Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा पूरस्थिती; नागरिकांना काही दिवस सतर्कतेचे आवाहन!

  86

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur News) मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे (Heavy Rain) पुन्हा एकदा पूरस्थिती (Flood) निर्माण झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी १० फुटांनी वाढून ३४ फूटांवर पोहोचली आहे, ज्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील ४४ बंधारे पाण्याखाली गेले असून, पुढील दोन दिवसांतही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. राधानगरी आणि काळम्मावाडी धरण क्षेत्रात सलग तीन दिवस अतिवृष्टी होत आहे. राधानगरी धरणातील पाणी पातळी स्थिर झाल्यानंतर उघडलेले पाच दरवाजे बंद करण्यात आले होते, मात्र दोन दरवाजांतून अजूनही ४,३०० क्युसेस पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत सुरू आहे.


या धरण क्षेत्रात २४ तासांत १६४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.काळम्मावाडी धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कायम असून, धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी पाच दरवाजे २५ सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. या दरवाजांतून २,००० क्युसेस पाणी आणि पायथा वीजगृहातून १,००० क्युसेस पाणी दूधगंगा नदीत सोडले जात आहे. धरणात यंदा गळतीमुळे २२ टीएमसी पाणीसाठ्याची मर्यादा ठेवण्यात आली आहे, परंतु सध्या धरणात २३ टीएमसीहून अधिक पाणी साठवले गेले आहे. त्यामुळे अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या परिस्थितीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागात दुसऱ्यांदा पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठच्या परिसरात दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, तर माळरानावरील पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment

गाईच्या दूध खरेदी दरात वाढ, आता ३५ रुपये प्रतिलिटर दर

सोलापूर : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. खासगी आणि सहकारी दूध संघांनी गाईच्या

खातेअंतर्गत PSI परीक्षेचा मार्ग मोकळा, मिळणार २५ टक्के आरक्षण

राज्य सरकारने पीएसआय पदासाठी विभागीय परीक्षा पुन्हा सुरू केली मुंबई: राज्य सरकारने पीएसआय पदासाठी २५ टक्के

अटल सेतुसह अन्य टोल नाक्यावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी: प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई: राज्यातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला व वाहनधारकांना चालना देण्यासाठी टोल नाक्यावर टोलमाफी देण्याचे धोरण

Beed Crime : "परळी हादरली! आईला झोप लागली अन् चार वर्षांच्या चिमुकलीवर परळी रेल्वे स्थानकात अत्याचार, आरोपीला फाशीचीच मागणी

परळी : परळी रेल्वे स्थानक परिसरात अवघ्या चार वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराची घटना समोर

Nitesh Rane on Jarange Patil: जरांगेंचे आंदोलन संपल्यानंतर मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया, "ज्या फडणवीसांवर टीका करत होते, त्यांनीच..."

मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर गेले ५ दिवस नेते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण

Manoj Jarange health Update: मुंबईतील उपोषणानंतर जरांगे संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी प्रकृतीबाबत दिली ही माहिती

संभाजीनगर: आझाद मैदानावरील पाच दिवसांच्या आमरण उपोषणाची यशस्वी सांगता करत, अखेर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या