पुतळा दुर्घटनेनंतर विरोधक घाणेरडे राजकारण करताहेत - आमदार नितेश राणे

कणकवली : राजकोट येथील छत्रपतींचा पुतळा कोसळल्‍यानंतर विरोधक मंडळी घाणेरडं राजकारण करत आहेत. भाजप सरकारला टार्गेट करत आहेत. पुतळा कोसळावा अशी कुणाचीच इच्छा नव्हती. पुतळा उभारणीमध्ये सर्वांनीच शंभर टक्‍के योगदान दिले होते. पण या घटनेचे राजकारण करून विरोधक विनाकारण सरकारला घेरण्याचा प्रयत्‍न करत आहेत, अशी टीका आमदार नितेश राणे यांनी आज केली.


कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्‍हणाले, पुतळा कोसळणे ही घटना राजकीय नाही. प्रत्‍येक माणसाला या घटनेमुळे तीव्र दु:ख झालंय. पुतळा उभाारणीसाठी पालकमंत्र्यांसह सर्वांनीच प्रामाणिकपणे योगदान दिलंय. तसंच या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशीही मागणी पालकमंत्र्यांसह आम्‍ही सर्वांनी केली आहे. कुणालाही या प्रकरणी पाठीशी घातलं जाऊ नये अशी आमची भूमिका आहे. परंतु राज्‍यभरातील विरोधी पक्षाची नेतेमंडळी मालवणात येऊन सरकारवर टीका करत आहेत. या मुद्द्यावर घाणेरडं राजकारण करत आहेत हे चुकीचं आहे.


राणे म्‍हणाले, आज सतेज पाटील यांनीही मालवणात येऊन टीका केली. पण विशाळगडावरील अतिक्रमणाबाबत ते काहीही बोलेले नाही. गडकिल्‍ल्‍यांवर होणाऱ्या अतिक्रमणाबाबत त्‍यांची काय भूमिका आहे हे आधी त्‍यांनी स्पष्‍ट करायला हवं. अाज कणकवली शहरातील शिवरायांच्या पुतळ्याला ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दुग्‍धाभिषेक केला. पण हाच पुतळा महामार्गाच्या मध्यभागी होता. कधीही अपघातग्रस्त होण्याची शक्‍यता होती. त्‍यावेळी ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना शिवरायांच्या पुतळ्याची फिकीर नव्हती. आमची सत्ता आल्‍यानंतर हा पुतळा आम्‍ही महामार्गाच्या बाजूला हलवला. त्‍यावेळी ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे शिवरायांवरील प्रेम कुठे गेले होते असे राणे म्‍हणाले.

Comments
Add Comment

लक्षवेधींची संख्या कमी केल्याने सत्ताधारी आणि विरोधी आमदारांकडून नाराजी

गटनेत्यांची बैठक घेणार; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आश्वासन मुंबई : राज्य विधिमंडळाच्या

भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईच्या अध्यक्षपदी दीपक सिंह यांची नियुक्ती

मुंबई : भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईचे महामंत्री दीपक आजाद सिंह यांची आज पक्षाचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम

Pune Crime: बर्थडे पार्टीत सनमचा मृत्यू, शरीरात आढळलं पुरुषाचं हृदय; थरारक प्रकरण 13 वर्षानंतरही रहस्यच

पुणे: भारतीय गुन्हेगारी इतिहासातील सर्वात रहस्यमय आणि अंगावर शहारे आणणारं प्रकरण म्हणून 'सनम हसन केस' ओळखली जाते.

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

करारी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पूजा सावंत

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत आघाडीच्या नायिकेला पोलिसांच्या वर्दीत पाहणं हे तसं दुर्मिळच. मात्र आगामी

आशिष शेलार यांनी केली ‘पीएम व्हिजन टू आर्ट’ स्पर्धेच्या विजेत्यांच्या नावाची घोषणा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी संपूर्ण भारत देशात ‘पीएम व्हिजन टू