Dhananjay Munde : नाशिकमधील शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! या महिनाअखेरीस खात्यात जमा होणार 'इतकी' रक्कम

राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा


नाशिक : नाशिक जिल्ह्यातील (Nashik News) शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत (PM Fasal Bima Yojana) सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना येत्या काही दिवसांत विमा रक्कम जमा होणार असल्याची घोषणा केली. या पिकविमा संदर्भात मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादाजी भुसे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात येणार असून त्याआधारे योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचे राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी म्हटले.


मिळालेल्या माहितीनुसार, काल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा नाशिक जिल्ह्यात आली होती. यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच शेतकऱ्यांसमवेत चर्चा केली. त्यांनंतर शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या विम्याच्या प्रश्नामुळे आज सकाळी धनंजय मुंडे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे व इतर अधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन जिल्ह्यातील सर्व परिस्थितीची माहिती घेतली. त्यानुसार नाशिकमधील जवळपास ६ लाख शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी देण्यात येणारे ८५३ कोटी रुपये ३१ऑगस्ट पूर्वी मिळणार असल्याची घोषणा धनंजय मुंडे यांनी केली.


दरम्यान, गत वर्षी नाशिकमधील सुमारे ५ लाख ८८ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता. त्याअंतर्गत शेतकऱ्यांना ७९ कोटी रुपयांचा लाभ मिळाला होता. त्यानंतर आज कृषीमंत्री मुंडे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे यंदा शेतकऱ्यांना ८५३ कोटी रुपये मिळणार आहेत.

Comments
Add Comment

मुंबई लोकलमध्ये नियम कडक; मासिक पाससाठी लागू होणार 'हे' कडक नियम

मुंबई : लोकलमध्ये विनातिकिट किंवा बनावट तिकिटांचा वापर करुन प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी रेल्वे

सिडको घरांच्या किंमतीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी; 'हे चालणार नाही, गरिबांसाठी ती घरं आहेत' बैठकीत स्पष्ट निर्देश

नागपूर: सिडको अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांच्या किंमतींमध्ये केलेल्या मोठ्या वाढीवरून निर्माण झालेल्या

जमिनीच्या अकृषिक वापरानंतर आता ‘सनद’ची अटही रद्द!

नागपूर : राज्यातील जमीन महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

मालवणीत २०१० नंतर विशिष्ट धर्मियांची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६ टक्क्यांपर्यंत कशी वाढली? - मंत्री मंगल प्रभात लोढा यांता काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना सवाल

नागपूर : मुंबईतील मालाड-मालवणी भागात गेल्या १४ वर्षांत एका विशिष्ट समाजाची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६

चालान न भरणाऱ्या वाहनांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात मोठी घोषणा

नागपूर: महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. आजच्या कामकाजात विधान परिषदेत नियम

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ ते समाधी स्थळापर्यंतनवीन रस्ता निर्मितीस मान्यता

तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेण्यात याव्यात - मुख्यमंत्री