Nitesh Rane : मराठा आरक्षणाच्या निमित्ताने समाजा-समाजामध्ये भांडण लावण्याचा कार्यक्रम बंद करा!

भाजपा आमदार नितेश राणे यांचा इशारा


मुंबई : गेले कित्येक दिवस मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांचे आंदोलन सुरु आहे. तसेच मराठा समाजातील ठोक मोर्चाचे कार्यकर्ते राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरत आहेत. हे कार्यकर्ते राज्यातील सर्व दिग्गज नेत्यांची आरक्षणाबाबत भूमिका मांडण्यासाठी त्यांची भेट घेत आहेत. यादरम्यान ओबीसी, धनगर किंवा अन्य कोणत्याही जातींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्यास आमचा पाठिंबा आहे, अशी भूमिका सर्व पक्षीय नेत्यांकडून मांडण्यात येत आहे. परंतु तरीही मराठा समाजाचे जरांगे यांच्यासारखे काही कार्यकर्ते हिंदूंमध्ये फूट पाडून भांडणं लावण्याचे काम करत आहेत, असा खोचक टोला भाजपा (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी लगावला.


महायुती सरकारने कुठल्याही जातीच्या आरक्षणाला हात न लावता प्रामुख्याने ओबीसी समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिले आहे. महायुतीच्या या भूमिकेला राज्यातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पाठींबा दिला आहे. तरीही हिंदूंमध्ये फूट पाडून मराठा, ओबीसी, धनगर या सर्व समाजांमध्ये आरक्षणाच्या नावाखाली भांडणं लावण्याचा कार्यक्रम सातत्याने सुरु असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.


मराठा समाजातील काही कार्यकर्तेच मराठा समाजाच्या खांद्यावर बंदूक ठेवून हिंदूंमध्ये फूट पाडत आहेत. तसेच जास्तीत जास्त सरकारी नोकऱ्यांचे प्राधान्य मुस्लिम समाजाला मिळवून देणे, असा त्यांचा लपाछपीचा कार्यक्रम सुरु आहे. या सर्व कारणांमुळेच सर्व हिंदू आपापसात भांडत एकमेकांचे दुश्मन बनत चालले आहेत. त्यामुळे या कार्यकर्त्यांनी हे काम लवकरात लवकर बंद करावे असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. तसेच मराठा समाजातील बांधवांनी अशा कार्यकर्त्यांच्या भूलथापांना आणि आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन नितेश राणे यांनी केले आहे.

Comments
Add Comment

निवडणुकीचा निकाल पुढे ढकलला, MPSC परीक्षेवर होणार परिणाम?

मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीचा म्हणजे नगरपालिका आणि

'पुण्यातील मालधक्का चौकातील जागेबाबत प्रस्ताव सादर करावा'

पुणे : पुणे स्टेशनलगत मालधक्का चौकातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) ताब्यातील जागा

महाराष्ट्र ‘राजभवन; झाले आता ‘लोकभवन’

मुंबई : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनचे नाव आता अधिकृतपणे ‘महाराष्ट्र लोकभवन’ असे

सर्व नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरला

मुंबई : राज्यातील सर्व २८८ नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी २१ डिसेंबर २०२५ रोजी करण्याचा आदेश मुंबई उच्च

राज्यात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा होणार उपलब्ध

मुंबई : कर्करोगाचे वाढते प्रमाण व कर्करोग उपचाराचे गांभीर्य विचारात घेता राज्यातील जनतेस सर्वसमावेशक कर्करोग

महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे निर्देश

मुंबई : देशभरातून महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी