३ ऑक्टोबरलाच होईल.

भारत-पाकिस्तान सामना

टीम इंडियाचा पहिला सामना न्यूझीलंडशी रंगणार आहे. हा सामना ४ ऑक्टोबरला खेळवला जाईल. तर दुसरा सामना पाकिस्तानशी होईल. हा सामना ६ ऑक्टोबरला होईल. भारत आणि श्रीलंका यांच्यात ९ ऑक्टोबरला सामना रंगेल. टीम इंडियाचा चौथा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध शारजामध्ये रंगेल. हा सामना १३ ऑक्टोबरला खेळवला जाईल.

२० ऑक्टोबरला रंगणार फायनल

स्पर्धेत एकूण २३ सामने खेळवले जाणार आहेत. प्रत्येक टीमचे चार ग्रुप सामने खेळवले जातील. या सामन्यांआधी एकूण १० वॉर्मअप सामने खेळवले जातील. या वर्ल्डकपचा पहिला सेमीफायनल सामना १७ ऑक्टोबरला रंगेल तर दुसरा सेमीफायनल सामना १८ ऑक्टोबरला रंगेल. यानंतर फायनल सामना २० ऑक्टोबरला दुबईत खेळवला जाईल.

Recent Posts

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

12 minutes ago

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

40 minutes ago

PahalgamTerrorist Attack : डोंबिवलीच्या तीन जणांसह महाराष्ट्राचे चार पर्यटक ठार

पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…

1 hour ago

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

6 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

7 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

7 hours ago