छत्रपतींचा पुतळा कोसळण्यामागे राजकीय कट - अतुल काळसेकर

  237

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील छत्रपतींचा पुतळा कोसळणारी घटना संशयास्पद आहे. त्या ठिकाणी विरोधकांकडून जातीय दंगल निर्माण करण्यासाठी हा कट आखला जाण्याची शक्यता आहे, असा आरोप भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर (Atul Kalsekar) यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी, सीसीटीव्ही फुटेज, सॅटेलाइट फुटेज या माध्यमातून सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी राज्य व देशाच्या गृह विभागाकडे केली आहे.


याबाबतची माहिती त्यांनी (Atul Kalsekar) प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे. त्यात असे म्हटले आहे की, नौदल दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मानाने ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर नौदलामार्फत हा पुतळा उभा करण्यात आला. प्रथमच असे ऐतिहासिक ठिकाण पुन्हा उभे करण्यात आले. मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्याला ३५० वर्षे पूर्ण होत असल्यामुळे त्यानिमित्ताने या जिल्ह्यात नौदल दिनाच्या प्रमुख कार्यक्रम झाला. यात केंद्र सरकार व राज्य सरकारने मिळून हा कार्यक्रम केला. या कार्यक्रमालाही जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व सरकारचे कौतुक केले. हे कौतुकही विरोधकांना रुचलेले नाही. आणि त्यामुळेच हा पुतळा पडण्यामागे राजकीय कटकारस्थान आहे असा आपला संशय आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.

Comments
Add Comment

'टॅरिफ 'मुळे कोकणचा आमरस संकटात

मुंबई (प्रतिनिधी) :अमेरिकेने भारतावर २५ टक्के टैरिफ लादल्यामुळे त्याचा फटका कोकणातील हापूस आमरस (मैंगो पल्प)

DSP सिराजला पोलीस विभागाने केला या खास अंदाजात सलाम, मोठ्या कामगिरीसाठी दिल्या शुभेच्छा

मुंबई: मोहम्मद सिराजला DSP सिराज यासाठी म्हटले जाते कारण तेलंगणा पोलीसमध्ये तो डीएसपी पदावर आहे. या मोहम्मद

Health: रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

मुंबई: ओवा हा भारतीय स्वयंपाकघरात वापरला जाणारा एक सामान्य मसाला आहे, पण त्याचे आरोग्यदायी फायदे खूप मोठे आहेत.

वादग्रस्त विधाने करू नयेत, सर्वांनी समन्वयाने काम करावे - आमदार दीपक केसरकर

सिंधुदुर्ग - महायुतीची सध्याची राजकीय परिस्थिती चांगली असून, कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची वादग्रस्त

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

"बाळाच्या रंगावरून बोलाल तर खबरदार..." टीव्ही अभिनेत्रीने ट्रोलर्सना खडसावले, केली थेट कायदेशीर कारवाई

हिंदी टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीच्या ७ महिन्यांच्या बाळाला सावळ्या रंगामुळे ट्रोल करण्यात