Janmashtami 2024 across India: भारतात ‘या’ ५ ठिकाणी उत्साहात साजरी केली जाते कृष्ण जन्माष्टमी!

कृष्ण जन्माष्टमीला जन्माष्टमी असंदेखील म्हणतात, हा एक मुख्य हिंदू सण आहे जो विष्णूचा आठवा अवतार भगवान कृष्णाच्या जन्माचे स्मरण करून देतो. भगवान कृष्णला हे करुणा, रक्षा आणि प्रेमाची देवता मानलं जाते. हिंदू धर्मातील श्रीकृष्ण हे सर्वात मोठ्या प्रमाणावर पूजल्या जाणाऱ्या आणि प्रिय देवतांपैकी एक आहेत. ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये येणाऱ्या भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी (आठवा दिवस) रोजी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. यावर्षी, भगवान कृष्णाची ५२५१ वी जयंती आहे जी सोमवार, २६ ऑगस्ट, २०२४ रोजी साजरी केली जाणार आहे.

श्रीकृष्ण जयंती आणि गोकुळाष्टमी यासह विविध नावांनी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. गुजरातमध्ये याला सतम अठम (Satam Atham) असं संबोधले जाते, तर दक्षिण भारतात, विशेषत: केरळमध्ये या सणाला अष्टमी रोहिणी असं म्हणतात. भारतात आणि जगभरातील हिंदूंद्वारे जन्माष्टमी उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी केली जाते. भारतात कृष्ण जन्माष्टमी कशी साजरी केली जाते हे आपण जाणून घेऊयात


१) मथुरा, उत्तर प्रदेशातील वृंदावन(. Mathura, Vrindavan in Uttar Pradesh):


भगवान कृष्णाचे जन्मस्थान मथुरेला जन्माष्टमीच्या वेळी विशेष महत्त्व आहे, कारण यादिवशी कृष्णभक्त दिवसभर उपवास करतात, मध्यरात्रीपर्यंत जागरण करतात, जे कृष्णाच्या जन्माचे प्रतीक असल्याचे मानलं जातं. मध्यरात्रीची पूजा ही एक खास गोष्ट आहे, ज्या दरम्यान कृष्णाच्या मूर्तीला विधीपूर्वक स्नान करून नवीन कपडे घातले जातात. मथुरेतील लोकं कृष्णाच्या जन्माची कथा दर्शविणारी पालखी तयार करतात, ज्याला झांकी असेही म्हणतात. कृष्णाच्या जीवनामधील आणखी एक महत्त्वाचे स्थान वृंदावन, कृष्णाच्या बालपणाचं आणि किशोरवयीन वर्षांशी आणि त्यांच्या प्रसिद्ध रास लीलांशी संबंधित आहे. जवळपास १० दिवस अगोदर वृंदावनात जन्माष्टमीचा उत्सव सुरू होतो. ज्या दिवशी कृष्णाचे जीवन रास लीलांद्वारे, झांकीस अभिषेकसह पुन्हा निर्माण केले जाते, त्या दिवशी कृष्णाचे भव्य विधीवत स्नान केले जाते.


२) महाराष्ट्रातील पुणे, मुंबई( Pune, Mumbai in Maharashtra):


माखनचोर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंडस कृष्णाला लहान असताना दही आणि ताक खाण्याची फार आवड होती. याच्या स्मरणार्थ आणि कृष्णाचे बालपण पुन्हा अुभण्यासाठी, जन्माष्टमी हा सण पुणे, मुंबई आणि महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी दहीहंडी म्हणून साजरा केला जातो. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, भाविक एकावर एक थर लावून मस्तपैकी दहीहंडी फोडतात. दही आणि सुक्या मेव्याने भरलेले मातीचे भांडे (हंडी) अतिशय उंचावर बांधले जाते जे फोडण्यासाठी गोविंदा एकमेकांच्या खांद्यावर उभे राहून ऐकावर एक अनेक थर लावतात आणि ती दहीहंडी फोडतात. तर राज्यात अनेक ठिकाणी दहीहंडी फोडण्याची स्पर्धा आयोजित केली जाते जे मोठ्या उंचीवर टांगले जातात. मुंबई आणि पुण्यातील दहीहंडी सोहळा पाहण्यासाठी लोक आवर्जून येतात सुट्टी घेऊन दहीहंडी बघण्यास जातात.


३) गोकुळ, उत्तर प्रदेश ( Gokul, Uttar Pradesh):


मथुरेजवळ असलेले गोकुळ कृष्णाच्या बालपणाशी जवळून जोडलेले आहे. इथल्या जंगलात गाईंचा कळप चरत असे. विशेष म्हणजे, जन्माष्टमी वास्तविक उत्सवाच्या दिवसानंतर एक दिवस साजरी केली जाते, कारण पौराणिक कथेनुसार, कृष्णाचा जन्म झाल्यानंतरच्या दिवशी मध्यरात्रीनंतर त्याला गोकुळात आणण्यात आले होते. येथील उत्सव अद्वितीय आहेत – मध्यरात्री, गोकुळचे लोक गंगा नदीचे पवित्र पाणी, तसेच दही, दूध आणि अमृत कृष्णाच्या मूर्तीवर ओततात. स्थानिक लोक हलक्याफुलक्या उपक्रमांमध्येही भाग घेतात आणि एकमेकांना हळदी आणि दूध लावून खेळ खेळतात. या काळात, राधा दामोदर आणि राधा रमण मंदिरे ही प्रमुख धार्मिक केंद्रे आहेत ज्यांना सर्वाधिक पर्यटक भेट देतात.


४) राजस्थानातील नाथद्वारा मंदीर(Nathdwara in Rajasthan) :


श्रीकृष्णाच्या रुपातलं श्री नाथजींचे भव्य रूप या नाथद्वारा मंदिरात आहे. श्रीनाथजींची मूर्ती पूर्वी मथुरेजवळील गोकुळमध्ये होती. पण जेव्हा औरंगजेबाला ते नष्ट करायचे होते तेव्हा वल्लभ गोस्वामींनी ते राजस्थानमध्ये नेले. ज्या ठिकाणी मूर्तीची पुनर्स्थापना करण्यात आली त्या जागेला नाथद्वारा असं म्हणतात. नाथद्वारा प्रसिद्ध श्रीनाथजी मंदिरात जन्माष्टमी मोठ्या उत्सवाने आणि मोठ्या भक्तीने साजरी केली जाते. श्रीकृष्णाला त्यांच्या बालस्वरूपात श्रीनाथजी म्हणून समर्पित केलेले त्या दिवशी विशेष समारंभ आयोजित केले जातात तेव्हा मंदिर अतिशय सुंदरपणे सजवले जाते. भक्त प्रार्थना करण्यासाठी भक्तिगीते गाण्यासाठी आणि प्रसाद वाटपात भाग घेण्यासाठी एकत्र येतात.


५) गुजरातमधील द्वारका (Dwarka in Gujarat):


द्वारका, हे कृष्णाने स्वतः स्थापन केलेले पौराणिक शहर, भव्य जन्माष्टमी उत्सव आयोजित करते. मंदिरे भव्यपणे सजवली जातात आणि कृष्णाच्या सन्मानार्थ विस्तृत विधींची मालिका केली जाते. भक्तगण मोठ्या संख्येने स्तोत्र गाण्यासाठी आणि देवतेला विशेष भोग अर्पण करण्यासाठी एकत्र येतात.

 

 

 
Comments
Add Comment

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे

अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले होणार

संसदेत आज सादर होणार विधेयक नवी दिल्ली : भारत एका मोठ्या ऊर्जा सुधारणेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंकज चौधरी उत्तर प्रदेश भाजपचे नवे अध्यक्ष

लखनऊ : उत्तर प्रदेश भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रविवारी केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या

एक हजार कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीमागे ४ चिनी नागरिक

सीबीआयच्या आरोपपत्रात मोठा खुलासा नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने १७ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

प्रवाशांचा संताप ! 'इंडिगो'विरुद्ध सामूहिक भरपाईची मागणी

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला सध्या गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. विमानांच्या