पॅरिस ऑलिम्पिकमधून आज भारतात परतणार चॅम्पियन, मनू भाकरवर सर्वांच्या नजरा

मुंबई: पॅरिस ऑलिम्पिकच्या सांगता सोहळ्यात सामील होणारे भारतीय खेळाडू मंगळवारी स्वदेशी परतत आहेत. पॅरिस ऑलिम्पिक २६ जुलै ते ११ ऑगस्टदरम्यान पार पडले. भारताने या स्पर्धेत ६ पदके जिंकली. भारताच्या ११७ सदस्यीय दलातील अधिकतर खेळाडू आधीच मायदेशात परतले आहेत.


मंगळवारी मनू भाकर, पीआर श्रीजेशसह काही खेळाडू भारतात परतत आहे. या खेळाडूंनी सांगता सोहळ्यात सहभाग घेतला होता. मनू भाकर आणि श्रीजेश सांगता सोहळ्यात भारताचे ध्वजवाहक होते.


मनू भाकर आणि पीआर श्रीजेश यांच्याशिवाय कुस्तीपटू अमन सेहरावतही १३ ऑगस्टला भारतात परतणार आहे. हॉकी खेळाडू अमित रोहिदास, राजकुमार पाल, अभिषेक, सुखजीत सिंह, संजयही भारतात परतणाऱ्या दलामध्ये सामील आहेत. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पी टी उषाही भारतात परतणाऱ्या भारतीय दलात सामील आहे. विनेश फोगट मंगळवारी परतणार की नाही याबाबत अद्याप ठरलेले नाही.



विनेशला रौप्य पदक मिळण्याची आशा


विनेश फोगाटने कुस्तीच्या ५० किलो वजनी गटात फायनलमध्ये पोहोचत कमीत कमी रौप्य पदक पक्के केले होते. मात्र फायनलआधी १०० ग्रॅम वजन अधिक असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. आता विनेशने कोर्ट ऑफ ऑर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्समध्ये अपील करत रौप्य पदकाची मागणी केली आहे. या बाबत १३ ऑगस्टला निर्णय येणार आहे.

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण