Independence Day 2024: आपण संकल्प केला तर विकसित भारताचे लक्ष्य गाठू शकतो- पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली: भारताच्या ७८व्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून राष्ट्रध्वज फडकावला. यानंतर देशाला संबोधित करताना त्यांनी देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यवीरांची आठवणही केली. पंतप्रधान मोदी म्हणाले जेव्हा आपण ४० कोटी होतो तेव्हा महासत्तेला हरवले होते. आज तर आपण १४० कोटी आहोत.


संबोधित करण्यासाठी पंतप्रधान मोदींना स्वदेशी १०५ एमएम लाईट फिल्ड गनने २१ तोफांची सलामी देण्यात आली. सोबळ्यात ६००० हून अधिक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.पाहा काय म्हणताहेत पंतप्रधान मोदी



४० कोटी लोकांनी तोडल्या होत्या गुलामीच्या बेड्या


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, माझ्या प्रेमळ देशवासियांनो आपण जरा स्वातंत्र्यांचे ते दिवस आठवूया. शेकडो वर्षांची गुलामी, प्रत्येक कालखंड संघर्ष करत आहोत. महिला असो, तरूण असो, आदिवासी असो सगळे गुलामीविरोधात युद्ध लढत आहेत. १८५७चा स्वातंत्र्या संग्रामाचे हिरो अनेक आदिवासी भागातून होते. तेथे स्वातंत्र्याची लढाई लढली जात होते. त्यावेळेस ४० कोटी लोकांनी जे सामर्थ्य दाखवले.


एकच संकल्प घेऊन ते चालत होते, त्यासाठी लढत होते. तेव्हा एकच स्वप्न होते वंदे मातर, देशाचे स्वातंत्र्य. ४० कोटी लोकांनी जगातील महासत्तेला काढून फेकले होते. त्याच पूर्वजांचे रक्त आपल्या शरीरात आहे. आज आपण १४० कोटी लोक आहेत. त्यामुळे आपण जर एक संकल्प केला एक दिशा निर्धारित करून चाललो तर नक्कीच २९४७ पर्यंत विकसित भारत बनू शकतो.



नैसर्गिक आपत्तींमुळे चिंता वाढल्या


गेल्या काही वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे चिंता अधिक वाढली आहे. या नैसर्गिक आपत्तींमध्ये अनेकांनी आपली कुटुंबे गमावली. संपत्ती गमावली आहे. आज मी त्या सगळ्यांबद्दल संवेदना व्यक्त करतो.

Comments
Add Comment

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च

Bhopal News: कारमध्ये अडकलेला दीड वर्षांचा चिमुकला,अन् आई वडील शॅापिंगला गेले,पुढे असं घडलं...

भोपाळ :मध्य प्रदेशातील छिंदवाडा शहरात संध्याकाळच्या सुमारास पाया खालची जमीन हलवणारी घटना घडली. पालकांच्या

Crime News: रात्री हलवा खाल्ला अन् सकाळी उठलेच नाही..तिघांचा मृत्यु,घडली विचीत्र घटना..!

चंदीगड : हरियाणातील फरिदाबादच्या सरूरपूर भागात एक भयंकर व पाय खालची जमीन हलवणारी घटना घडली आहे. एका कुटुंबातील

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर

Sabarimala Temple : सबरीमाला मंदिरात तूप विक्रीत लाखो रुपयांचा महाघोटाळा! केरळ उच्च न्यायालयाचे कठोर पाऊल; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

तिरुअनंतपुरम : केरळमधील जगप्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सोन्याच्या दरोड्यानंतर आता 'तूप घोटाळा' समोर आल्याने खळबळ

जर्मनीच्या कैदेत असलेल्या अरिहासाठी आईने ओलांडली भाषेची भिंत

लेकीला परत आणण्यासाठी आई-वडिलांचा ४० महिन्यांपासून लढा नवी दिल्ली : आपल्या काळजाच्या तुकड्याला, पाच वर्षांच्या