IND vs SL: भारताविरुद्ध तिसऱ्या वनडेत श्रीलंकेचा विजय, मालिका २-०ने जिंकली

कोलंबो: तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात श्रीलंकेने भारतावर जबरदस्त विजय मिळवला आहे. या सामन्यात श्रीलंकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बाद २४८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल भारताने केवळ १३८ धावा केल्या.


या विजयासह श्रीलंकेने ही मालिका २-०अशी जिंकली आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने बाजी मारत आघाडी घेतली. हा सामना खरंतर भारतासाठी करो वा मरोचा होता. मात्र श्रीलंकेच्या गोलंदाजांपुढे भारतीय फलंदाजांनी लोटांगण घातले आणि तिसऱ्या सामन्यात भारताचा पराभव झाला.


श्रीलंकेने विजयासाठी दिलेले २४८ धावांचे माफक आव्हानही भारताला पूर्ण करता आले नाही. श्रीलंकेच्या दुनिथ वेलालगेने ५ विकेट घेत भारताच्या डावाला खिंडार पाडली. तर महीश तिक्षणा आणि जेफ्री वांडरसे यांनी प्रत्येकी २ विकेट घेत श्रीलंकेच्या विजयात मोलाचे योगदान दिले. या सामन्यात रोहित शर्माने ३५ धावा, वॉशिंग्टन सुंदरने ३० धावा आणि विराट कोहलीने २० धावा केल्या. बाकी फलंदाजांना चांगली धावसंख्या गाठता आली नाही.


भारताचे अधिकतर फलंदाज श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत फ्लॉप ठरले. रोहित शर्माने चांगली सुरूवात देण्याचा प्रयत्न केला. त्याने २० बॉलमध्ये ३५ धावा केल्या. शुभमन गिल ६ धावा करून बाद झाला. विराट कोहली २० धावा करत पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने १८ बॉलचा सामना केला. ऋषभ पंत ६ धावा करून बाद झाला. श्रेयस अय्यर ८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अक्षऱ पटेल आणि रियान पराग १५ धावा करून बाद झाला.
Comments
Add Comment

WC Semi-Final: पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचली दक्षिण आफ्रिका, इंग्लंडला १२५ धावांनी हरवले

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ मध्ये मोठा उलटफेर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द : दुसरा सामना ३१ ऑक्टोबरला!

ऑस्ट्रेलिया : मनुका ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणारा पहिला टी२० सामना अखेर सततच्या

टी२० मध्ये पुन्हा पावसाचे विघ्न: २० ऐवजी १८ षटकांचा सामना !

कॅनबेरा : कॅनबेरातील मनुका ओव्हल स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत–ऑस्ट्रेलिया पहिल्या टी२० सामन्यात पुन्हा एकदा

भारताला मोठा धक्का: दुखापतीमुळे नितीश कुमार रेड्डी तीन T20 सामन्यांमधून बाहेर!

कॅनबेरा : भारतीय क्रिकेट संघासाठी धोक्याची घंटा वाजवणारी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने बुधवारी दिलेल्या

७ महिन्यांच्या गर्भवती सोनिकाने जिंकले वेटलिफ्टिंग स्पर्धेत कांस्य पदक

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नाही, फक्त जिद्द असायला हवी. दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे खरे

वन डे रँकिंगमध्ये स्मृती मानधनाचे वर्चस्व कायम

मुंबई : आयसीसी महिला एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेत भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने चमकदार कामगिरी केली