Jio ने वाढवले Airtel आणि BSNLचे टेन्शन, २०० रूपयांपेक्षाही स्वस्त प्लान

  891

मुंबई: रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही ना काही नवे रिचार्ज प्लान्स लाँच करत असते. यातच कंपनीने बाजारात नवा रिचार्ज प्लान लाँच केला आहे. याची किंमत २०० रूपयांपेक्षाही कमी आहे.


खरंतर, रिलायन्स जिओने आपला १९८ रूपयांचा रिचार्ज प्लान सादर केला आहे. यात युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगसोबत दररोज २ जीबी इंटरनेट डेटाही मिळतो. यात अनेक फायदे देण्यात आले आहेत. कंपनीच्या या नव्या रिचार्ज प्लानमुळे एअरटेल आणि बीएसएनएलचे टेन्शन नक्कीच वाढू शकते.



जिओचा नवा रिचार्ज प्लान


या नव्या रिचार्ज प्लानमध्ये अनेक फायदे मिळतात. दरम्यान, याची व्हॅलिडिटी जास्त नाही आहे. हा कंपनीचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान मानला जात आहे. तर याशिवाय कंपनीचा १८९ रूपयांचा रिचार्ज प्लानही आहे. इतकंच नव्हे तर जास्त व्हॅलिडिटीसाठी १९८ रूपयांच्या जागी १९९ रूपयांचा प्लान घेऊ शकता. यात तुम्हाला अधिक व्हॅलिडिटी मिळते.


जिओच्या १९८ रूपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग, १०० एसएमएस प्रतिदिनसोबत दररोज २ जीबी डेटा दिला जातो. दरम्यान, याची व्हॅलिडिटी १४ दिवसांची आहे. सोबतच नव्या प्लानमध्ये युजर्सला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचे सबस्क्रिप्शन दिले जात आहे.



१९९ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये १८ दिवसांची व्हॅलिडिटी


दुसरीकडे कंपनीचा १९९ रूपयांचा रिचार्ज प्लान १८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. या प्लानमध्ये लोकांना १.५ जीबी डेटासह अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस दररोज ऑफर केले जातात. या प्लानमध्ये युजर्सला जिओ सिनेमा, जिओ टीव्ही आणि जिओ क्लाऊडचे सबस्क्रिप्शन मिळते.

Comments
Add Comment

Gadchiroli Accident News : रस्त्यावर व्यायाम करत होते अन् भरधाव ट्रकनं चिरडलं; गडचिरोलीत ६ मुले ट्रकखाली, चौघांचा जागीच मृत्यू

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील काटली गावाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला. गडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर

बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न चर्चेतून सोडवणार

मुंबई : बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्या आणि युनियनशी चर्चा करुन तोडगा

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे चालवणार १८ विशेष रेल्वेसेवा

रक्षाबंधनाच्या दिवशीही सुविधा मुंबई : रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर लांब

पाणंद रस्त्यांना अडथळा आणाल तर...

मुंबई : राज्यातील शेत आणि पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी एक समग्र आणि ठोस योजना सप्टेंबर महिन्याच्या

पहिलीपासून विद्यार्थ्यांना एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण

मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शिस्त लागावी, त्यांच्यामध्ये देशाविषयी आदर निर्माण व्हावा,

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांसाठी चांगला प्रतिसाद

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाची ५ हजार २८५ घरे आणि ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी आतापर्यंत ४० हजार ८२३ अर्ज दाखल झाले