मुंबईत पुन्हा हिट अँड रन, वर्सोवा बीचवर झोपलेल्या व्यक्तीला कारने चिरडले

दोन आरोपी अटकेत


मुंबई : मुंबईच्या वर्सोवा बीचवर झोपेत असताना एका वेगवान एसयूव्हीने दोघांना चिरडले. यामध्ये एका ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर वर्सोवा पोलिसांनी नागपूरहून आलेला कोरिओग्राफर आणि इव्हेंट ऑर्गनायझरला अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक गणेश यादव आणि बबलू श्रीवास्तव हे दोघे मित्र वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर झोपले होते. तेव्हा हा अपघात घडला. ही घटना १२ ऑगस्टच्या पहाटे घडली.


बबलू श्रीवास्तवच्या डोक्यावर आणि हातावर जोरदार दणका बसल्यानंतर त्याला जाग आली. तेव्हा त्याने पाहिले की, शेजारी झोपलेल्या गणेशला चिरडून कार त्याच्या अंगावरून पुढे गेली, असे बबलूने पोलिसांना सांगितले.


या घटनेत बबलूच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून तो त्यानंतर बेशुद्ध पडला होता.


अपघात घडल्यानंतर कारमधील दोघेजण खाली उतरले. परंतु, यादव गंभीर जखमी झाल्याचे व प्रतिसाद देत नसल्याचे पाहून आणि घटनास्थळी लोक जमा होऊ लागल्याने त्यांनी त्यांच्या कारमधून घटनास्थळावरून पळ काढला, असे पोलीस म्हणाले.


कोरिओग्राफर असलेला निखिल जावडे, हा अपघात घडला त्यावेळी कार चालवत होता. यावेळी त्याच्यासोबत कारमध्ये त्याचा मित्र शुभम डोंगरे हा देखिल होता. दरम्यान पोलिसांनी या दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे.


गणेश यादव हा वर्सोवा येथील सागर कुटीर येथे राहत होता. रविवारी रात्री खूप उकाडा जाणवत असल्याने गणेश आणि त्याचा मित्र बबलू श्रीवास्तव वर्सोवा बीचवर झोपायला गेले.


सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास एमएच-३२-एफई-३०३३ क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या एसयूव्हीने समुद्रकिनाऱ्यावर झोपलेल्या गणेश आणि त्याचा मित्र बबलू या दोघांना चिरडले. यात गणेशचा मृत्यू झाला, तर त्याचा साथीदार बबलू जखमी झाला.

Comments
Add Comment

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता