Narayan Rane : बाळासाहेब गेले तेव्हाच शिवसेना संपली; नारायण राणेंचा ठाकरेंवर प्रहार

  95

मुंबई : "जेव्हा बाळासाहेब गेले तेव्हाच शिवसेना संपली होती. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सध्या फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसांना शिव्या देण्याच काम करत आहेत." असा जोरदार प्रहार भाजपा नेते, माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.


सिंधुदुर्गमधील एका कार्यक्रमात बोलताना नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. राणे पुढे म्हणाले, "देवेंद्र फडणवीस बुद्धीमान आहेत. ते सज्जन आहेत त्यामुळे ठाकरेंच्या टीकेला ते उत्तर देत नाहीत."


माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेना फुटल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांना शिंगावर घेत आहेत. अशात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही सोडले नाही. फडणवीस यांनीच त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हायला भाग पाडले. यामुळे जळीस्थळी काष्ठी पाषाणी त्यांना फडणवीस दिसतात. त्यामुळे गेल्या दोन अडीच वर्षात असा एकही कार्यक्रम, सभा नाही जिथे ठाकरेंनी फडणवीसांवर टीका केली नसेल.



दरम्यान देवेंद्र फडणवीस ठाकरेंना थेट प्रत्युत्तर देत नसले तरी भाजपाचे दुस-या फळीतील नेते मात्र, फडणवीसांच्या टिकेला चोख उत्तर देत ठाकरेंवर हल्लाबोल करत असतात.

Comments
Add Comment

एसटी महामंडळाच्या राखी पौर्णिमेसाठी ४० जादा गाड्या कार्यरत

लाडक्या बहिणींसाठी ८, ९ आणि ११ ऑगस्ट रोजी बसची विशेष सेवा पेण(स्वप्नील पाटील) : आधीच लाडक्या बहिणींना एसटी

राज्यातील ५ ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांसाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

नियमितपणे आढावा, समन्वय साधणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई : राज्यातील पाच

माधुरी लवकरच कोल्हापूरला परतणार!

कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश; माधुरीला परत पाठवण्याबाबत वनताराकडून आश्वासन कोल्हापूर: कोल्हापूरकरांच्या

उत्तराखंडमधील ढगफुटीत अडकले महाराष्ट्रातील ५१ पर्यटक

सर्व पर्यटक सुखरूप असल्याची राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती मुंबई : उत्तराखंडमधील राज्यातील उत्तरकाशी

Hingoli Train Fire : हिंगोली रेल्वे स्थानकावर उभ्या बोगीला भीषण आग; संपूर्ण बोगी जळून खाक

हिंगोली : हिंगोली शहरातील रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एका जुन्या बोगीला बुधवारी (६ ऑगस्ट) सकाळी सुमारे ८:३०

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश, कोकण रेल्वेच्या रो - रो कार सेवेला नांदगावात थांबा

कोकण रेल्वे प्रवासी संघ समन्वय संघर्ष समितीने देखील वेधले होते लक्ष मुंबईकर चाकरमान्यांसाठी दिलासादायक