Himachal Rain : हिमाचलमध्ये ढगफुटीसह भूकंपाचे धक्के! पुरामुळे जनजीवन विस्कळीत; २८ जणांचा मृत्यू

हवामान विभागाकडून अलर्ट जारी


शिमला : मागील आठवड्यात संपूर्ण राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्या तुलनेत या आठवड्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली. मात्र अनेक भागांत पावसाची रिपरिप सुरुच असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच हिमाचल प्रदेशात पावसाने धुमाकूळ (Himachal Rain) घातला आहे. याठिकाणी पावसाची संततधार सुरु असल्यामुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणात साचले आहे. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून २८ जणांचा मृत्यू झाल्याची देखील बातमी मिळत आहे. एकीकडे मुसळधार तर दुसरीकडे भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे हिमाचलमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


हिमाचल प्रदेशासह उत्तर प्रदेशात कालपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे हिमाचलमधील रक्कड कॉलनीत पावसाचे पाणी शिरले. यामुळे नागरिकांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातच उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील गंगा नदीसह इतर नद्यांच्या पाणीपातळीतही लक्षणीय वाढ झाल्यामुळे हवामान विभागाने (IMD) या भागात अलर्ट जारी केला.



हिमाचलमध्ये तीन वेळा जाणवले भूकंपाचे धक्के


हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि ढगफुटीच्या घटनेनंतर भूकंपाचे धक्के बसले आहेत. या ठिकाणी झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.३ इतकी नोंदवण्यात आली. या भूकंपाचा केंद्रबिंदू मंडी येथे होता. भूकंपाचे धक्के तीन वेळा जाणवले असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Comments
Add Comment

रेल्वेतून उतरल्यानंतर घरी जाण्यासाठी ई - बाईक !

रेल्वेची रस्त्यावरही सेवा नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने काही प्रमुख स्थानकांवर ई-बाईक भाड्याने देण्याची सेवा

राज्यात थंडीच्या कडाक्यात वाढ

मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाला यलो अलर्ट नवी दिल्ली : उत्तरेकडून शीत लहरी महाराष्ट्राकडे वेगाने येत

राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित

काँग्रेसच्या महत्वपूर्ण बैठकांना वारंवार गैरहजर नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपुरम येथील

‘मनरेगा’ नव्हे, आता ‘पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना’

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत ग्रामीण रोजगाराबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेताना

देशात २०२७ मध्ये डिजीटल जनगणना

११ हजार ७१८ कोटी रुपयांची तरतूद दोन टप्प्यांत होणार जनगणना एप्रिल ते डिसेंबर सात महिन्यांचा कालावधी

धीरेंद्र शास्त्री करणार भुतांवर पीएचडी ; भुतांवर उच्च शिक्षणाची दारे खुली ?

बागेश्वर धाम : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी उच्च शिक्षणाची इच्छा व्यक्त करत