तुळशीची पाने तोडताना कधीही करू नका या चुका

मुंबई: हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला मोठे महत्त्व आहे. हिंदू परंपरेनुसार यात लक्ष्मी मातेचा वास असतो असे मानले जाते. घरातील पुजेदरम्यान तुळशीपत्रांना मानाचे स्थान असते. घरासमोरही अंगणात तुळशीचे रोप पवित्र मानले जाते. त्याचे जसे धार्मिक महत्त्व आहे तसेच तुळशीच्या रोपाचे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्व आहे. यामुळे पर्यावरणात चांगली हवा राहण्यास मदत होते. तुळस ही औषधीही असल्याने त्याचे महत्त्व अधिक वाढते.

त्यामुळे तुळशीची पाने तोडताना काही गोष्टींची काळजी जरूर घेतली पाहिजे. पाहा काय काळजी घ्यावी...


सूर्य मावळल्यानंतर तुळशीची पाने तोडू नयेत. रात्रीच्या वेळेस तुळशीला स्पर्श करू नये.

तुळशीची पाने कधीही नखाने तोडू नयेत.

आंघोळ केल्याशिवाय तुळशीच्या रोपाला हात लावू नये. तुळशीची पाने तोडू नयेत.

सूर्यग्रहण असल्यास चंद्रग्रहण असल्यास तसेच एकादशीच्या दिवशी आणि रविवारच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत.
Comments
Add Comment

GST benefits on Classic Legend Java Yezd Bike: जावा, येझदी मोटारसायककडून जीएसटी दर कपात फायदा ग्राहकांकडे पास

क्लासिक लेजेंड्स कंपनीने देशभरातील ४५० हून अधिक केंद्रांवर विक्री आणि सेवांचा केला विस्तार प्रतिनिधी:जवळजवळ

माहिम किल्ला आणि सभोवतालचा तीन एकरचा परिसर विकसित करणार : अ‍ॅड आशिष शेलार

मुंबई : माहिम येथील ऐतिहासिक किल्ला आणि सभोवतालचा तीन एकरचा परिसर विकसित करण्यात येणार असून याबाबत मंत्रालयात

ठाणे-घोडबंदरच्या वाहतूक कोंडीवर मराठी अभिनेत्याची मिश्कील पोस्ट

ठाणे - मुंबई आणि उपनगरांमध्ये माणसांप्रमाणेच वाहनांमध्येही वाढ होत आहे. तसेच शहरांमध्ये सुरू असलेल्या

भारतीय बाजारात टेस्लाच्या किमतीमध्ये घट होणार, कंपनीचा सर्वात मोठा निर्णय!

मुंबई : अमेरिकेची सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्लाने २०२५ मध्ये भारतात मुंबई आणि दिल्ली या दोन

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही जसप्रीत बुमराहच अव्वल

दुबई (वृत्तसंस्था): आयसीसीने बुधवारी त्यांची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कुलदीप

एमपीएससीच्या ९३८ पदांसाठी भरती जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षासाठी जाहिरात