Baba Ramdev : बाबा रामदेव यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

  55

नवी दिल्ली : बाबा रामदेव (Baba Ramdev) आणि आचार्य बाळकृष्ण यांना पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कंपनीविरोधात असलेला मानहानीचा खटला सर्वोच्च न्यायालयाने बंद केला आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती हिमा कोहली आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.


सविस्तर माहिती अशी की, आयएमएने पतंजलीवर कोरोना काळात पतंजलीच्या कोरोनिल आणि स्वसारी, या उत्पादनासंदर्भात दिशाभूल करणाऱ्या जाहिराती चालवल्याचा आरोप केला होता. आयएमएने दाखल केलेल्या याचिकेत पतंजलीच्या भ्रामक जाहिरातीमुळे ॲलोपॅथी औषधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे म्हटले होते. त्यावर न्यायालयाने पतंजलीला खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती तात्काळ थांबवाव्यात, असा इशारा दिला होता.


दरम्यान, पतंजलीने ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट १९५४ आणि ग्राहक संरक्षण कायदा २०१९ सारख्या कायद्यांचे थेट उल्लंघन केल्याचेही आयएमएने म्हटले. पतंजलीच्या दाव्यानंतर आयुष मंत्रालयानेही कंपनीला फटकारले होते. तसेच, सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असतानाही कंपनीने वृत्तपत्रांमध्ये या उत्पादनांची जाहिराती दिल्याबद्दल कंपनीला माफी मागण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, बाबा रामदेव यांनी कोर्टात आपला माफीनामा सादर केला, त्यामुळे आता हा खटला बंद करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Gujrat : गुजरातमध्ये सिंहाला छळणाऱ्या व्यक्तीला अटक; व्हायरल व्हिडिओमुळे वन विभागाची कारवाई

गुजरात : गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील टल्ली गावात घडलेल्या एका धक्कादायक प्रकारात, ३२ वर्षीय शेतकऱ्याने

Jammu And Kashmir : उधमपूरमध्ये शोकांतिका; CRPFचे वाहन खोल दरीत कोसळले, दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात बसंतगड परिसरात एक मोठा अपघात घडला आहे. केंद्रीय राखीव पोलिस

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयामुळे न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

PM Modi : ट्रम्पच्या धमक्यांना मोदींचं एका वाक्यात उत्तर : "शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार"

अमेरिकेच्या ५०% टॅरिफवर मोदींचा ठाम पवित्रा नवी दिल्ली : अमेरिकेने भारतावर ५० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याचा

११९ देशांमधील ५६० कोटी लोकांना चिकनगुनियाचा धोका

२० वर्षांपूर्वी जगभरात केला होता कहर नवी दिल्ली : सुमारे २० वर्षांपूर्वी जगभरात कहर करणारा हा विषाणू पुन्हा

Go Back To India...', आयर्लंडमध्ये ६ वर्षांच्या मुलीवर हल्ला

नवी दिल्ली: आयर्लंडच्या वॉटरफोर्ड शहरात ६ वर्षांच्या भारतीय वंशाच्या मुलीवर एका किशोरवयीन टोळीने वर्णद्वेषी