Categories: देश

पीएमईजीपी युनिट्सच्या भौतिक सत्यापनासाठी केव्हीआयसी आणि पोस्ट विभागात सामंजस्य करार

Share

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित भारत संकल्पाच्या पूर्ततेसाठी मंगळवारी खादी आणि ग्रामोद्योग आयोग (केव्हीआयसी), सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय (एमएसएमई) यांनी नवी दिल्लीतील राजघाट कार्यालयात संचार मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत पोस्ट विभागासह महत्वाचा सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या अंतर्गत देशभरात कार्यरत पोस्ट विभागाचे कर्मचारी प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम (पीएमईजीपी) अंतर्गत देशभरात उघडण्यात आलेल्या नव्या युनिट्सचे भौतिक सत्यापन करतील. भौतिक सत्यापनासाठी पोस्ट विभागाच्या कर्मचार्यांना केव्हीआयसी प्रशिक्षणही देईल.

केव्हीआयसी अध्यक्ष मनोज कुमार, एमएसएमई मंत्रालयाचे संयुक्त सचिव विपुल गोयल, केव्हीआयसीचे सीईओ वात्सल्य सक्सेना आणि पोस्ट विभागाच्या महाप्रबंधक सुमनीषा बंसल बादल यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर पोस्ट विभागाच्या वतीने उप महाप्रबंधक डॉ. अमनप्रीत सिंग आणि केव्हीआयसीच्या वतीने उप मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमईजीपी राजन बाबू यांनी स्वाक्षरी केली. याच्या माध्यमातून केव्हीआयसीला देशभरातील 1,65,000 पोस्ट ऑफिसांची, ज्यामध्ये 139,067 ग्रामीण क्षेत्रात कार्यरत आहेत, सेवांचा लाभ मिळेल.

या प्रसंगी केव्हीआयसी अध्यक्ष मनोज कुमार यांनी सांगितले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या दृष्टिकोनानुसार दोन सरकारी विभागांदरम्यान परस्पर कार्यसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी केव्हीआयसीने पोस्ट विभागासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. याच्या माध्यमातून 150 वर्षांपेक्षा जास्त जुन्या पोस्ट विभागाच्या संपूर्ण देशभरातील संचार नेटवर्कचा लाभ केव्हीआयसीला मिळेल. यामुळे पीएमईजीपी युनिट्सच्या भौतिक सत्यापनासह मार्जिन मनी सबसिडीचे निस्तारणही वेगाने होईल. अध्यक्ष केव्हीआयसी यांनी सांगितले की, पीएमईजीपीने संपूर्ण भारतात उद्यमिता वाढवली आहे आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या आहेत. योजनेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत पीएमईजीपीने 9.69 लाखांपेक्षा जास्त नवीन प्रकल्प स्थापनेसाठी सहकार्य प्रदान केले आहे आणि 84.64 लाखांपेक्षा जास्त उद्यमींसाठी रोजगार तयार केला आहे. आतापर्यंत या योजनेद्वारे 69021.29 कोटी रुपये ऋणांच्या तुलनेत 25563.44 कोटी रुपये मार्जिन मनी सबसिडी वितरित करण्यात आली आहे. गेल्या वित्तीय वर्ष 2023-24 मध्ये पीएमईजीपीने 9.80 लाखांपेक्षा जास्त उद्यमींसाठी रोजगार निर्माण केला आणि 3093 कोटी रुपयांपेक्षा जास्त मार्जिन मनी सबसिडी वितरित केली आहे.

अध्यक्ष केव्हीआयसी पुढे म्हणाले की, गेल्या 10 वर्षांत पूज्य बापूंच्या वारशाने खादीला विकसित भारताची हमी दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आणि एमएसएमई मंत्रालयाच्या मार्गदर्शनात स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रातील व्यवसायाने 1 लाख 55 हजार कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. प्रधानमंत्रींच्या ब्रँडशक्तीमुळे गेल्या 10 वर्षांत खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांच्या विक्रीत पाचपट आणि उत्पादनात चारपट वाढ झाली आहे. या क्षेत्रात प्रथमच 10.17 लाख नवीन रोजगार निर्माण झाले आहेत.

कार्यक्रमात पोस्ट विभाग आणि केव्हीआयसीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Recent Posts

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

24 minutes ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

24 minutes ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

26 minutes ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

39 minutes ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

43 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: लखनऊचे दिल्लीला १६० धावांचे आव्हान

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…

1 hour ago