मुंबई: पॅरिस ऑलिम्पिकच्या सांगता सोहळ्यात सामील होणारे भारतीय खेळाडू मंगळवारी स्वदेशी परतत आहेत. पॅरिस ऑलिम्पिक २६ जुलै ते ११ ऑगस्टदरम्यान पार पडले. भारताने या स्पर्धेत ६ पदके जिंकली. भारताच्या ११७ सदस्यीय दलातील अधिकतर खेळाडू आधीच मायदेशात परतले आहेत.
मंगळवारी मनू भाकर, पीआर श्रीजेशसह काही खेळाडू भारतात परतत आहे. या खेळाडूंनी सांगता सोहळ्यात सहभाग घेतला होता. मनू भाकर आणि श्रीजेश सांगता सोहळ्यात भारताचे ध्वजवाहक होते.
मनू भाकर आणि पीआर श्रीजेश यांच्याशिवाय कुस्तीपटू अमन सेहरावतही १३ ऑगस्टला भारतात परतणार आहे. हॉकी खेळाडू अमित रोहिदास, राजकुमार पाल, अभिषेक, सुखजीत सिंह, संजयही भारतात परतणाऱ्या दलामध्ये सामील आहेत. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पी टी उषाही भारतात परतणाऱ्या भारतीय दलात सामील आहे. विनेश फोगट मंगळवारी परतणार की नाही याबाबत अद्याप ठरलेले नाही.
विनेश फोगाटने कुस्तीच्या ५० किलो वजनी गटात फायनलमध्ये पोहोचत कमीत कमी रौप्य पदक पक्के केले होते. मात्र फायनलआधी १०० ग्रॅम वजन अधिक असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. आता विनेशने कोर्ट ऑफ ऑर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्समध्ये अपील करत रौप्य पदकाची मागणी केली आहे. या बाबत १३ ऑगस्टला निर्णय येणार आहे.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…