छत्रपतींचा पुतळा कोसळण्यामागे राजकीय कट - अतुल काळसेकर

  200

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील छत्रपतींचा पुतळा कोसळणारी घटना संशयास्पद आहे. त्या ठिकाणी विरोधकांकडून जातीय दंगल निर्माण करण्यासाठी हा कट आखला जाण्याची शक्यता आहे, असा आरोप भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर (Atul Kalsekar) यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी, सीसीटीव्ही फुटेज, सॅटेलाइट फुटेज या माध्यमातून सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी राज्य व देशाच्या गृह विभागाकडे केली आहे.


याबाबतची माहिती त्यांनी (Atul Kalsekar) प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे. त्यात असे म्हटले आहे की, नौदल दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मानाने ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर नौदलामार्फत हा पुतळा उभा करण्यात आला. प्रथमच असे ऐतिहासिक ठिकाण पुन्हा उभे करण्यात आले. मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्याला ३५० वर्षे पूर्ण होत असल्यामुळे त्यानिमित्ताने या जिल्ह्यात नौदल दिनाच्या प्रमुख कार्यक्रम झाला. यात केंद्र सरकार व राज्य सरकारने मिळून हा कार्यक्रम केला. या कार्यक्रमालाही जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व सरकारचे कौतुक केले. हे कौतुकही विरोधकांना रुचलेले नाही. आणि त्यामुळेच हा पुतळा पडण्यामागे राजकीय कटकारस्थान आहे असा आपला संशय आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.

Comments
Add Comment

Crizac Limited IPO: उद्यापासून Crizac आयपीओ बाजारात दाखल होणार Price Band २३३ ते २४५ रूपये निश्चित!

प्रतिनिधी: उद्यापासून क्रिझॅक लिमिटेड (Crizac Limited) कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी बाजारात दाखल होत आहे. ८६० कोटींचा

महाराष्ट्रात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट पोस्टपेड मीटर

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार राज्यात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र

PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेत आता मिळणार इतके व्याज, सरकारने केली घोषणा

नवी दिल्ली: भारत सरकारने स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवरील व्याजदर कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेत आतापर्यंत