Mumbai Crime : किरकोळ वादाने घेतला जीव! गोवंडीत भररस्त्यात तरुणाची हत्या

संपूर्ण थरार कॅमेरात कैद; तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात


गोवंडी : मुंबईच्या गोवंडी (Govandi) परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. गोवंडीत एका अठरा वर्षाच्या तरुणाची भररस्त्यात निर्घृण (Murder Case) हत्या केल्याची घटना घडली आहे. आरोपी आणि मृत तरूण यांच्यात किरकोळ वाद सुरु होते. मात्र या वादाचे रुपांतर थेट हाणामारीत झाल्यामुळे तरुणाला जीव गमवावा लागला. सदर प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मृत मोहम्मद सईद पठाण (१८) हा गोवंडीच्या शिवाजीनगरमध्ये कुटुंबीयांसोबत राहतो. तसेच हत्या प्रकरणातील आरोपी देखील याच परिसरात राहतात. हे सर्व एकमेकांच्या ओळखीचे आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद सुरु होते. मात्र त्या वादाला पूर्णविराम द्यावा असे आरोपींनी ठरवले. मोहम्मद हा शिवाजीनगर परिसरातून जात होता. त्यावेळी ३ अल्पवयीन मुलांनी (आरोपी) त्याला गाठले. आरोपींनी धारदार शस्त्राचा वापर करुन मोहम्मदच्या पाठीवर आणि कंबरेवर वार केले. या घटनेत रक्तबंबाळ झालेल्या अहमदला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


दरम्यान, या हत्येचे सर्व थरार मोबाइल कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहेत. तसेच मोहम्मदच्या मृत्यूनंतर शिवाजीनगर पोलिसांनी हत्या केल्याप्रकरणी ३ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या तिन्ही मुलांना बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. मात्र या घटनेतील प्रमुख आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा कसून तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Pune Crime : धक्कादायक ! शरीरात दैवी शक्तीचा वास असल्याचं भासवून महिलेवर अत्याचार

पुणे : पुण्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात एका भोंदूबाबानं चक्क अंगात देवी

Raja Shivaji : आशा भोसलेंच्या निधनानं सिनेसृष्टीवर शोककळा, 'राजा शिवाजी' सिनेमाबद्दल रितेशनं घेतला 'हा' मोठा निर्णय

मुंबई : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या बहुप्रतिक्षित सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. या सिनेमाचा

Solapur News : झाडाला बांधलेली दोरी सुटली आणि... सख्ख्या भावंडांवर काळाचा घाला

सोलापूर : सोलापूर तालुक्यातील औज मंद्रूप परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अंकलगी वस्तीवरील शेततळ्यात बुडून

Mumbai Local : आता पश्चिम रेल्वेचा प्रवास होणार अधिक सोयीस्कर, लवकरच या स्थानकांवर धावणार 15 डब्यांची लोकल

मुंबई : पश्चिम रेल्वेचा प्रवास लवकरच अधिक सोयीस्कर होणार आहे. पश्चिम रेल्वेवरील विरार ते डहाणूदरम्यान १९९४

Asha Bhosle : दुसरा जन्म मिळाला तर, पुन्हा आशा भोसलेच व्हायला आवडेल का?

गायिका आशा भोसले यांना एकदा मुलाखतीमध्ये विचारलेले की, दुसरा जन्म मिळाला तर तुम्हाला आशा भोसलेच व्हायला आवडेल

पं. हृदयनाथ मंगेशकरांचे भाषण अन् भावविवश आशाताई

'स्वरस्वामिनी आशा' या पुस्तकाचे प्रकाशन विले पार्लेतील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात राष्ट्रीय सरसंघचालक मोहन