‘प्रिय हा भारत देश’ : कविता आणि काव्यकोडी

माझा भारत देश,
मला आवडतो खूप
त्याच्या वैभवात दिसे, एकतेचे रूप

पश्चिमेचा किनारा, खुणावितो मला
हिमालयाच्या रांगा पाहून , जीव हा फुलला

मधोमध उभे जणू,
भव्य हे पठार
आनंदाने साद घाली,
रान हिरवेगार

खळाळून नद्या येती, आपल्या भेटीला
समृद्धीचे वरदान,
देती या भूमीला

धर्म, पंथ, जाती येथे, बोलीभाषा किती
मानवतेची भाषा सारे, हृदयातून बोलती

संतांचे विचार येथे,
आलेत रुजून
भूमी झालीय पावन, वीरांच्या त्यागातून

माझ्या या देशाचे,
सदा गाऊ गुणगान
ज्ञान-विज्ञान-श्रमाने, वाढवू त्याची शान

काव्यकोडी - एकनाथ आव्हाड


१) आझाद हिंद सेनेचे
नेतृत्व केले
‘फॉरवर्ड ब्लॉक’ संघटनेचे
कामही पाहिले

‘चलो दिल्ली’ घोषणेने
देश जागा केला
‘जय हिंद’चा नारा
कोणी घुमविला?

२) सार्वजनिक गणेशोत्सवाची
सुरुवात यांनी केली
केसरी व मराठा ही
वृत्तपत्रे काढली

स्वराज्याचा लढा दिला
जहाल होऊनी
‘गीतारहस्य’ग्रंथ
लिहिला बरं कोणी?

३) सर्वधर्मसमभावाची
शिकवण सदा देतो
विविधतेतून एकतेचे
दर्शन घडवितो

‘सत्यमेव जयते’ हे
ब्रीदवाक्य त्याचे
कमळ हे राष्ट्रीय फूल
सांगा कोणाचे?

उत्तर -


१) नेताजी सुभाषचंद्र बोस
२) लोकमान्य टिळक
३) भारत देश
Comments
Add Comment

चिमणीची गोष्ट...

एक होती चिमणी ती एका झाडावर राहायची. तिचा शेजारी होता कावळा. तो होता थोडासा बावळा. काव काव करायचा अन् चिमणीला

समुद्राचे पाणी निळे का दिसते?

कथा : प्रा. देवबा पाटील रोजच्यासारखे सीता व नीता या दोघी बहिणींनी संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर आपला गृहपाठ

आत्महत्या

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ माझ्या लहानपणी मला माझ्या आईने सांगितलेली एक गोष्ट कायमची मनावर कोरली गेली आहे.

अवगुणांमुळे प्रतिष्ठा जाते

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर मानवी जीवनात गुण आणि अवगुण हे दोन्ही असतात. गुण माणसाला उंचावतात, तर

आकाश निळे का दिसते?

कथा : प्रा. देवबा पाटील सीता व नीता या दोघी बहिणी. त्यांना जसा अभ्यासात रस होता तशीच त्यांना वाचनाचीही भारी आवड

खरे सौंदर्य

कथा : रमेश तांबे एक होता राजा. त्याचे राज्य खूप मोठे होते. त्याच्या राज्यातले लोक आनंदी आणि समाधानी होते. राजाने