दररोज किती बदाम खाल्ले पाहिजे? या पद्धतीने खाल्ल्यास मिळणार फायदे

मुंबई: बदाम केवळ चवीलाच चांगले नाहीत तर ते पोषकतत्वांचे भांडार मानले जाते. हलके भाजलेले बदाम खाल्ल्याने मोठ्या प्रमाणात व्हिटामिन, मिनरल, हेल्दी फॅट आणि प्रोटीन मिळतात.


बदाम लोक रात्री पाण्यात भिजत घालतात. सकाळी उठून खातात. यामुळे त्याच्यावर फायटिक अॅसिडचे कवच निघून जाते. यामुळे ते लवकर पचतात. अनेक जण दररोज बदाम खातात तर काहीजण कधी कधी मात्र तुम्हाला माहीत आहे का की दररोज किती बदाम खाल्ले पाहिजेत?


वयस्कर लोकांनी दररोज साधारण ३० ग्रॅम म्हणजेच बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. इतक्या प्रमाणात खाल्ल्याने अधिक कॅलरी शरीरात जात नाही जी हेल्दी मानली जाते.


अनेकजण विचारतील इतकेच बदाम का कारण ही संख्या आवश्यक व्हिटामिन, मिनरल्स, हेल्दी फॅट आणि प्रोटीनचा बॅलन्स राखतात.


आयुर्वेदात बदाम हे उष्ण प्रवृत्तीचे सांगितले आहे. दरम्यान, भारतात साधारणपणे दिवसाला २ ते ५ भिजलेले बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो.


आयुर्वेदानुसार बदाम वात आणि कफ दोष संतुलित करण्याचे काम करतो मात्र त्यामुळे उष्णता वाढत असल्याने पित्त दोष वाढू शकतो.


जर बदामाचे अधिक सेवन केले अथवा खाण्याआधी भिजत घातले नाही तर ते शरीराच्या आत उष्णता वाढवतात. यामुळे अॅसिडिटी अथवा सूज सारखी स्थिती निर्माण होऊ शकते.

Comments
Add Comment

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण