छत्रपतींचा पुतळा कोसळण्यामागे राजकीय कट - अतुल काळसेकर

  249

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील छत्रपतींचा पुतळा कोसळणारी घटना संशयास्पद आहे. त्या ठिकाणी विरोधकांकडून जातीय दंगल निर्माण करण्यासाठी हा कट आखला जाण्याची शक्यता आहे, असा आरोप भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर (Atul Kalsekar) यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी, सीसीटीव्ही फुटेज, सॅटेलाइट फुटेज या माध्यमातून सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी राज्य व देशाच्या गृह विभागाकडे केली आहे.


याबाबतची माहिती त्यांनी (Atul Kalsekar) प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे. त्यात असे म्हटले आहे की, नौदल दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मानाने ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर नौदलामार्फत हा पुतळा उभा करण्यात आला. प्रथमच असे ऐतिहासिक ठिकाण पुन्हा उभे करण्यात आले. मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्याला ३५० वर्षे पूर्ण होत असल्यामुळे त्यानिमित्ताने या जिल्ह्यात नौदल दिनाच्या प्रमुख कार्यक्रम झाला. यात केंद्र सरकार व राज्य सरकारने मिळून हा कार्यक्रम केला. या कार्यक्रमालाही जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व सरकारचे कौतुक केले. हे कौतुकही विरोधकांना रुचलेले नाही. आणि त्यामुळेच हा पुतळा पडण्यामागे राजकीय कटकारस्थान आहे असा आपला संशय आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.

Comments
Add Comment

गणेशोत्सवानिमित्त रील स्पर्धेचे आयोजन; प्रथम बक्षीस १ लाख रुपये

मुंबई: यंदाच्या गणेशोत्सवाला एक नवा आयाम देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने एका अभिनव

Gold Smuggling: मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई... १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने जप्त!

मुंबई: कस्टम विभागाच्या पथकाने मुंबई विमानतळावरून एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीकडून १ कोटी

गणपतीला २१ मोदकांचा नैवेद्य का दाखवला जातो?

गणपती बाप्पाला मोदक खूप प्रिय आहेत, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. कोणताही सण किंवा पूजा असो, मोदकाशिवाय गणपतीची

गणपती बाप्पाला जाई, जुई आणि चमेलीची फुले का अर्पण करतात?

गणपती बाप्पाला दुर्वा आणि लाल जास्वंदीचे फूल प्रिय आहे, हे आपल्याला माहित आहे. पण बाप्पाच्या पूजेमध्ये जाई, जुई

Health: भोपळ्याच्या बिया आणि खजूर, झोपेसाठी उत्तम आहार

मुंबई : रात्री शांत आणि गाढ झोप लागणे हे आजच्या धावपळीच्या जीवनात एक मोठे आव्हान बनले आहे. अनेक जण निद्रानाश आणि

अंडाकरी बनवण्यास पत्नीने दिला नकार, पतीने केली आत्महत्या

धमतरी (छत्तीसगढ): छत्तीसगढमधील धमतरी जिल्ह्यात एक धक्कादायक आणि दु:खद घटना समोर आली आहे. एका पतीने केवळ त्याच्या