ही पाने आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतात. दररोज रिकाम्या पोटी ५ ते ६ चावून पाणी प्यायल्याने शरीरात अनेक चमत्कारी फायदे मिळतात. जाणून घेऊया याच्या फायद्यांबद्दल...
केसांचे आरोग्य
यात अँटी ऑक्सिडंट आणि प्रोटीन असतात जे फ्री रॅडिकल्सपासून लढण्यास मदत करतात. तसेच केसांना स्ट्राँग आणि हेल्दी बनवतात. यामुळे तुमचे केस वेळेआधी पांढरे होत नाही.
रोगप्रतिकार शक्ती वाढते
कडीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण भरपूर असते. याच्या सेवनाने इम्युन सिस्टीम मजबूत होते यामुळे तुम्ही आजारी पडत नाहीत.
डोळ्यांचे आरोग्य सुधारते
कडीपत्त्यामध्ये व्हिटामिन ए चे प्रमाण अधिक असते जे डोळ्यांना कमजोर बनण्यापासून वाचवतात.
सकाळचा थकवा कमी होतो
सकाळी रिकाम्या पोटी कडिपत्त्याचे सेवन केल्याने गॅस आणि ब्लोटिंगची समस्या दूर होते.
वेट लॉसhe
कडिपत्त्याचे सेवन केल्याने लठ्ठपणाची समस्या दूर होते. सोबतच हे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलचा स्तरही कमी होतो.
त्वचेचे इन्फेक्शन दूर होते
कडिपत्त्यामध्ये अँटी ऑक्सिडंट, अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुण यामुळे त्वचेचे इन्फेक्शन दूर होते.