Dhananjay Munde : नाशिकमधील शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! या महिनाअखेरीस खात्यात जमा होणार 'इतकी' रक्कम

  110

राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा


नाशिक : नाशिक जिल्ह्यातील (Nashik News) शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत (PM Fasal Bima Yojana) सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना येत्या काही दिवसांत विमा रक्कम जमा होणार असल्याची घोषणा केली. या पिकविमा संदर्भात मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादाजी भुसे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात येणार असून त्याआधारे योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचे राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी म्हटले.


मिळालेल्या माहितीनुसार, काल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा नाशिक जिल्ह्यात आली होती. यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच शेतकऱ्यांसमवेत चर्चा केली. त्यांनंतर शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या विम्याच्या प्रश्नामुळे आज सकाळी धनंजय मुंडे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे व इतर अधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन जिल्ह्यातील सर्व परिस्थितीची माहिती घेतली. त्यानुसार नाशिकमधील जवळपास ६ लाख शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी देण्यात येणारे ८५३ कोटी रुपये ३१ऑगस्ट पूर्वी मिळणार असल्याची घोषणा धनंजय मुंडे यांनी केली.


दरम्यान, गत वर्षी नाशिकमधील सुमारे ५ लाख ८८ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता. त्याअंतर्गत शेतकऱ्यांना ७९ कोटी रुपयांचा लाभ मिळाला होता. त्यानंतर आज कृषीमंत्री मुंडे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे यंदा शेतकऱ्यांना ८५३ कोटी रुपये मिळणार आहेत.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या