Mumbai Crime : किरकोळ वादाने घेतला जीव! गोवंडीत भररस्त्यात तरुणाची हत्या

संपूर्ण थरार कॅमेरात कैद; तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात


गोवंडी : मुंबईच्या गोवंडी (Govandi) परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. गोवंडीत एका अठरा वर्षाच्या तरुणाची भररस्त्यात निर्घृण (Murder Case) हत्या केल्याची घटना घडली आहे. आरोपी आणि मृत तरूण यांच्यात किरकोळ वाद सुरु होते. मात्र या वादाचे रुपांतर थेट हाणामारीत झाल्यामुळे तरुणाला जीव गमवावा लागला. सदर प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मृत मोहम्मद सईद पठाण (१८) हा गोवंडीच्या शिवाजीनगरमध्ये कुटुंबीयांसोबत राहतो. तसेच हत्या प्रकरणातील आरोपी देखील याच परिसरात राहतात. हे सर्व एकमेकांच्या ओळखीचे आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद सुरु होते. मात्र त्या वादाला पूर्णविराम द्यावा असे आरोपींनी ठरवले. मोहम्मद हा शिवाजीनगर परिसरातून जात होता. त्यावेळी ३ अल्पवयीन मुलांनी (आरोपी) त्याला गाठले. आरोपींनी धारदार शस्त्राचा वापर करुन मोहम्मदच्या पाठीवर आणि कंबरेवर वार केले. या घटनेत रक्तबंबाळ झालेल्या अहमदला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


दरम्यान, या हत्येचे सर्व थरार मोबाइल कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहेत. तसेच मोहम्मदच्या मृत्यूनंतर शिवाजीनगर पोलिसांनी हत्या केल्याप्रकरणी ३ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या तिन्ही मुलांना बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. मात्र या घटनेतील प्रमुख आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा कसून तपास करत आहेत.

Comments
Add Comment

लालबागचा राजा मंडळाकडून मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना ५० लाखांची मदत

मुंबई:लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मराठवाड्यातील पुरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ५० लाखाचा

IND vs AUS : फक्त १० धावा करताच रोहित शर्मा रचणार इतिहास

पर्थ/मेलबर्न: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय (ODI)

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आज उद्घाटन

लंडनस्थित झहा अदीद या वास्तूविशारद कंपनीने केलंय डिझाइन नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई

येत्या चार वर्षात मुंबई चित्रपट नगरीचा कायापालट करणार - मुख्यमंत्री

मुंबई : मनोरंजनाची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये चित्रपट उद्योगासाठी आवश्यक परिसंस्था संपूर्ण विकसित झाली असून