‘प्रिय हा भारत देश’ : कविता आणि काव्यकोडी

माझा भारत देश,
मला आवडतो खूप
त्याच्या वैभवात दिसे, एकतेचे रूप

पश्चिमेचा किनारा, खुणावितो मला
हिमालयाच्या रांगा पाहून , जीव हा फुलला

मधोमध उभे जणू,
भव्य हे पठार
आनंदाने साद घाली,
रान हिरवेगार

खळाळून नद्या येती, आपल्या भेटीला
समृद्धीचे वरदान,
देती या भूमीला

धर्म, पंथ, जाती येथे, बोलीभाषा किती
मानवतेची भाषा सारे, हृदयातून बोलती

संतांचे विचार येथे,
आलेत रुजून
भूमी झालीय पावन, वीरांच्या त्यागातून

माझ्या या देशाचे,
सदा गाऊ गुणगान
ज्ञान-विज्ञान-श्रमाने, वाढवू त्याची शान

काव्यकोडी - एकनाथ आव्हाड


१) आझाद हिंद सेनेचे
नेतृत्व केले
‘फॉरवर्ड ब्लॉक’ संघटनेचे
कामही पाहिले

‘चलो दिल्ली’ घोषणेने
देश जागा केला
‘जय हिंद’चा नारा
कोणी घुमविला?

२) सार्वजनिक गणेशोत्सवाची
सुरुवात यांनी केली
केसरी व मराठा ही
वृत्तपत्रे काढली

स्वराज्याचा लढा दिला
जहाल होऊनी
‘गीतारहस्य’ग्रंथ
लिहिला बरं कोणी?

३) सर्वधर्मसमभावाची
शिकवण सदा देतो
विविधतेतून एकतेचे
दर्शन घडवितो

‘सत्यमेव जयते’ हे
ब्रीदवाक्य त्याचे
कमळ हे राष्ट्रीय फूल
सांगा कोणाचे?

उत्तर -


१) नेताजी सुभाषचंद्र बोस
२) लोकमान्य टिळक
३) भारत देश
Comments
Add Comment

‘की’ ची करामत

खेळ खेळूया शब्दांचा शब्दांवर साऱ्यांची मालकी तीन अक्षरी शब्दांची ही ‘की’ची करामत बोलकी दाराची बहीण कोण तिला

संधिप्रकाश कसा पडतो?

सीता व नीता या दोघी जुळ्या बहिणी खूपच हुशार होत्या. त्यांच्याकडे सुट्टी असल्याने शहरातील त्याची प्राध्यापिका

राक्षस आणि राजू

कथा,रमेश तांबे राजूला गोष्टीची पुस्तकं वाचायचा खूपच नाद होता. राक्षस-परीच्या गोष्टी तर त्याला खूपच आवडायच्या.

चांगले तेवढे घ्यावे

गोष्ट लहान, अर्थ महान,शिल्पा अष्टमकर  ‘चांगले तेवढे घ्यावे’ ही म्हण आपल्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

नाटकवेडा माणूस!

प्रतिभारंग,प्रा. प्रतिभा सराफ माझ्या घरी संध्याकाळी जेवायला पाहुणे येणार होते. आज संध्याकाळी बागेत फेरफटका

शारदाश्रम विद्यामंदिर

तांत्रिक विद्यालय व शास्त्र - व्यावसायिक आिण उच्च माध्यमिक - व्यावसायिक कनिष्ठ महाविद्यालय SHARADASHRAM VIDYAMANDIR Technical High School &