सायबर गुन्ह्यांबाबत नवी मुंबई पोलिसांची व्हॉट्सअ‍ॅप चॅनलद्वारे जनजागृती

राज्यभरात जनजागृतीसाठी अंमलबजावणीवर भर: पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला


नवी मुंबई : ऑनलाईन व्यवहारात किमान ५० टक्के सायबर क्राईम घडत असतात.सायबर क्राईमबाबत जनजागृती करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेले 'व्हॉट्सअ‍ॅप चॅनल' ची अंमलबजावणी संपूर्ण राज्यभर करण्यात येणार असल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सांगितले.


नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत घडणाऱ्या विविध सायबर गुन्हे, महिला विशेष गुन्हे, आर्थिक गुन्हे आणि अमली पदार्थ गुन्हे यांना प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती नवी मुंबई पोलिसांच्या वतीने व्हॉट्सअ‍ॅप चॅनल आणि ८८२८११२११२ हेल्पलाईन नंबर सुरुवात पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच चर्चा सत्राचे आयोजन वाशी येथील सिडको एक्जीबिशन सभागृहात बुधवारी सकाळी करण्यात आले होते.


यावेळी, उपस्थित नागरिक, तरुणांना ,उद्योजक व ज्येष्ठ नागरिक यांना मार्गदर्शन करताना, आपण ऑनलाईन ऑर्डर करताना ते मिळेल का याचा विचार करायला हवा तसेच दक्षता घेतली पाहिजे. आपलीं ऑनलाईन व्यवहारात फसवणुक झाल्यानंतर तत्काळ त्यांची माहिती आपल्या आई-वडिलांना भावाला व घरातील ज्येष्ठ नागरिकांना दिली पाहिजे. सायबर क्राईम बाबत मोठया प्रमाणावर जनजागृती करणे आवश्यक आहे. नवी मुंबई पोलिसांनी व्हाट्सअ‍ॅप चॅनल च्या माध्यमातून जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.नागरिकांनी तसेच तरुणांनी सायबर योध्दा म्हणुन काम केले पाहिजे. असे रश्मी शुक्ला यांनी सांगितले.


गेल्या काही वर्षांत सायबर गुन्ह्यामध्ये वाढ होत आहे. प्रत्येक घरात किंवा शेजारी एक व्यक्ती सायबर गुन्ह्यांचे पिढीत आहेत. नार्को गुन्ह्यामध्ये वाढ होत आहे. आपण सजग राहिले पाहिजे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत जुन महिन्यापर्यंत दरोडा, घरफोडी, प्रॉपर्टी चे ५३७ गुन्ह्यात एकुण १३ कोटी ६७ लाख चोरी झाल्याची नोंद झाली आहे. सायबर क्राईम चे ३६१ गुन्ह्यांमध्ये १कोटी ६८ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. अवघ्या ७ महिन्यांत प्रॉपर्टीच्या गुन्ह्यांपेक्षा १३ पट सायबर गुन्ह्याचे प्रमाण असल्याचे नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले. नवी मुंबई पोलिसांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनल द्वारे जनजागृतीसाठी नागरिकांचे देखील सहकार्य अपेक्षित आहे.

Comments
Add Comment

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे