Vinesh Phogat: विनेश फोगाटची याचिका फेटाळली, भारताला रौप्य पदक मिळण्याच्या आशा संपुष्टात

मुंबई: भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटची याचिका CAS ने फेटाळून लावली आहे. याचा अर्थ आता भारताच्या खात्यात रौप्य पदक येणार नाही. विनेश फोगाटचे वजन फायनल सामन्याआधी १०० ग्रॅम अधिक भरले होते. या कारणामुळे तिला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्या आले होते. यासंदर्भात तिने रौप्य पदक देण्यात यावे अशी याचिका केली होती. याचा निर्णय १६ ऑगस्टला सुनावला जाणार होता मात्र CAS ने त्याआधीच तिची याचिका फेटाळून लावली आहे.


यासंबंधी भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्ष पीटी उषा यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे तसेच या निर्णयाने त्यांनाही धक्का बसला आहे. विनेशने ७ ऑगस्टला रौप्य पदक मिळावे अशी याचिका केली होती. CAS ही मागणी स्वीकारलीही होती. या प्रकरणाची सुनावणी ९ ऑगस्टला झाली. याच विनेशला चार वकिलांनी प्रतिनिधित्व केले आणि सोबतच भारताचे टॉप वकील हरीश साळवे आणि विदुष्पत सिंघानिया यांनाही मदतीसाठी पाठवण्यात आले होते.


युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने आधीच स्पष्ट केले होते की ते विनेश फोगाट अथवा इतर कोणत्याही खेळाडूसाठी नियमांत बदल करण्याच्या बाजूने नाही. तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनीही यासंबंधी हेच विधान जारी केले होते.



अपात्र ठरवल्यानंतर घेतली निवृत्ती


विनेश फोगाटने फायनल सामन्याआधी अपात्र घोषित झाल्यानंतर ८ ऑगस्टला कुस्तीतून संन्यास घेतल्याची घोषणा केली होती. तिने सोशल मीडियावर ट्वीट करत लिहिले, आई कुस्ती जिंकली, मी हरले. मला माफ करा. तुमचे स्वप्न आणि माझे धैर्य तुटले आहे. माझ्यामध्ये आता अधिक हिंमत नाही. कुस्तीला माझा सलाम. माझे करिअर २००१-२०२४ पर्यंतच होते. दरम्यान, संपूर्ण देशाला आशा लागून होती की विनेशला रौप्य पदक दिले जाईल मात्र याचिका फेटाळल्याने भारतीयांच्या आशांना मोठा झटका बसला आहे.

Comments
Add Comment

टीम इंडिया 'यशस्वी', रो'Hit' चा विक्रम, विशाखापट्टणममध्ये भारताने साजरा केला मालिका विजय

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे झालेला निर्णायक एकदिवसीय सामना भारताने

भारताने दक्षिण आफ्रिकेचा डाव ४८ व्या षटकात गुंडाळला, जिंकण्यासाठी हव्या २७१ धावा

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे निर्णायक एकदिवसीय सामना सुरू आहे. हा सामना

आयपीएलमध्ये विदेशी खेळाडूंना मिळणार केवळ १८ कोटीच!

लिलावापूर्वीच बीसीसीआयच्या नियमांचा अनेक खेळाडूंना फटका मुंबई  : आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावाची सध्या तयारी

इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची विराटला ७ वर्षांनी संधी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना ६ डिसेंबर

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण