Mohammed Shami: मोहम्मद शमीचे टीम इंडियामध्ये कधी होणार पुनरागमन? जय शाहनी दिली मोठी अपडेट

मुंबई: मोहम्मद शमीच्या(mohammad shami) पुनरागमनची प्रतीक्षा त्याचे चाहते करत आहेत. भारतीय खेळाडू सध्या रिहॅबमध्ये आहे. त्याने टीम इंडियासाठी शेवटचा सामना १९ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०२३मध्ये खेळला होता. वर्ल्डकपचा फायनलचा हा सामना होता. वनडे वर्ल्डकपचा हा शेवटचा सामना होता. वनडे वर्ल्डकपनंतर शमीच्या टाचेची सर्जरी करण्यात आली होती. यानंतर आतापर्यंत तो मैदानात परतलेला नाही. आता शमीच्या पुनरागमनाबाबत सरळ उत्तर मिळाले आहे.


रिपोर्टनुसार शमी ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी रणजी ट्रॉफीसाठी बंगालकडून मैदानात उतरेल. रणजी ट्रॉफीची सुरूवात ११ ऑक्टोबरपासून होत आहे. ११ ऑक्टोबरला बंगालचासामना उत्तरप्रदेशविरुद्ध होईल. यात शमी खेळताना दिसू शकतो. रणजीनंतर शमी १९ ऑक्टोबरलासून न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत मैदानावर दिसू शकतो.


ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये शमीच्या पुनरागनचे संकेत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिले आहेत. ते म्हणाले, आमची टीम आधीपेक्षा चांगली तयार आहे. आम्ही काही काळासाठी जसप्रीत बुमराहला आराम दिला. शमी फिट होण्याची आम्ही आशा करतो.


मोहम्मद शमीकडे तीनही फॉरमॅट खेळण्याचा अनुभव आहे. त्याने टीम इंडियासाठी आतापर्यंत ६४ कसोटी १०१ वनडे आणि २३ टी-२० सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने २२९ विकेट घेतलेत. तर वनडेत शमीने १९५ तर टी-२०मध्ये २४ विकेट घेतल्या आहेत.

Comments
Add Comment

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख