Vinesh Phogat: विनेश फोगाटची याचिका फेटाळली, भारताला रौप्य पदक मिळण्याच्या आशा संपुष्टात

मुंबई: भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटची याचिका CAS ने फेटाळून लावली आहे. याचा अर्थ आता भारताच्या खात्यात रौप्य पदक येणार नाही. विनेश फोगाटचे वजन फायनल सामन्याआधी १०० ग्रॅम अधिक भरले होते. या कारणामुळे तिला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्या आले होते. यासंदर्भात तिने रौप्य पदक देण्यात यावे अशी याचिका केली होती. याचा निर्णय १६ ऑगस्टला सुनावला जाणार होता मात्र CAS ने त्याआधीच तिची याचिका फेटाळून लावली आहे.


यासंबंधी भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्ष पीटी उषा यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे तसेच या निर्णयाने त्यांनाही धक्का बसला आहे. विनेशने ७ ऑगस्टला रौप्य पदक मिळावे अशी याचिका केली होती. CAS ही मागणी स्वीकारलीही होती. या प्रकरणाची सुनावणी ९ ऑगस्टला झाली. याच विनेशला चार वकिलांनी प्रतिनिधित्व केले आणि सोबतच भारताचे टॉप वकील हरीश साळवे आणि विदुष्पत सिंघानिया यांनाही मदतीसाठी पाठवण्यात आले होते.


युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने आधीच स्पष्ट केले होते की ते विनेश फोगाट अथवा इतर कोणत्याही खेळाडूसाठी नियमांत बदल करण्याच्या बाजूने नाही. तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनीही यासंबंधी हेच विधान जारी केले होते.



अपात्र ठरवल्यानंतर घेतली निवृत्ती


विनेश फोगाटने फायनल सामन्याआधी अपात्र घोषित झाल्यानंतर ८ ऑगस्टला कुस्तीतून संन्यास घेतल्याची घोषणा केली होती. तिने सोशल मीडियावर ट्वीट करत लिहिले, आई कुस्ती जिंकली, मी हरले. मला माफ करा. तुमचे स्वप्न आणि माझे धैर्य तुटले आहे. माझ्यामध्ये आता अधिक हिंमत नाही. कुस्तीला माझा सलाम. माझे करिअर २००१-२०२४ पर्यंतच होते. दरम्यान, संपूर्ण देशाला आशा लागून होती की विनेशला रौप्य पदक दिले जाईल मात्र याचिका फेटाळल्याने भारतीयांच्या आशांना मोठा झटका बसला आहे.

Comments
Add Comment

IND vs SA Test : अवघ्या तीन दिवसांत भारताचा पराभव, मालिकेत पिछाडी, गुवाहाटीत ‘करो या मरो’ सामना

कोलकाता : ईडन गार्डन्सवरील पहिली कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. भारताला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला.

कोलकाता कसोटीचा शेवटचा डाव सुरू, जयस्वाल पाठोपाठ केएल राहुलही बाद

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स

कोलकाता कसोटी तीन दिवसांत संपणार ?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना ईडन

BCCI Update on Shubman Gill Injury : गिलची प्रकृती चिंताजनक? ९ विकेट्सवर टीम इंडियाचा डाव अचानक घोषित; BCCI ने काय खुलासा केला?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील पहिला सामना कोलकात्यात रंगतदार

राजस्थानचा कर्णधार सीएसकेत, तर जड्डू पुन्हा जुन्या संघात

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या हंगामातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित ट्रेडची अखेर

दक्षिण आफ्रिका सर्वबाद १५६, भारत एक बाद ३७

कमी प्रकाशामुळे खेळ पहिल्या दिवसाचा खेळ लवकर संपवला कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन