Modi Express : यंदाही गणेशोत्सवासाठी धावणार 'मोदी एक्सप्रेस'; चाकरमान्यांचा होणार मोफत प्रवास!

जाणून घ्या काय आहे वेळ, तारीख आणि तिकीट बुकींग प्रक्रिया


मुंबई : मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही भाजपा (BJP) पक्षाकडून कोकणात 'मोदी एक्सप्रेस' (Modi Express) सोडण्यात येणार आहे. भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ही गणेशभक्तांसाठी अभिनव प्रवास योजना सुरु केली आहे. १२ वर्षांपूर्वी सुरु झालेला हा प्रवास सुरुवातीला बसमार्फत सुरु केला होता, कालांतराने हा रेल्वेप्रवास सुरु केला. दरवर्षीप्रमाणे नागरिकांनी यंदाही या योजनेला भरघोस प्रतिसाद द्यावा असे आवाहन नितेश राणे यांनी केले.


त्याचबरोबर, मोदी एक्सप्रेस ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारचे तिकीट काढावे लागणार नाही. त्याचा प्रवास पूर्णपणे मोफत असेल. या गाडीचा संपूर्ण खर्च भाजपाकडून केला जाणार आहे. ही सुविधा फक्त एका दिवसासाठी असून प्रवासादरम्यान गणेशभक्तांना जेवण व पाण्याची सोय देखील उपलब्ध करुन दिली जाणार आहे.



मोदी एक्स्प्रेस कधी सुटणार?


ही गाडी ४ सप्टेंबर रोजी दादर स्थानकावरील ८नंबर प्लॅटफॉर्मवरुन सकाळी १० वाजता रवाना होणार आहे. या एक्सप्रेसच्या तिकीट बुकींगसाठी प्रवाशांना देवगड, कणकवली, वैभववाडी येथील भाजपाच्या मंडळ अध्यक्षांना संपर्क करावा लागणार आहे. तसेच २८, २९ आणि ३० ऑगस्ट हे तीन दिवस तिकीट बुकींग करु शकणार आहेत.

Comments
Add Comment

Mumbai-Goa National Highway : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; पाच जण गंभीर

Mumbai-Goa National Highway accident : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भरणेनाका येथे शनिवारी सकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. या

Eknath Shinde : मोदींचा करिष्मा अन् अमित शहांची चाणक्यनीती यशस्वी

पश्चिम बंगालमध्ये जनतेने विकासाला दिला कौल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सुवेंदू अधिकारी यांचे

SSC Result 2026 Marathi : दहावीच्या निकालातील धक्कादायक वास्तव : 'मायमराठी'तच राज्यातील ८० हजारांहून अधिक विद्यार्थी नापास!

एका बाजूला महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीची करण्यावरून राजकीय आणि सामाजिक पातळीवर

Satara Accident : नवा संसार थाटण्यापूर्वीच काळाचा घाला; ट्रक ५० फूट दरीत कोसळून चिमुकल्यासह चौघांचा करुण अंत

सातारा : सातारा जिल्ह्यातील कासरतळे (Kaasratale) परिसरात एका अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण अपघाताची नोंद झाली आहे. येथे

नाशिकच्या ‘कॉर्पोरेट जिहाद’नंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर

‘पॉश’ कायद्याची अंमलबजावणी अनिवार्य; कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले मुंबई : नाशिक येथील

Defamation on social media :सोशल मीडियावर बदनामी करणे महागात पडणार, कायद्यात बदल करण्यासाठी राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा (Social media platforms) वापर करून पुराव्यांविना केली जाणारी बदनामी (Defamation) आणि त्यातून