कोणाच्या नावावर आहे सर्वाधिक दिवस जागण्याचा रेकॉर्ड, किती आहे हे धोकादायक?

  52

मुंबई: मनुष्याला जगण्यासाठी ऑक्सिजन आणि पाण्याची गरज असते. याशिवाय माणसाला जगण्यासाठी आणखी काही गोष्टींची गरज पडते. जसे माणसाच्या शरीरातील सर्व भाग चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी चांगली झोप घेणे आवश्यक आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का की जर एखादी व्यक्ती बराच काळ झोपली नाही तर त्यांच्या शरीराची स्थिती काय होईल.



मनुष्याची झोप


कोणत्याही व्यक्तीच्या शरीरासाठी झोप ही अतिशय गरजेची आहे. कारण जेव्हा व्यक्ती झोपके तेव्हा त्याची बॉडी चार्ज होते. एका व्यक्तीला दिवसभरातून कमीत कमी ६ ते ८ तासांची झोप घेणे गरजेचे असते. मात्र एक व्यक्ती रेकॉर्ड बनवण्यासाठी तब्बल १२ दिवस झोपला नव्हता. एक यूट्यूबर सर्वाधिक दिवस जागे राहण्याचा रेकॉर्ड बनवण्यासाठी १२ दिवसांपर्यंत झोपला नव्हता. लाईव्ह स्ट्रीमिंग केली होती. दरम्यान, त्या व्यक्तीचे काही मोठे नुकसान झाले नव्हते मात्र त्याच्या शरीरात अनेक बदल घडले होते.



किती दिवस जागे राहू शकतो व्यक्ती


ऑस्ट्रेलियाच्या यूट्यूबर नॉर्मेने सलग १२ दिवस जागत वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हा रेकॉर्ड बनवू शकला नव्हता. या दरम्यान नॉर्मेला अनेक त्रास सहन करावे लागले होते. मात्र गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने काही दिवसांआधीच अधिकृत विधान जारी करत सांगितले होते की ते या पद्धतीच्या कोणत्याही कामाला अधिकृतपणे मान्यता देणार नाही. यात धोका असू शकतो. गिनीज बुकच्या टीमच्या मते झोप ही माणसासाठी आवश्यक आहे. अशा पद्धतीचे रेकॉर्ड धोका निर्माण करू शकतात.



झोप घेणे गरजेचे


प्रत्येक व्यक्तीला ६ तासांची कमीत कमी झोप घेणे गरजेचे असते. तज्ञांच्या मते ज्या लोकांची झोप पूर्ण होत नाही त्यांना दुसऱ्या दिवशी थकवा, सुस्ती, कामात मन न लागणे या समस्या सतावतात. तसेच रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. विचार करण्याची समस्या, वजन वाढण्याचा धोका राहतो. याशिवाय डायबिटीजचा धोकाही वाढतो. याशिवाय कॅन्सरसारखे घातक आजार होण्याचा धोकाही वाढतो.

Comments
Add Comment

शरीरात व्हिटॅमिन ई ची कमतरता का होते?

Vitamin E : व्हिटॅमिन ई हे एक आवश्यक पोषक तत्व आहे, जे केवळ आपल्या त्वचेच्या आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीच आवश्यक नाही,

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न