पुतळा दुर्घटनेनंतर विरोधक घाणेरडे राजकारण करताहेत - आमदार नितेश राणे

कणकवली : राजकोट येथील छत्रपतींचा पुतळा कोसळल्‍यानंतर विरोधक मंडळी घाणेरडं राजकारण करत आहेत. भाजप सरकारला टार्गेट करत आहेत. पुतळा कोसळावा अशी कुणाचीच इच्छा नव्हती. पुतळा उभारणीमध्ये सर्वांनीच शंभर टक्‍के योगदान दिले होते. पण या घटनेचे राजकारण करून विरोधक विनाकारण सरकारला घेरण्याचा प्रयत्‍न करत आहेत, अशी टीका आमदार नितेश राणे यांनी आज केली.


कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्‍हणाले, पुतळा कोसळणे ही घटना राजकीय नाही. प्रत्‍येक माणसाला या घटनेमुळे तीव्र दु:ख झालंय. पुतळा उभाारणीसाठी पालकमंत्र्यांसह सर्वांनीच प्रामाणिकपणे योगदान दिलंय. तसंच या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशीही मागणी पालकमंत्र्यांसह आम्‍ही सर्वांनी केली आहे. कुणालाही या प्रकरणी पाठीशी घातलं जाऊ नये अशी आमची भूमिका आहे. परंतु राज्‍यभरातील विरोधी पक्षाची नेतेमंडळी मालवणात येऊन सरकारवर टीका करत आहेत. या मुद्द्यावर घाणेरडं राजकारण करत आहेत हे चुकीचं आहे.


राणे म्‍हणाले, आज सतेज पाटील यांनीही मालवणात येऊन टीका केली. पण विशाळगडावरील अतिक्रमणाबाबत ते काहीही बोलेले नाही. गडकिल्‍ल्‍यांवर होणाऱ्या अतिक्रमणाबाबत त्‍यांची काय भूमिका आहे हे आधी त्‍यांनी स्पष्‍ट करायला हवं. अाज कणकवली शहरातील शिवरायांच्या पुतळ्याला ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दुग्‍धाभिषेक केला. पण हाच पुतळा महामार्गाच्या मध्यभागी होता. कधीही अपघातग्रस्त होण्याची शक्‍यता होती. त्‍यावेळी ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना शिवरायांच्या पुतळ्याची फिकीर नव्हती. आमची सत्ता आल्‍यानंतर हा पुतळा आम्‍ही महामार्गाच्या बाजूला हलवला. त्‍यावेळी ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे शिवरायांवरील प्रेम कुठे गेले होते असे राणे म्‍हणाले.

Comments
Add Comment

राज्यात रहिवासी क्षेत्रासाठी तुकडेबंदी कायदा रद्द, कोणाला मिळणार फायदा?

मुंबई : राज्यातील नागरी भागातील तसेच प्रादेशिक योजनांमधील बिगर शेती वापर अनुज्ञेय क्षेत्रावरील जमिनींसाठी

दिव्यातील जळालेली वात फेकणे शुभ की अशुभ? जाणून घ्या सविस्तर....

मुंबई : घरात देवपूजा करताना किंवा दिवा लावताना वापरल्या जाणाऱ्या वाती अनेकजण सहजपणे कचऱ्यात फेकून देतात. मात्र,

उद्या शेअर बाजाराला सुट्टी! गुरूनानक जयंतीनिमित्त बाजार बंद राहील पुढील सणाची सुट्टी 'या' दिवशी !

प्रतिनिधी:उद्या शिख धर्म संस्थापक व शिखांचे पहिले गुरू गुरूनानक यांच्या जयंतीनिमित्त शेअर बाजार बंद राहणार आहे.

Adani Enterprises Q2FY26 Results: गौतम अदानींचा उद्योगविश्वात डंका ! फ्लॅगशिप अदानी एंटरप्राईजेसचा निकाल जाहीर नफा तब्बल ८४% वाढला अदानी म्हणाले,' शिस्तबद्ध अंमलबजावणी...

मोहित सोमण:काही क्षणापूर्वी उद्योगपती गौतम अदानी यांच्या समुहाची मुख्य फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्राईजेस

Breaking News : राज्यात निवडणुकीचे बिगुल वाजले; २ डिसेंबरला होणार मतदान

राज्यात आचारसंहिता लागू २४६ नगरपरिषद, ४२ नगरपंचायतींसाठी होणार मतदान २ डिसेंबरला मतदान, ३

जंजिरा किल्ला तब्बल नऊ दिवसांनी पर्यटकांसाठी झाला खुला

मुरुड : मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची मांदियाळी येत असते. अचानक हवामानात बदल