Himachal Rain : हिमाचलमध्ये ढगफुटीसह भूकंपाचे धक्के! पुरामुळे जनजीवन विस्कळीत; २८ जणांचा मृत्यू

हवामान विभागाकडून अलर्ट जारी


शिमला : मागील आठवड्यात संपूर्ण राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्या तुलनेत या आठवड्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली. मात्र अनेक भागांत पावसाची रिपरिप सुरुच असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच हिमाचल प्रदेशात पावसाने धुमाकूळ (Himachal Rain) घातला आहे. याठिकाणी पावसाची संततधार सुरु असल्यामुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणात साचले आहे. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून २८ जणांचा मृत्यू झाल्याची देखील बातमी मिळत आहे. एकीकडे मुसळधार तर दुसरीकडे भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे हिमाचलमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


हिमाचल प्रदेशासह उत्तर प्रदेशात कालपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे हिमाचलमधील रक्कड कॉलनीत पावसाचे पाणी शिरले. यामुळे नागरिकांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातच उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील गंगा नदीसह इतर नद्यांच्या पाणीपातळीतही लक्षणीय वाढ झाल्यामुळे हवामान विभागाने (IMD) या भागात अलर्ट जारी केला.



हिमाचलमध्ये तीन वेळा जाणवले भूकंपाचे धक्के


हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि ढगफुटीच्या घटनेनंतर भूकंपाचे धक्के बसले आहेत. या ठिकाणी झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.३ इतकी नोंदवण्यात आली. या भूकंपाचा केंद्रबिंदू मंडी येथे होता. भूकंपाचे धक्के तीन वेळा जाणवले असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Comments
Add Comment

ब्रिटनची ९ मोठी विद्यापीठे भारतात कॅम्पस सुरू करणार; पंतप्रधान मोदी आणि कीर स्टार्मर यांची मोठी घोषणा

मुंबई: भारत-ब्रिटन संबंधांमध्ये शिक्षण आणि युवाशक्तीला बळ देणारा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. ब्रिटनचे

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार

दहशतवाद्यांनी बर्फवृष्टीचा फायदा घेऊन घुसखोरी करू नये , सुरक्षा दलांनी सज्ज रहावे - अमित शाह

नवी दिल्ली : “केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधातील “शून्य सहनशीलता” धोरण पुढेही कायम राहणार आहे”, असे केंद्रीय

मोठा अपघात टळला; फर्रुखाबादमध्ये खाजगी विमानाचा अपघात

फर्रुखाबा : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथील विमान तळावर आज सकाळी एका खासगी विमानाचा

विषारी कफ सिरपमुळे २३ चिमुरड्यांचा मृत्यू, कंपनीच्या संचालकाला अटक

नवी दिल्ली : श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली.

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या