पीएमईजीपी युनिट्सच्या भौतिक सत्यापनासाठी केव्हीआयसी आणि पोस्ट विभागात सामंजस्य करार

  34

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित भारत संकल्पाच्या पूर्ततेसाठी मंगळवारी खादी आणि ग्रामोद्योग आयोग (केव्हीआयसी), सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय (एमएसएमई) यांनी नवी दिल्लीतील राजघाट कार्यालयात संचार मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत पोस्ट विभागासह महत्वाचा सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या अंतर्गत देशभरात कार्यरत पोस्ट विभागाचे कर्मचारी प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम (पीएमईजीपी) अंतर्गत देशभरात उघडण्यात आलेल्या नव्या युनिट्सचे भौतिक सत्यापन करतील. भौतिक सत्यापनासाठी पोस्ट विभागाच्या कर्मचार्यांना केव्हीआयसी प्रशिक्षणही देईल.


केव्हीआयसी अध्यक्ष मनोज कुमार, एमएसएमई मंत्रालयाचे संयुक्त सचिव विपुल गोयल, केव्हीआयसीचे सीईओ वात्सल्य सक्सेना आणि पोस्ट विभागाच्या महाप्रबंधक सुमनीषा बंसल बादल यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर पोस्ट विभागाच्या वतीने उप महाप्रबंधक डॉ. अमनप्रीत सिंग आणि केव्हीआयसीच्या वतीने उप मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमईजीपी राजन बाबू यांनी स्वाक्षरी केली. याच्या माध्यमातून केव्हीआयसीला देशभरातील 1,65,000 पोस्ट ऑफिसांची, ज्यामध्ये 139,067 ग्रामीण क्षेत्रात कार्यरत आहेत, सेवांचा लाभ मिळेल.


या प्रसंगी केव्हीआयसी अध्यक्ष मनोज कुमार यांनी सांगितले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या दृष्टिकोनानुसार दोन सरकारी विभागांदरम्यान परस्पर कार्यसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी केव्हीआयसीने पोस्ट विभागासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. याच्या माध्यमातून 150 वर्षांपेक्षा जास्त जुन्या पोस्ट विभागाच्या संपूर्ण देशभरातील संचार नेटवर्कचा लाभ केव्हीआयसीला मिळेल. यामुळे पीएमईजीपी युनिट्सच्या भौतिक सत्यापनासह मार्जिन मनी सबसिडीचे निस्तारणही वेगाने होईल. अध्यक्ष केव्हीआयसी यांनी सांगितले की, पीएमईजीपीने संपूर्ण भारतात उद्यमिता वाढवली आहे आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या आहेत. योजनेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत पीएमईजीपीने 9.69 लाखांपेक्षा जास्त नवीन प्रकल्प स्थापनेसाठी सहकार्य प्रदान केले आहे आणि 84.64 लाखांपेक्षा जास्त उद्यमींसाठी रोजगार तयार केला आहे. आतापर्यंत या योजनेद्वारे 69021.29 कोटी रुपये ऋणांच्या तुलनेत 25563.44 कोटी रुपये मार्जिन मनी सबसिडी वितरित करण्यात आली आहे. गेल्या वित्तीय वर्ष 2023-24 मध्ये पीएमईजीपीने 9.80 लाखांपेक्षा जास्त उद्यमींसाठी रोजगार निर्माण केला आणि 3093 कोटी रुपयांपेक्षा जास्त मार्जिन मनी सबसिडी वितरित केली आहे.


अध्यक्ष केव्हीआयसी पुढे म्हणाले की, गेल्या 10 वर्षांत पूज्य बापूंच्या वारशाने खादीला विकसित भारताची हमी दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आणि एमएसएमई मंत्रालयाच्या मार्गदर्शनात स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रातील व्यवसायाने 1 लाख 55 हजार कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. प्रधानमंत्रींच्या ब्रँडशक्तीमुळे गेल्या 10 वर्षांत खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांच्या विक्रीत पाचपट आणि उत्पादनात चारपट वाढ झाली आहे. या क्षेत्रात प्रथमच 10.17 लाख नवीन रोजगार निर्माण झाले आहेत.


कार्यक्रमात पोस्ट विभाग आणि केव्हीआयसीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण

तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे

Crime News : धक्कादायक! महाराष्ट्रातील ७० वर्षीय आजीवर पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार; ब्लँकेटने झाकले अन्...

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पहलगाममध्ये

IMD Monsoon Alert: जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार, हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज

नवी दिल्ली: भारतीय हवामान विभागाने (IMD) जुलै महिन्यासाठी दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. देशवासीयांना या महिन्यात

LPG Cylinder Price Cut : LPG ग्राहकांना दिलासा! आजपासून कमी झाली किंमत; 'हे' आहेत नवे दर

व्यावसायिक सिलिंडर स्वस्त नवी दिल्ली : जुलै महिन्याच्या पहिल्याचं दिवशी (July 2025) एलपीजी ग्राहकांना दिलासा मिळाला