पॅरिस ऑलिम्पिकमधून आज भारतात परतणार चॅम्पियन, मनू भाकरवर सर्वांच्या नजरा

  50

मुंबई: पॅरिस ऑलिम्पिकच्या सांगता सोहळ्यात सामील होणारे भारतीय खेळाडू मंगळवारी स्वदेशी परतत आहेत. पॅरिस ऑलिम्पिक २६ जुलै ते ११ ऑगस्टदरम्यान पार पडले. भारताने या स्पर्धेत ६ पदके जिंकली. भारताच्या ११७ सदस्यीय दलातील अधिकतर खेळाडू आधीच मायदेशात परतले आहेत.


मंगळवारी मनू भाकर, पीआर श्रीजेशसह काही खेळाडू भारतात परतत आहे. या खेळाडूंनी सांगता सोहळ्यात सहभाग घेतला होता. मनू भाकर आणि श्रीजेश सांगता सोहळ्यात भारताचे ध्वजवाहक होते.


मनू भाकर आणि पीआर श्रीजेश यांच्याशिवाय कुस्तीपटू अमन सेहरावतही १३ ऑगस्टला भारतात परतणार आहे. हॉकी खेळाडू अमित रोहिदास, राजकुमार पाल, अभिषेक, सुखजीत सिंह, संजयही भारतात परतणाऱ्या दलामध्ये सामील आहेत. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पी टी उषाही भारतात परतणाऱ्या भारतीय दलात सामील आहे. विनेश फोगट मंगळवारी परतणार की नाही याबाबत अद्याप ठरलेले नाही.



विनेशला रौप्य पदक मिळण्याची आशा


विनेश फोगाटने कुस्तीच्या ५० किलो वजनी गटात फायनलमध्ये पोहोचत कमीत कमी रौप्य पदक पक्के केले होते. मात्र फायनलआधी १०० ग्रॅम वजन अधिक असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. आता विनेशने कोर्ट ऑफ ऑर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्समध्ये अपील करत रौप्य पदकाची मागणी केली आहे. या बाबत १३ ऑगस्टला निर्णय येणार आहे.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार