Nitesh Rane : महाविकास आघाडी नेत्यांचे घाणेरडे राजकारण; त्यांना सत्तेशिवाय काहीच दिसत नाही!

न्यायालयावर खुर्ची लावून संजय राऊत सारख्या माकडाला बसवा


आमदार नितेश राणे यांचा विरोधकांवर हल्लाबोल


मुंबई : बदलापुरमध्ये (Badlapur Crime) काल जो काही विकृत प्रकार झाल्यानंतर राज्यातील सर्व प्रतिनिधी सरकार काल अ‍ॅक्शन मोडवर गेला आहे. महायुती (Mahayuti) सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी अ‍ॅक्शन घ्यायला सुरु केली. यातच एकीकडे एसआयटी स्थापन झाली आहे आणि सरकार म्हणून सगळ्यांच एकस्पष्ट मत आहे की, कुठल्याही परिस्थितीमध्ये बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. फाशीच्या शिवाय दुसरी कोणताही पर्याय असता कामा नये, ही भूमिका मांडली आहे. मात्र तरीही महाविकास आघाडीमधील मालक आणि त्यांचे चेले अत्याचार प्रकरणाबाबत त्यांचे घाणेरडे राजकारण दाखवत आहेत, असा घणाघात आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला.


काल बदलापूरमध्ये झालेल्या जनक्षोभानंतर राज्यसरकार अ‍ॅक्शन मोडवर गेला आहे. त्याप्रमाणे कारवाई देखील सुरु झाली आहे. मात्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), संजय राजाराम राऊत (Sanjay Raut) आणि सुप्रिया सुळे यांना सत्तेशिवाय काही येत नाही. महायुती सरकारचे विरोधक इतक्या खालच्या दर्जाचे असतील, याची कोणालाही अपेक्षा नाही. कारण कोलकातामध्ये झालेल्या हत्याकांड तसेच बांग्लादेशमधील हिंदूंबद्दल झालेल्या हिंसाचाराबाबत महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्यांनी आपले वक्त्व्य मांडले नाही. परंतु काल बदलापूर प्रकरणाबाबत यांनी मांडलेले त्यांचे वकत्तव्य हे फक्त घाणेरडे राजकारण होते. त्यांनी केलेले वकत्व्य हे कोणत्याही माताभगिनी किंवा महाराष्ट्रासाठी नसून केवळ सत्तेसाठी होते. त्यांना 'सत्ता एके सत्ता' याशिवाय त्यालोकांना काहीही दिसत नाही, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.



संजय राऊतने 'लाडकी डॉक्टर योजना' राबवावी


त्याचबरोबर, महाविकास आघाडीचे सरकार असताना महिला किती सुरक्षित होत्या याचा पाढा वाचावा लागेल, त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतने बोलूच नये. उद्धव ठाकरेच्या घरामध्येच एक बलात्कारीचा आरोपी आहे, जो त्याच्यासोबत मातोश्रीमध्ये राहतो. तर संजय राजाराम राऊत याने आता 'लाडकी डॉक्टर योजना' राबवली पाहिजे. कारण एका डॉक्टर महिलेचा कसा छळ होतो, हे तिने सातत्याने पोलिसांना सांगितलेले आहे. त्यामुळे यांची माताभगिनींबद्दल बोलण्याची लायकी नाही, अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली. तसेच महायुती सरकार या प्रकरणातील कोणत्याही आरोपीला सोडणार नाही. त्यांना फाशीवर चढवल्याशिवाय गप्प बसणार नाही, ही स्पष्ट भूमिका नितेश राणे यांनी मांडली.



संजय राऊत शेंबड्यासारखे बडबडू नकोस


ज्या शाळेत ही घटना घडली ती भाजपाच्या संबंधित आहे. तसेच जेव्हा अशा घटना घडतात, तेव्हा न्यायालय दखल घेतात परंतु अशा घटनेनंतर न्यायालयाने का दखल घेतली नाही, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. त्यावर नितेश राणे यांनी चोख उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, 'भाजपाच्या संबधित जरी ही घटना घडली असेल तरीही आम्ही कारवाई करण्याचे थांबलो नाही. तुझ्या नालायक मालकासारखे आम्ही सरकार चालवत नाही. जो कोणी आरोपी होता, ज्या संस्थेमध्ये हे घडले आणि अशी घटना कधीही आपल्या संस्थेत घडू नये असे प्रत्येक संस्थेला वाटते. म्हणून भाजपाच्या संबंधित ही संस्था असली तरीही कारवाई होत आहेच. म्हणून उगाच शेंबड्यासारखे बडबडत राहू नकोस, असे म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊतला फटकारले.


तसेच न्यायालयालाही मार्गदर्शन करण्याइतका तू दीड शहाणा झाला आहे. तर आता न्यायालयावर अजून एक खुर्ची लावून संजय राजाराम राऊत सारख्या माकडाला बसवा, असे म्हणत नितेश राणे यांनी डिवचले.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य