भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे निधन, चेन्नईत घेतला अखेरचा श्वास

  169

नवी दिल्ली: भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. त्यांनी चेन्नईत अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार राकेश पाल यांना बेचैनी जाणवत असल्याने राजीव गांधी जनरल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. सोबतच त्यांना एंजिओ टेस्ट करण्यासाठी सांगितले. मात्र त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी रुग्णालयात जात राकेश पाल यांना श्रद्धांजली अर्पण केली. राकेश पाल यांचे पार्थिव दिल्लीला आणले जाईल.


इंडियन कोस्ट गार्डचे डीजी यांच्या निधनाप्रती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. चेन्नईत आज भारतीय तटरक्षख दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे आकस्मिक निधन ही दु:खाची बाब आहे. त्यांच्या नेतृत्वात ICG भारताचे समुद्री सुरक्षा मजबूत करण्यात मोठी प्रगती करत होते. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना आहेत.



कोण होते राकेश पाल?


राकेश पाल उत्तर प्रदेशचे राहणारे होते. त्यांना गेल्या वर्षी भारतीय तटरक्षक दलाचे २५वे महासंचालक म्हणू नियुक्त करण्यात आले होते. ते भारतीय नौदल अकादमीचे माजी विद्यार्थी होते. राकेश पाल जानेवारी १९८९मध्ये भारतीय तटरक्षक दलाचे सामील झाले होते.

Comments
Add Comment

अभिनेता सलमान खानने घेतली राजनाथ सिंह यांची भेट

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानने आज, रविवारी दिल्लीत लखनौचे खासदार आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट

आसारामला मोठा झटका! हायकोर्टाने अंतरिम जामीन नाकारला, ३० ऑगस्टपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश

नवी दिल्ली: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूच्या अडचणी

एकाच पाषाणात १९० टन वजनाची गणेशमूर्ती

कोईम्बतूर : दक्षिण भारतातील ‘मँचेस्टर’ म्हणून ओळखले जाणारे कोईम्बतूर शहर अद्वितीय गणेश मंदिरासाठी प्रसिद्ध

रशियाकडून तेल खरेदी करत भारताने रोखले जागतिक संकट, अहवालात मोठा खुलासा

नवी दिल्ली: रशियाकडून भारत तेल खेरदी करत असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या विरोधात

दहशतवादी संघटनांना मदत करणारा समंदर चाचा उर्फ '​​Human GPS' चकमकीत ठार, भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश

जम्मू आणि काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश आलं आहे. दहशतवादी

जम्मू-काश्मीर: रामबनमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार; तीन ठार, पाच बेपत्ता

जम्मू-काश्मीर: जम्मू आणि काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस आणि भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे.