दररोज किती बदाम खाल्ले पाहिजे? या पद्धतीने खाल्ल्यास मिळणार फायदे

  112

मुंबई: बदाम केवळ चवीलाच चांगले नाहीत तर ते पोषकतत्वांचे भांडार मानले जाते. हलके भाजलेले बदाम खाल्ल्याने मोठ्या प्रमाणात व्हिटामिन, मिनरल, हेल्दी फॅट आणि प्रोटीन मिळतात.


बदाम लोक रात्री पाण्यात भिजत घालतात. सकाळी उठून खातात. यामुळे त्याच्यावर फायटिक अॅसिडचे कवच निघून जाते. यामुळे ते लवकर पचतात. अनेक जण दररोज बदाम खातात तर काहीजण कधी कधी मात्र तुम्हाला माहीत आहे का की दररोज किती बदाम खाल्ले पाहिजेत?


वयस्कर लोकांनी दररोज साधारण ३० ग्रॅम म्हणजेच बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. इतक्या प्रमाणात खाल्ल्याने अधिक कॅलरी शरीरात जात नाही जी हेल्दी मानली जाते.


अनेकजण विचारतील इतकेच बदाम का कारण ही संख्या आवश्यक व्हिटामिन, मिनरल्स, हेल्दी फॅट आणि प्रोटीनचा बॅलन्स राखतात.


आयुर्वेदात बदाम हे उष्ण प्रवृत्तीचे सांगितले आहे. दरम्यान, भारतात साधारणपणे दिवसाला २ ते ५ भिजलेले बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो.


आयुर्वेदानुसार बदाम वात आणि कफ दोष संतुलित करण्याचे काम करतो मात्र त्यामुळे उष्णता वाढत असल्याने पित्त दोष वाढू शकतो.


जर बदामाचे अधिक सेवन केले अथवा खाण्याआधी भिजत घातले नाही तर ते शरीराच्या आत उष्णता वाढवतात. यामुळे अॅसिडिटी अथवा सूज सारखी स्थिती निर्माण होऊ शकते.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी