कोणाच्या नावावर आहे सर्वाधिक दिवस जागण्याचा रेकॉर्ड, किती आहे हे धोकादायक?

मुंबई: मनुष्याला जगण्यासाठी ऑक्सिजन आणि पाण्याची गरज असते. याशिवाय माणसाला जगण्यासाठी आणखी काही गोष्टींची गरज पडते. जसे माणसाच्या शरीरातील सर्व भाग चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी चांगली झोप घेणे आवश्यक आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का की जर एखादी व्यक्ती बराच काळ झोपली नाही तर त्यांच्या शरीराची स्थिती काय होईल.



मनुष्याची झोप


कोणत्याही व्यक्तीच्या शरीरासाठी झोप ही अतिशय गरजेची आहे. कारण जेव्हा व्यक्ती झोपके तेव्हा त्याची बॉडी चार्ज होते. एका व्यक्तीला दिवसभरातून कमीत कमी ६ ते ८ तासांची झोप घेणे गरजेचे असते. मात्र एक व्यक्ती रेकॉर्ड बनवण्यासाठी तब्बल १२ दिवस झोपला नव्हता. एक यूट्यूबर सर्वाधिक दिवस जागे राहण्याचा रेकॉर्ड बनवण्यासाठी १२ दिवसांपर्यंत झोपला नव्हता. लाईव्ह स्ट्रीमिंग केली होती. दरम्यान, त्या व्यक्तीचे काही मोठे नुकसान झाले नव्हते मात्र त्याच्या शरीरात अनेक बदल घडले होते.



किती दिवस जागे राहू शकतो व्यक्ती


ऑस्ट्रेलियाच्या यूट्यूबर नॉर्मेने सलग १२ दिवस जागत वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हा रेकॉर्ड बनवू शकला नव्हता. या दरम्यान नॉर्मेला अनेक त्रास सहन करावे लागले होते. मात्र गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने काही दिवसांआधीच अधिकृत विधान जारी करत सांगितले होते की ते या पद्धतीच्या कोणत्याही कामाला अधिकृतपणे मान्यता देणार नाही. यात धोका असू शकतो. गिनीज बुकच्या टीमच्या मते झोप ही माणसासाठी आवश्यक आहे. अशा पद्धतीचे रेकॉर्ड धोका निर्माण करू शकतात.



झोप घेणे गरजेचे


प्रत्येक व्यक्तीला ६ तासांची कमीत कमी झोप घेणे गरजेचे असते. तज्ञांच्या मते ज्या लोकांची झोप पूर्ण होत नाही त्यांना दुसऱ्या दिवशी थकवा, सुस्ती, कामात मन न लागणे या समस्या सतावतात. तसेच रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. विचार करण्याची समस्या, वजन वाढण्याचा धोका राहतो. याशिवाय डायबिटीजचा धोकाही वाढतो. याशिवाय कॅन्सरसारखे घातक आजार होण्याचा धोकाही वाढतो.

Comments
Add Comment

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे

तोंड येण्याची समस्या का होते? कारणे आणि घरगुती उपाय

मुंबई : तोंड येणे म्हणजे तोंडात किंवा जिभेवर येणारे छोटेसे पण वेदनादायक फोड. ही एक सामान्य समस्या असली, तरी