Dhananjay Munde : नाशिकमधील शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! या महिनाअखेरीस खात्यात जमा होणार 'इतकी' रक्कम

राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा


नाशिक : नाशिक जिल्ह्यातील (Nashik News) शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत (PM Fasal Bima Yojana) सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना येत्या काही दिवसांत विमा रक्कम जमा होणार असल्याची घोषणा केली. या पिकविमा संदर्भात मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादाजी भुसे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात येणार असून त्याआधारे योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचे राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी म्हटले.


मिळालेल्या माहितीनुसार, काल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा नाशिक जिल्ह्यात आली होती. यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच शेतकऱ्यांसमवेत चर्चा केली. त्यांनंतर शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या विम्याच्या प्रश्नामुळे आज सकाळी धनंजय मुंडे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे व इतर अधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन जिल्ह्यातील सर्व परिस्थितीची माहिती घेतली. त्यानुसार नाशिकमधील जवळपास ६ लाख शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी देण्यात येणारे ८५३ कोटी रुपये ३१ऑगस्ट पूर्वी मिळणार असल्याची घोषणा धनंजय मुंडे यांनी केली.


दरम्यान, गत वर्षी नाशिकमधील सुमारे ५ लाख ८८ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता. त्याअंतर्गत शेतकऱ्यांना ७९ कोटी रुपयांचा लाभ मिळाला होता. त्यानंतर आज कृषीमंत्री मुंडे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे यंदा शेतकऱ्यांना ८५३ कोटी रुपये मिळणार आहेत.

Comments
Add Comment

शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर

निवडणूक आयोगाने वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता उमेदवाराने करावयाच्या

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे?

मुंबई : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या

शेतकरी, पशुपालकांना वीज दरात सवलत मिळणार, पण 'या' अटींवर...

मुंबई : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात

धक्कादायक! एसटीचे ७ कर्मचारी दारू पिऊन ड्युटीवर!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कारवाईचा बडगा मुंबई : अचानक केलेल्या तपासणीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

Tamhini Ghat Accident : 'सनरूफ' ठरला जीवघेणा! ताम्हिणी घाटात दरड कोसळून थरार, सनरुफ तोडून दगड थेट कारमध्ये पडले; महिलेचा जागीच मृत्यू!

पुणे/रायगड : पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी अपघाताची घटना