‘प्रिय हा भारत देश’ : कविता आणि काव्यकोडी

माझा भारत देश,
मला आवडतो खूप
त्याच्या वैभवात दिसे, एकतेचे रूप

पश्चिमेचा किनारा, खुणावितो मला
हिमालयाच्या रांगा पाहून , जीव हा फुलला

मधोमध उभे जणू,
भव्य हे पठार
आनंदाने साद घाली,
रान हिरवेगार

खळाळून नद्या येती, आपल्या भेटीला
समृद्धीचे वरदान,
देती या भूमीला

धर्म, पंथ, जाती येथे, बोलीभाषा किती
मानवतेची भाषा सारे, हृदयातून बोलती

संतांचे विचार येथे,
आलेत रुजून
भूमी झालीय पावन, वीरांच्या त्यागातून

माझ्या या देशाचे,
सदा गाऊ गुणगान
ज्ञान-विज्ञान-श्रमाने, वाढवू त्याची शान

काव्यकोडी - एकनाथ आव्हाड


१) आझाद हिंद सेनेचे
नेतृत्व केले
‘फॉरवर्ड ब्लॉक’ संघटनेचे
कामही पाहिले

‘चलो दिल्ली’ घोषणेने
देश जागा केला
‘जय हिंद’चा नारा
कोणी घुमविला?

२) सार्वजनिक गणेशोत्सवाची
सुरुवात यांनी केली
केसरी व मराठा ही
वृत्तपत्रे काढली

स्वराज्याचा लढा दिला
जहाल होऊनी
‘गीतारहस्य’ग्रंथ
लिहिला बरं कोणी?

३) सर्वधर्मसमभावाची
शिकवण सदा देतो
विविधतेतून एकतेचे
दर्शन घडवितो

‘सत्यमेव जयते’ हे
ब्रीदवाक्य त्याचे
कमळ हे राष्ट्रीय फूल
सांगा कोणाचे?

उत्तर -


१) नेताजी सुभाषचंद्र बोस
२) लोकमान्य टिळक
३) भारत देश
Comments
Add Comment

वाचन गुरू

“काय रे अजय, सध्या पुस्तक वाचन अगदी जोरात सुरू आहे तुझं. हा एवढा बदल अचानक कसा काय घडलाय!” तसा अजय म्हणाला, “काही

अरोरा म्हणजे काय असते?

अरोरा म्हणजे तो ध्रुवांवर पडणारा तेजस्वी प्रकाश. त्याचे आकारही वेगवेगळे असतात. कधी प्रकाश शलाका असतात, तर कधी

आरामदायक क्षेत्र

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ एक गमतीशीर गोष्ट सांगते. उकळत्या पाण्यामध्ये बेडकाला टाकल्यावर तो क्षणात बाहेर

वृत्तपत्रांचे महत्व

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर मानवी जीवनात माहिती, ज्ञान आणि घडामोडींचा मागोवा घेण्यासाठी वृत्तपत्र

वृद्धाश्रम...

कथा : रमेश तांबे सुमती पाटील वय वर्षे सत्तर. वृद्धाश्रमातल्या नोंदवहीत नाव लिहिलं गेलं आणि भरल्या घरात राहणाऱ्या

सूर्य गार भागात का जात नाही ?

कथा : प्रा. देवबा पाटील दुपारच्या सुट्टीत सुभाष आल्यानंतर आदित्य मित्रमंडळाच्या व सुभाषच्या डबा खाता खाता