पॅरिस ऑलिम्पिकमधून आज भारतात परतणार चॅम्पियन, मनू भाकरवर सर्वांच्या नजरा

  63

मुंबई: पॅरिस ऑलिम्पिकच्या सांगता सोहळ्यात सामील होणारे भारतीय खेळाडू मंगळवारी स्वदेशी परतत आहेत. पॅरिस ऑलिम्पिक २६ जुलै ते ११ ऑगस्टदरम्यान पार पडले. भारताने या स्पर्धेत ६ पदके जिंकली. भारताच्या ११७ सदस्यीय दलातील अधिकतर खेळाडू आधीच मायदेशात परतले आहेत.


मंगळवारी मनू भाकर, पीआर श्रीजेशसह काही खेळाडू भारतात परतत आहे. या खेळाडूंनी सांगता सोहळ्यात सहभाग घेतला होता. मनू भाकर आणि श्रीजेश सांगता सोहळ्यात भारताचे ध्वजवाहक होते.


मनू भाकर आणि पीआर श्रीजेश यांच्याशिवाय कुस्तीपटू अमन सेहरावतही १३ ऑगस्टला भारतात परतणार आहे. हॉकी खेळाडू अमित रोहिदास, राजकुमार पाल, अभिषेक, सुखजीत सिंह, संजयही भारतात परतणाऱ्या दलामध्ये सामील आहेत. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पी टी उषाही भारतात परतणाऱ्या भारतीय दलात सामील आहे. विनेश फोगट मंगळवारी परतणार की नाही याबाबत अद्याप ठरलेले नाही.



विनेशला रौप्य पदक मिळण्याची आशा


विनेश फोगाटने कुस्तीच्या ५० किलो वजनी गटात फायनलमध्ये पोहोचत कमीत कमी रौप्य पदक पक्के केले होते. मात्र फायनलआधी १०० ग्रॅम वजन अधिक असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. आता विनेशने कोर्ट ऑफ ऑर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्समध्ये अपील करत रौप्य पदकाची मागणी केली आहे. या बाबत १३ ऑगस्टला निर्णय येणार आहे.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र