क्रिकेट प्रेमींना लागली लॉटरी, केवळ ५० रूपयांत मिळणार तिकीट, लंच आणि चहाची सुविधा उपलब्ध

मुंबई: बांग्लादेश क्रिकेट संघ लवकरच पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. येथे दोन्ही संघादरम्यान २ कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. ही मालिका २१ ऑगस्टपासून सुरू होत आहे. पहिला सामना रावळपिंडीमध्ये आणि दुसरा सामना कराचीमध्ये खेळवला जाईल. यातच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अनोखा निर्णय घेतला आहे कारण तिकीटांचे दर कमी ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


खरंतर, पीसीबीने हा निर्णय मैदानामध्ये अधिकाधिक सीट भरण्यासाठी घेतला आहे. सगळ्यात स्वस्त तिकीट दर ५० रूपये आणि हे दर स्टेडियममधील जागांनुसार वाढत जाईल. कराची स्थित नॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये ५० रूपयांपासून तिकीट दर आहेत. तर प्रिमियम अनुभव ठेवण्यासाठी लोकांना तिकीट अधिकाधिक किंमत दीड लाख रूपये ठेवण्यात आली आहे.



लंच आणि चहाची सुविधा


दुसरीकडे रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमबद्दल बोलायचे झाल्यास पाकिस्तान-बांग्लादेश पहिला कसोटी सामना खेळवला जाईल. येथे तिकीटांची किंमत २०० रूपयांपासून सुरू होत आहे. चाहत्यांसाठी एक गॅलरी पासचीही सुविधा ठेवण्यात आली आहे. गॅलरी पासची किंमत २८०० रूपये ठेवण्यात आली आहे. हे तिकीट खरेदी करणाऱ्या व्यक्तींना लंच आणि चहाची सुविधा दिली जाईल.



वर्ल्डकपनंतर पाकिस्तानचा पहिली मालिका


टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये पाकिस्तानी संघाच्या खराब कामगिरीमुळे सुपर ८ मध्ये पोहोचू शकली नव्हती. त्या आयसीसी स्पर्धेनंतर पाकिस्तान संघ पहिली मोठी मालिका खेळवत आहे. यातच बांग्लादेश संघ आपल्या देशात सुरू असलेल्या विरोध प्रदर्शनामुळे शेड्यूल्डच्या आधीच पाकिस्तानात येईल.
Comments
Add Comment

ड्रीम-११ आणि माय-११ नंतर गुगलचा बीसीसीआयला आधार

मुंबई : बीसीसीआय पूर्वी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून भरपूर उत्पन्न मिळवत होते. मात्र आता अशावेळी बोर्ड हे नुकसान

बॅडमिंटनपटू सायना नेहवालची निवृत्ती

गुडघ्याच्या दुखापतीने कारकिर्दीला पूर्णविराम मुंबई : भारतीय बॅडमिंटनला जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून

‘ए+’ श्रेणीतून विराट, रोहित, बुमराहला डच्चू?

बीसीसीआयच्या करारात ट्विस्ट : मानधनात कपात होण्याची शक्यता नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर

विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची परीक्षा

नागपुरात आज न्यूझीलंडविरुद्ध पहिली टी-२० लढत ; पांड्या, बुमराह, श्रेयसवर लक्ष नागपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या

कर्णधार सूर्यकुमार यादव गाठणार ‘शतकी’ टप्पा

नागपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा थरार बुधवारपासून नागपूरच्या विदर्भ

‘गचाळ क्षेत्ररक्षणामुळे मालिका गमाविली’

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील तिसरा सामना