IND vs SL: भारताविरुद्ध तिसऱ्या वनडेत श्रीलंकेचा विजय, मालिका २-०ने जिंकली

कोलंबो: तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात श्रीलंकेने भारतावर जबरदस्त विजय मिळवला आहे. या सामन्यात श्रीलंकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बाद २४८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल भारताने केवळ १३८ धावा केल्या.


या विजयासह श्रीलंकेने ही मालिका २-०अशी जिंकली आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने बाजी मारत आघाडी घेतली. हा सामना खरंतर भारतासाठी करो वा मरोचा होता. मात्र श्रीलंकेच्या गोलंदाजांपुढे भारतीय फलंदाजांनी लोटांगण घातले आणि तिसऱ्या सामन्यात भारताचा पराभव झाला.


श्रीलंकेने विजयासाठी दिलेले २४८ धावांचे माफक आव्हानही भारताला पूर्ण करता आले नाही. श्रीलंकेच्या दुनिथ वेलालगेने ५ विकेट घेत भारताच्या डावाला खिंडार पाडली. तर महीश तिक्षणा आणि जेफ्री वांडरसे यांनी प्रत्येकी २ विकेट घेत श्रीलंकेच्या विजयात मोलाचे योगदान दिले. या सामन्यात रोहित शर्माने ३५ धावा, वॉशिंग्टन सुंदरने ३० धावा आणि विराट कोहलीने २० धावा केल्या. बाकी फलंदाजांना चांगली धावसंख्या गाठता आली नाही.


भारताचे अधिकतर फलंदाज श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत फ्लॉप ठरले. रोहित शर्माने चांगली सुरूवात देण्याचा प्रयत्न केला. त्याने २० बॉलमध्ये ३५ धावा केल्या. शुभमन गिल ६ धावा करून बाद झाला. विराट कोहली २० धावा करत पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने १८ बॉलचा सामना केला. ऋषभ पंत ६ धावा करून बाद झाला. श्रेयस अय्यर ८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अक्षऱ पटेल आणि रियान पराग १५ धावा करून बाद झाला.
Comments
Add Comment

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने