मुंबई: बांग्लादेश क्रिकेट संघ लवकरच पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. येथे दोन्ही संघादरम्यान २ कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. ही मालिका २१ ऑगस्टपासून सुरू होत आहे. पहिला सामना रावळपिंडीमध्ये आणि दुसरा सामना कराचीमध्ये खेळवला जाईल. यातच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अनोखा निर्णय घेतला आहे कारण तिकीटांचे दर कमी ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
खरंतर, पीसीबीने हा निर्णय मैदानामध्ये अधिकाधिक सीट भरण्यासाठी घेतला आहे. सगळ्यात स्वस्त तिकीट दर ५० रूपये आणि हे दर स्टेडियममधील जागांनुसार वाढत जाईल. कराची स्थित नॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये ५० रूपयांपासून तिकीट दर आहेत. तर प्रिमियम अनुभव ठेवण्यासाठी लोकांना तिकीट अधिकाधिक किंमत दीड लाख रूपये ठेवण्यात आली आहे.
दुसरीकडे रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमबद्दल बोलायचे झाल्यास पाकिस्तान-बांग्लादेश पहिला कसोटी सामना खेळवला जाईल. येथे तिकीटांची किंमत २०० रूपयांपासून सुरू होत आहे. चाहत्यांसाठी एक गॅलरी पासचीही सुविधा ठेवण्यात आली आहे. गॅलरी पासची किंमत २८०० रूपये ठेवण्यात आली आहे. हे तिकीट खरेदी करणाऱ्या व्यक्तींना लंच आणि चहाची सुविधा दिली जाईल.
टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये पाकिस्तानी संघाच्या खराब कामगिरीमुळे सुपर ८ मध्ये पोहोचू शकली नव्हती. त्या आयसीसी स्पर्धेनंतर पाकिस्तान संघ पहिली मोठी मालिका खेळवत आहे. यातच बांग्लादेश संघ आपल्या देशात सुरू असलेल्या विरोध प्रदर्शनामुळे शेड्यूल्डच्या आधीच पाकिस्तानात येईल.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…