Himachal Rain : हिमाचलमध्ये ढगफुटीसह भूकंपाचे धक्के! पुरामुळे जनजीवन विस्कळीत; २८ जणांचा मृत्यू

हवामान विभागाकडून अलर्ट जारी


शिमला : मागील आठवड्यात संपूर्ण राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्या तुलनेत या आठवड्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली. मात्र अनेक भागांत पावसाची रिपरिप सुरुच असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच हिमाचल प्रदेशात पावसाने धुमाकूळ (Himachal Rain) घातला आहे. याठिकाणी पावसाची संततधार सुरु असल्यामुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणात साचले आहे. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून २८ जणांचा मृत्यू झाल्याची देखील बातमी मिळत आहे. एकीकडे मुसळधार तर दुसरीकडे भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे हिमाचलमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


हिमाचल प्रदेशासह उत्तर प्रदेशात कालपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे हिमाचलमधील रक्कड कॉलनीत पावसाचे पाणी शिरले. यामुळे नागरिकांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातच उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील गंगा नदीसह इतर नद्यांच्या पाणीपातळीतही लक्षणीय वाढ झाल्यामुळे हवामान विभागाने (IMD) या भागात अलर्ट जारी केला.



हिमाचलमध्ये तीन वेळा जाणवले भूकंपाचे धक्के


हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि ढगफुटीच्या घटनेनंतर भूकंपाचे धक्के बसले आहेत. या ठिकाणी झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.३ इतकी नोंदवण्यात आली. या भूकंपाचा केंद्रबिंदू मंडी येथे होता. भूकंपाचे धक्के तीन वेळा जाणवले असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला