Jio ने वाढवले Airtel आणि BSNLचे टेन्शन, २०० रूपयांपेक्षाही स्वस्त प्लान

मुंबई: रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही ना काही नवे रिचार्ज प्लान्स लाँच करत असते. यातच कंपनीने बाजारात नवा रिचार्ज प्लान लाँच केला आहे. याची किंमत २०० रूपयांपेक्षाही कमी आहे.


खरंतर, रिलायन्स जिओने आपला १९८ रूपयांचा रिचार्ज प्लान सादर केला आहे. यात युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगसोबत दररोज २ जीबी इंटरनेट डेटाही मिळतो. यात अनेक फायदे देण्यात आले आहेत. कंपनीच्या या नव्या रिचार्ज प्लानमुळे एअरटेल आणि बीएसएनएलचे टेन्शन नक्कीच वाढू शकते.



जिओचा नवा रिचार्ज प्लान


या नव्या रिचार्ज प्लानमध्ये अनेक फायदे मिळतात. दरम्यान, याची व्हॅलिडिटी जास्त नाही आहे. हा कंपनीचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान मानला जात आहे. तर याशिवाय कंपनीचा १८९ रूपयांचा रिचार्ज प्लानही आहे. इतकंच नव्हे तर जास्त व्हॅलिडिटीसाठी १९८ रूपयांच्या जागी १९९ रूपयांचा प्लान घेऊ शकता. यात तुम्हाला अधिक व्हॅलिडिटी मिळते.


जिओच्या १९८ रूपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग, १०० एसएमएस प्रतिदिनसोबत दररोज २ जीबी डेटा दिला जातो. दरम्यान, याची व्हॅलिडिटी १४ दिवसांची आहे. सोबतच नव्या प्लानमध्ये युजर्सला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचे सबस्क्रिप्शन दिले जात आहे.



१९९ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये १८ दिवसांची व्हॅलिडिटी


दुसरीकडे कंपनीचा १९९ रूपयांचा रिचार्ज प्लान १८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. या प्लानमध्ये लोकांना १.५ जीबी डेटासह अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस दररोज ऑफर केले जातात. या प्लानमध्ये युजर्सला जिओ सिनेमा, जिओ टीव्ही आणि जिओ क्लाऊडचे सबस्क्रिप्शन मिळते.

Comments
Add Comment

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक

एआय तंत्रज्ञानाने रोखणार वाघ-बिबट्यांचे हल्ले; प्रवीण दरेकरांच्या सूचनेवर सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्रप्रकल्पात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने राबवण्यात आलेला

महाराष्ट्रात मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर होणार कारवाई - शिक्षण मंत्री दादाजी भुसे

सर्व माध्यमे, सर्व भाषिक आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी बंधनकारक मुंबई : "महाराष्ट्रातील सर्व

बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे उपकेंद्र कोकणात करा; आमदार प्रवीण दरेकरांची सरकारकडे मागणी

मुंबई : हिंगोली येथील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या धर्तीवर कोकणातही या केंद्राचे उपकेंद्र स्थापन