अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने राजापूर-कोल्हापूर मार्ग बंद

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटात आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. त्यामुळे राजापूर ते कोल्हापूर मार्गावरची वाहतूक बंद पडली आहे.


सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबी आणि कर्मचारी तातडीने घाटात पाठविले असून वाहतूक पूर्ववत सुरू करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. राजापूर आणि परिसरातून कोल्हापूरकडे जाणारा हा सर्वात जवळचा घाटस्ता आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक त्याच घाटातून सुरू असते. अणुस्कुरा घाटातील निसर्गसौंदर्यही अप्रतिम असल्याने अनेक पर्यटक याच मार्गाने प्रवास करतात. दरड कोसळल्याने सध्या वाहतूक बंद पडली आहे. सायंकाळपर्यंत वाहतूक सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र त्या भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घाटाच्या दुरुस्तीच्या कामात अडथळे येत आहेत.

Comments
Add Comment

उद्योगांना एलपीजीचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील - राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

मुंबई : महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच आहे, या भूमिकेतून राज्य शासन सर्वतोपरी

मंत्रालय प्रवेशासाठी लागणारी १० हजार ओळखपत्रे गायब

मुंबई : मंत्रालयातील प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘डिजी प्रवेश’ प्रणालीतील १०

Ladaki Bahin Yojna E Kyc : ई-केवायसी न केल्याने लाडकी बहीण योजनेतील ६८ लाख खाती बंद

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहिण योजना’ संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत अनिवार्य

ऑपरेशन टायगर? : शिवसेनेच्या मेजवानीला ‘उबाठा’च्या खासदारांची हजेरी

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी जोर धरलेला असतानाच, बुधवारी रात्री राजधानी

SSC Exam 2026 Major Reform : कागदपत्रांचा गोंधळ संपणार! आता 'मार्कशीट' आणि 'पासिंग सर्टिफिकेट' मिळणार...बोर्डाचा नवीन निर्णय काय ?

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक

Luthra Brothers : गोवा नाईट क्लब अग्नितांडव प्रकरणी लुथरा बंधूंना जामीन मंजूर

उत्तर गोव्यातील नाईटक्लब आगीच्या दुर्घटनेशी संबंधित प्रकरणात एक मोठे वळण आले आहे. अंजुनाजवळील 'बर्च बाय रोमियो