सायबर गुन्ह्यांबाबत नवी मुंबई पोलिसांची व्हॉट्सअ‍ॅप चॅनलद्वारे जनजागृती

राज्यभरात जनजागृतीसाठी अंमलबजावणीवर भर: पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला


नवी मुंबई : ऑनलाईन व्यवहारात किमान ५० टक्के सायबर क्राईम घडत असतात.सायबर क्राईमबाबत जनजागृती करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेले 'व्हॉट्सअ‍ॅप चॅनल' ची अंमलबजावणी संपूर्ण राज्यभर करण्यात येणार असल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सांगितले.


नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत घडणाऱ्या विविध सायबर गुन्हे, महिला विशेष गुन्हे, आर्थिक गुन्हे आणि अमली पदार्थ गुन्हे यांना प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती नवी मुंबई पोलिसांच्या वतीने व्हॉट्सअ‍ॅप चॅनल आणि ८८२८११२११२ हेल्पलाईन नंबर सुरुवात पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच चर्चा सत्राचे आयोजन वाशी येथील सिडको एक्जीबिशन सभागृहात बुधवारी सकाळी करण्यात आले होते.


यावेळी, उपस्थित नागरिक, तरुणांना ,उद्योजक व ज्येष्ठ नागरिक यांना मार्गदर्शन करताना, आपण ऑनलाईन ऑर्डर करताना ते मिळेल का याचा विचार करायला हवा तसेच दक्षता घेतली पाहिजे. आपलीं ऑनलाईन व्यवहारात फसवणुक झाल्यानंतर तत्काळ त्यांची माहिती आपल्या आई-वडिलांना भावाला व घरातील ज्येष्ठ नागरिकांना दिली पाहिजे. सायबर क्राईम बाबत मोठया प्रमाणावर जनजागृती करणे आवश्यक आहे. नवी मुंबई पोलिसांनी व्हाट्सअ‍ॅप चॅनल च्या माध्यमातून जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.नागरिकांनी तसेच तरुणांनी सायबर योध्दा म्हणुन काम केले पाहिजे. असे रश्मी शुक्ला यांनी सांगितले.


गेल्या काही वर्षांत सायबर गुन्ह्यामध्ये वाढ होत आहे. प्रत्येक घरात किंवा शेजारी एक व्यक्ती सायबर गुन्ह्यांचे पिढीत आहेत. नार्को गुन्ह्यामध्ये वाढ होत आहे. आपण सजग राहिले पाहिजे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत जुन महिन्यापर्यंत दरोडा, घरफोडी, प्रॉपर्टी चे ५३७ गुन्ह्यात एकुण १३ कोटी ६७ लाख चोरी झाल्याची नोंद झाली आहे. सायबर क्राईम चे ३६१ गुन्ह्यांमध्ये १कोटी ६८ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. अवघ्या ७ महिन्यांत प्रॉपर्टीच्या गुन्ह्यांपेक्षा १३ पट सायबर गुन्ह्याचे प्रमाण असल्याचे नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले. नवी मुंबई पोलिसांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनल द्वारे जनजागृतीसाठी नागरिकांचे देखील सहकार्य अपेक्षित आहे.

Comments
Add Comment

Pratap Sarnaik : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांना १६ ऑगस्टची डेडलाईन

 १ मे ते १५ ऑगस्टपर्यंत शिक्षण घेता येणार; मराठी मार्गदर्शन पुस्तिका प्रकाशित मुंबई : परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी

एआय धोरणातून दीड लाख रोजगार, तर लंडनमध्ये डॉ. आंबेडकरांच्या नावे अध्यासन

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय; हरित महाराष्ट्र आयोग आणि दिव्यांग शिष्यवृत्तीत मोठी वाढ मुंबई :

Kolhapur Crime : कोल्हापूर प्रकरणाला नवं वळण; १५ मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी आणखी एका गुन्हेगाराला अटक

कोल्हापूर : अमरावती परतवाडा येथील घटनेने महाराष्ट्र हादरला आहे, तशीच पुनरावृत्ती कोल्हापूरमध्ये झाली आहे. एका

Watermelon Death Case : कलिंगड खाल्लं अन् एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू; दुकानदारानेच सांगितलं सत्य

मुंबई : बिर्याणी त्यानंतर थंडावा मिळावा म्हणून खाल्लेलं कलिंगड आणि थेट मृत्यू किती भयंकर आहे ना हे, मुंबईतील

Bacchu Kadu, Eknath Shinde : विधान परिषद दिली तर शिंदेंचा पाईक म्हणून काम करेन - बच्चू कडू

मुंबई : "उमेदवारी अर्जासोबत जोडायची कागदपत्रे माझ्या बॅगेतच आहेत. जर शिवसेनेने सन्मानाने उमेदवारी दिली, तर

Santosh Deshmukh Massajog Sarpanch Election Result : बीड - मस्साजोगच्या निवडणुकीचा निकाल झाला जाहीर

बीड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मस्साजोगच्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा निकाल आज अखेर जाहीर झाला, अत्यंत