दररोज किती बदाम खाल्ले पाहिजे? या पद्धतीने खाल्ल्यास मिळणार फायदे

मुंबई: बदाम केवळ चवीलाच चांगले नाहीत तर ते पोषकतत्वांचे भांडार मानले जाते. हलके भाजलेले बदाम खाल्ल्याने मोठ्या प्रमाणात व्हिटामिन, मिनरल, हेल्दी फॅट आणि प्रोटीन मिळतात.


बदाम लोक रात्री पाण्यात भिजत घालतात. सकाळी उठून खातात. यामुळे त्याच्यावर फायटिक अॅसिडचे कवच निघून जाते. यामुळे ते लवकर पचतात. अनेक जण दररोज बदाम खातात तर काहीजण कधी कधी मात्र तुम्हाला माहीत आहे का की दररोज किती बदाम खाल्ले पाहिजेत?


वयस्कर लोकांनी दररोज साधारण ३० ग्रॅम म्हणजेच बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. इतक्या प्रमाणात खाल्ल्याने अधिक कॅलरी शरीरात जात नाही जी हेल्दी मानली जाते.


अनेकजण विचारतील इतकेच बदाम का कारण ही संख्या आवश्यक व्हिटामिन, मिनरल्स, हेल्दी फॅट आणि प्रोटीनचा बॅलन्स राखतात.


आयुर्वेदात बदाम हे उष्ण प्रवृत्तीचे सांगितले आहे. दरम्यान, भारतात साधारणपणे दिवसाला २ ते ५ भिजलेले बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो.


आयुर्वेदानुसार बदाम वात आणि कफ दोष संतुलित करण्याचे काम करतो मात्र त्यामुळे उष्णता वाढत असल्याने पित्त दोष वाढू शकतो.


जर बदामाचे अधिक सेवन केले अथवा खाण्याआधी भिजत घातले नाही तर ते शरीराच्या आत उष्णता वाढवतात. यामुळे अॅसिडिटी अथवा सूज सारखी स्थिती निर्माण होऊ शकते.

Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि