Hijab Ban : मुंबईतील महाविद्यालयाच्या हिजाब बंदीला ‘सुप्रीम’ची स्थगिती

उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान


मुंबई : मुंबईतील खासगी महाविद्यालयांमध्ये हिजाब, निकाब, बुरखा, टोपी घालण्यावर बंदी (Hijab Ban) घालणाऱ्या परिपत्रकाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने कॉलेज प्रशासनाला नोटीस बजावून उत्तरही मागवले आहे. मुंबईच्या एनजी आचार्य आणि डीके मराठे कॉलेजने (NG Acharya & DK Marathe College) हिजाब, निकाब, बुरखा, स्टोल, टोपी घालण्यावर बंदी घातली आहे. याविरोधात नऊ मुलींनी यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र उच्च न्यायालयाने हा अर्ज फेटाळला होता. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने कोणी कपाळावर टिळा लावला म्हणून काॅलेजमध्ये प्रवेश नाकारता येतो का? असा सवालही महविद्यालय प्रशासनाला विचारला आहे. विद्यार्थ्यांना हवे ते परिधान करण्याचा पर्याय असणे आवश्यक असल्याचेही म्हटले आहे. १८ नोव्हेंबर रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.


महाविद्यालयाची सूचना कायम ठेवणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मुंबईतील काही खासगी महाविद्यालयांनी परिपत्रक जारी करून हिजाब, निकाब, बुरखा, टोपी आणि तत्सम पोशाख परिधान करण्यावर बंदी घातली होती. महाविद्यालय प्रशासनाचा निर्णय धर्माचे पालन करण्याचा मूलभूत अधिकार तसेच गोपनियतेच्या अधिकाराचे उल्लंघन करतो, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठाने महाविद्यालयाच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करत प्रश्न उपस्थित केले. जर एकसमान गणवेश लागू करण्याचा महाविद्यालयाचा हेतू असेल, तर टिळा आणि टिकली यांसारख्या धार्मिक चिन्हांवर बंदी का घातली नाही? असा सवाल न्यायालयाने केला. महाविद्यालयाची बाजू मांडणाऱ्या ज्येष्ठ वकील माधवी दिवाण यांनी ही खासगी संस्था असल्याचे सांगितल्यावर न्यायमूर्ती कुमार यांनी महाविद्यालय कधीपासून सुरू आहे, अशी विचारणा केली.



नोटीसमध्ये ड्रेस कोडची रूपरेषा


दरम्यान, १ मे रोजी चेंबूर ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटीच्या एन. जी. आचार्य आणि डी. के. मराठे महाविद्यालयाने त्यांच्या अधिकृत व्हॉट्सॲॅप ग्रुपवर एक नोटीस जारी केली होती. नोटीसमध्ये ड्रेस कोडची रूपरेषा देण्यात आली होती. ज्यात हिजाब, निकाब, बुरखा, कॅप, बॅज आणि कॉलेजच्या परिसरात चोरी करण्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर हा वाद सुरू झाला होता.

Comments
Add Comment

Mantralaya Water : 'मंत्रालयातील पाणी पूर्णपणे सुरक्षित'; टाक्यांची स्वच्छता, वॉटर प्युरिफायर सर्व्हिसिंग पूर्ण, BMCचा अहवाल दिलासा देणारा

मुंबई : मंत्रालयातील पाणीपुरवठ्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनंतर सार्वजनिक बांधकाम

Monsoon Update : राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात अलर्ट

मुंबई(Mumbai) : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचे स्वरूप विस्कळीत राहिले होते. मात्र आता राज्यातील अनेक

Chandrashekar Bawankule : नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

 महसूल विभागाच्या सेवा नियमांत ५० वर्षांनी बदल; मुख्यमंत्र्यांकडून प्रस्तावाला मान्यता मुंबई : महसूल

MIDC Maharashtra : वैभववाडी 'MIDC'ला मूर्त रूप, पायाभूत सुविधांची कामे तातडीने सुरू करण्याचे मंत्री उदय सामंतांचे निर्देश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत मंत्रालयात बैठक मुंबई :

Mumbai Police : CJPच्या आंदोलनानंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; ८ पोलीस ठाण्यांत ९०० हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील CJP आंदोलनानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत शहरातील आठ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण,