Mumbai Crime : किरकोळ वादाने घेतला जीव! गोवंडीत भररस्त्यात तरुणाची हत्या

संपूर्ण थरार कॅमेरात कैद; तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात


गोवंडी : मुंबईच्या गोवंडी (Govandi) परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. गोवंडीत एका अठरा वर्षाच्या तरुणाची भररस्त्यात निर्घृण (Murder Case) हत्या केल्याची घटना घडली आहे. आरोपी आणि मृत तरूण यांच्यात किरकोळ वाद सुरु होते. मात्र या वादाचे रुपांतर थेट हाणामारीत झाल्यामुळे तरुणाला जीव गमवावा लागला. सदर प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मृत मोहम्मद सईद पठाण (१८) हा गोवंडीच्या शिवाजीनगरमध्ये कुटुंबीयांसोबत राहतो. तसेच हत्या प्रकरणातील आरोपी देखील याच परिसरात राहतात. हे सर्व एकमेकांच्या ओळखीचे आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद सुरु होते. मात्र त्या वादाला पूर्णविराम द्यावा असे आरोपींनी ठरवले. मोहम्मद हा शिवाजीनगर परिसरातून जात होता. त्यावेळी ३ अल्पवयीन मुलांनी (आरोपी) त्याला गाठले. आरोपींनी धारदार शस्त्राचा वापर करुन मोहम्मदच्या पाठीवर आणि कंबरेवर वार केले. या घटनेत रक्तबंबाळ झालेल्या अहमदला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


दरम्यान, या हत्येचे सर्व थरार मोबाइल कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहेत. तसेच मोहम्मदच्या मृत्यूनंतर शिवाजीनगर पोलिसांनी हत्या केल्याप्रकरणी ३ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या तिन्ही मुलांना बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. मात्र या घटनेतील प्रमुख आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा कसून तपास करत आहेत.

Comments
Add Comment

शिवसेनेचे 'मिशन मुंबई महापालिका'

कडोंमपा, उल्हासनगरमध्ये भाजपला ‘चेकमेट’ करण्याचा डाव ठाणे/ कल्याण/ उल्हासनगर : मुंबई महानगरपालिकेच्या

कडोंमपातील उबाठाचे ४ नगरसेवक फुटल्याची चर्चा

७ नगरसेवक गट नोंदणीसाठी हजर कल्याण : कल्याण-डोंबिवली महानरपालिकेच्या निकालानंतर स्थानिक राजकीय नाट्याची

श्री सिद्धिविनायक मंदिरात ‘माघी गणेश जयंती महोत्सवा'स सुरुवात

गायन, वादन, शोभायात्रांसह आठवडाभर चालणार धार्मिक सोहळा मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात

माघी श्रीगणेशोत्सव २०२६ करता कृत्रिम तलावांसह विविध सुविधा सज्ज

मुंबई : माघी श्रीगणेशोत्सव २२ जानेवारी २०२६ पासून साजरा करण्यात येणार आहे. हा उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा

मुंबई पालिकेच्या शैक्षणिक इतिहासात नवा टप्पा

सीबीएसईच्या पहिल्या १० वीच्या बॅचसाठी ३६६ विद्यार्थी तयार मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात

शबरीमाला सोने चोरी प्रकरणात 'ईडी’कारवाई

तीन राज्यांमध्ये २१ ठिकाणी छापेमारी नवी दिल्ली : केरळमधील पवित्र सबरीमाला अय्यप्पा मंदिराशी संबंधित सोने चोरी