क्रिकेट प्रेमींना लागली लॉटरी, केवळ ५० रूपयांत मिळणार तिकीट, लंच आणि चहाची सुविधा उपलब्ध

मुंबई: बांग्लादेश क्रिकेट संघ लवकरच पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. येथे दोन्ही संघादरम्यान २ कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. ही मालिका २१ ऑगस्टपासून सुरू होत आहे. पहिला सामना रावळपिंडीमध्ये आणि दुसरा सामना कराचीमध्ये खेळवला जाईल. यातच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अनोखा निर्णय घेतला आहे कारण तिकीटांचे दर कमी ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


खरंतर, पीसीबीने हा निर्णय मैदानामध्ये अधिकाधिक सीट भरण्यासाठी घेतला आहे. सगळ्यात स्वस्त तिकीट दर ५० रूपये आणि हे दर स्टेडियममधील जागांनुसार वाढत जाईल. कराची स्थित नॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये ५० रूपयांपासून तिकीट दर आहेत. तर प्रिमियम अनुभव ठेवण्यासाठी लोकांना तिकीट अधिकाधिक किंमत दीड लाख रूपये ठेवण्यात आली आहे.



लंच आणि चहाची सुविधा


दुसरीकडे रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमबद्दल बोलायचे झाल्यास पाकिस्तान-बांग्लादेश पहिला कसोटी सामना खेळवला जाईल. येथे तिकीटांची किंमत २०० रूपयांपासून सुरू होत आहे. चाहत्यांसाठी एक गॅलरी पासचीही सुविधा ठेवण्यात आली आहे. गॅलरी पासची किंमत २८०० रूपये ठेवण्यात आली आहे. हे तिकीट खरेदी करणाऱ्या व्यक्तींना लंच आणि चहाची सुविधा दिली जाईल.



वर्ल्डकपनंतर पाकिस्तानचा पहिली मालिका


टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये पाकिस्तानी संघाच्या खराब कामगिरीमुळे सुपर ८ मध्ये पोहोचू शकली नव्हती. त्या आयसीसी स्पर्धेनंतर पाकिस्तान संघ पहिली मोठी मालिका खेळवत आहे. यातच बांग्लादेश संघ आपल्या देशात सुरू असलेल्या विरोध प्रदर्शनामुळे शेड्यूल्डच्या आधीच पाकिस्तानात येईल.
Comments
Add Comment

‘गचाळ क्षेत्ररक्षणामुळे मालिका गमाविली’

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील तिसरा सामना

रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर मालिकेत अपयशी

भारतीय संघाच्या एकदिवसीय सामन्याच्या मालिका पराभवामागचे ‘व्हिलन‘ मुंबई : भारतीय संघाला घरच्या मैदानावर

बांगलादेशला निर्णय घेण्यास उद्यापर्यंत वेळ

अन्यथा आयसीसी टी-२० वर्ल्ड कपमध्ये स्कॉटलँड संघाला मिळणार संधी मुंबई : अवघ्या दोन आठवड्यांवर आलेल्या टी-२०

भारत-पाकिस्तान यांच्यात १५ फेब्रुवारीला क्रिकेटचे दोन सामने

आयसीसी टी-२० मध्ये महामुकाबला होणार मुंबई : क्रिकेट चाहत्यांना कायमच भारत विरुद्ध पाकिस्तान या २ देशांच्या

'न्यूझीलंड'ने इंदोरमध्ये उधळला विजयाचा गुलाल!

कोहलीची झुंजार खेळी व्यर्थ; भारताचा ४१ धावांनी पराभव इंदोर (वृत्तसंस्था) : न्यूझीलंड संघाने भारताचा तिसऱ्या

किवींच्या 'मिशेल-फिलिप्स'चा झंझावात; निर्णायक वन-डेमध्ये भारतासमोर हे लक्ष्य

इंदूर (वृत्तसंस्था): भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात रविवारी इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर वन-डे मालिकेतील