मौनातला संवाद आणि शांततेचा आवाज...!

राजरंग- राज चिंचणकर

अनेक नाट्यकृती, चित्रपट व मालिकांमध्ये विविध प्रकारच्या भूमिका रंगवत अभिनेत्री शीतल क्षीरसागर हिने स्वतःचा ठसा उमटवला आहे. काही वर्षांपूर्वी शीतलने ‘एक होती वादी’ या चित्रपटात काम केले होते. विशेष म्हणजे, एका कर्णबधिर मुलीची भूमिका तिला यात साकारायची होती. अर्थात, त्यासाठी अभ्यास हा आलाच. त्यासाठी शीतल कर्णबधिर व्यक्तींच्या एका ग्रुपला भेटायला शिवाजी पार्कात गेली.


शिवाजी पार्क जिमखान्याच्या मागे असलेल्या हिरवळीवर तिची या ग्रुपशी भेट झाली. या कर्णबधिर मंडळींनी सांगितलेले; तसेच शीतलने बोललेले एकमेकांना समजावे आणि त्यांच्याशी नीट संवाद साधता यावा म्हणून तिने सोबत डायरी व पेन ठेवले होते. त्यांच्याशी भेट झाल्यावर शीतलने डायरीत लिहिलेली स्वतः विषयीची माहिती त्यांना वाचायला दिली. एका चित्रपटातल्या भूमिकेसाठी ती त्यांना भेटायला आल्याचा त्यांना खूप आनंद झाला होता.


शीतल त्यांच्याशी बोलत असतानाच त्यांच्या संवादाच्या खुणाही शिकून घेत होती. त्यांचा मौनातला हा संवाद बराच वेळ सुरू होता. या संवादाबद्दल बोलताना शीतल सांगते, “आम्ही बोलत असताना सोबत प्रचंड शांतता होती. माझ्यासाठी हे सर्व फार वेगळे होते. संवाद साधत असताना मला खूप ताण जाणवत होता. त्यावेळी मला काही ऐकू येत नव्हते; पण माझे डोळे आणि माझी त्वचा ‘ऐकण्याचे’ काम करत होती. आपल्या एखाद्या इंद्रियाकडून अपेक्षित असलेले कार्य होऊ शकत नसले तर, इतर इंद्रिये ती उणीव कशी भरून काढतात; याची मला त्यावेळी जाणीव होत राहिली. माझ्या भूमिकेच्या निमित्ताने मी त्या मंडळींना भेटले; पण त्या भेटीपासून माणसांना समजून घेण्याचा माझा ‘पेशन्स’ खूप वाढला. त्या संध्याकाळी मी प्रचंड नि:शब्द अशी शांतता अनुभवली आणि शांततेचा आवाज काय असतो, याची जाणीवही मला त्या दिवशी प्रकर्षाने झाली. त्या शांततेने मला माझ्या भूमिकेचा आवाज मिळवून दिला.”

Comments
Add Comment

भारतातील पहिले एआय-आधारित तिकीट बुकिंग व्यासपीठ ‘थम्पएन’ सुरू

देशातील लाइव्ह मनोरंजन क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित पहिले डिस्कव्हरी आणि तिकीट बुकिंग

रंगभूमी आणि बदलता विनोद...

मराठी नाट्यक्षेत्रात सुरू झालेला 'नाट्य निरंतर' हा उपक्रम अल्पावधीतच रसिकांच्या पसंतीस उतरत असल्याचे दिसून येत

आसमंताच्या रंगमंचावरचे 'आषाढ नाट्य'

राजरंग-राज चिंचणकर आषाढ महिन्याची चाहूल लागली की कवी कुलगुरू कालिदासाने 'मेघदूत' या महाकाव्यात वर्णन केलेल्या

‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेमुळे मिळाली ओळख

टर्निंग पॉइंट-युवराज अवसरमल      रात्रीस खेळ चाले’ या भयपट मालिकेमुळे अनेक कलाकार प्रसिद्धीच्या शिखरावर

'बाईंची शाळा': एक आठवण

मराठी रंगभूमीवर 'बाई' या संबोधनाने ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांनी या आठवड्यात आयुष्याच्या

रंगभूमीवरच्या कुटुंबात ‘नूपुर’ नाद...

राजरंग-राज चिंचणकर   कााही वर्षांपूर्वी दूरचित्रवाणीवर प्रसारित झालेल्या 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेत