IND vs SL: भारताविरुद्ध तिसऱ्या वनडेत श्रीलंकेचा विजय, मालिका २-०ने जिंकली

कोलंबो: तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात श्रीलंकेने भारतावर जबरदस्त विजय मिळवला आहे. या सामन्यात श्रीलंकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बाद २४८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल भारताने केवळ १३८ धावा केल्या.


या विजयासह श्रीलंकेने ही मालिका २-०अशी जिंकली आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने बाजी मारत आघाडी घेतली. हा सामना खरंतर भारतासाठी करो वा मरोचा होता. मात्र श्रीलंकेच्या गोलंदाजांपुढे भारतीय फलंदाजांनी लोटांगण घातले आणि तिसऱ्या सामन्यात भारताचा पराभव झाला.


श्रीलंकेने विजयासाठी दिलेले २४८ धावांचे माफक आव्हानही भारताला पूर्ण करता आले नाही. श्रीलंकेच्या दुनिथ वेलालगेने ५ विकेट घेत भारताच्या डावाला खिंडार पाडली. तर महीश तिक्षणा आणि जेफ्री वांडरसे यांनी प्रत्येकी २ विकेट घेत श्रीलंकेच्या विजयात मोलाचे योगदान दिले. या सामन्यात रोहित शर्माने ३५ धावा, वॉशिंग्टन सुंदरने ३० धावा आणि विराट कोहलीने २० धावा केल्या. बाकी फलंदाजांना चांगली धावसंख्या गाठता आली नाही.


भारताचे अधिकतर फलंदाज श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत फ्लॉप ठरले. रोहित शर्माने चांगली सुरूवात देण्याचा प्रयत्न केला. त्याने २० बॉलमध्ये ३५ धावा केल्या. शुभमन गिल ६ धावा करून बाद झाला. विराट कोहली २० धावा करत पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने १८ बॉलचा सामना केला. ऋषभ पंत ६ धावा करून बाद झाला. श्रेयस अय्यर ८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अक्षऱ पटेल आणि रियान पराग १५ धावा करून बाद झाला.
Comments
Add Comment

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे

IND vs SA Test : अवघ्या तीन दिवसांत भारताचा पराभव, मालिकेत पिछाडी, गुवाहाटीत ‘करो या मरो’ सामना

कोलकाता : ईडन गार्डन्सवरील पहिली कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. भारताला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला.

कोलकाता कसोटीचा शेवटचा डाव सुरू, जयस्वाल पाठोपाठ केएल राहुलही बाद

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स