MLA disqualification : ठाकरे गटाच्या वकिलांवर भडकले सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश!

आमदार अपात्रता सुनावणीवेळी नेमकं काय घडलं?


नवी दिल्ली : शिवसेना (Shivsena) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या (NCP) फुटीनंतर कोणाचा पक्ष खरा यासोबतच आमदार अपात्रतेचा मुद्दा (MLA disqualification) निकालात येणं बाकी आहे. पक्ष सोडून जाणाऱ्या आमदारांबद्दल ठाकरे गट व शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाने हा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवला होता. नार्वेकरांनी शिवसेना व ठाकरे गट यांपैकी बहुमताच्या जोरावर खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याचा निकाल देत कोणत्याही गटाचे आमदार अपात्र ठरवले नाहीत. राष्ट्रवादीच्या बाबतीतही त्यांनी असाच निकाल दिला. हा निकाल न पटल्याने तो पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या दरबारी गेला.


यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या दोन्ही प्रकरणांवर एकाच दिवशी सुनावणी करु, असं म्हटलं होतं. त्यानुसार आज सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टात नेमकं काय घडलं, याची माहिती ॲड. सिद्धार्थ शिंदे (Sidharth Shinde) यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की शिवसेनेची कागदपत्रं पूर्ण आहेत पुढील सुनावणी वेळी आम्ही थेट युक्तिवाद ऐकून घेऊ. त्यासाठीची तारीख आम्ही लवकरच देऊ.


यावेळी कोर्टरुममध्ये मुख्य न्यायाधीश चंद्रचूड ठाकरे गटाच्या एका वकिलांवर भडकले.ठाकरे गटाच्या वतीने एका वकिलाने कोर्टाला म्हटलं की, या प्रकरणाला विलंब होतो आहे. तुम्ही लवकरात लवकर तारीख द्या. त्यावर चंद्रचूड म्हणाले की, तुम्ही आमच्या इथे येऊन बसा आणि तुम्हीच ठरवा. आम्ही एक-दोन आठवड्यात तारीख देऊ.


दरम्यान, अजित पवारांसह त्यांच्यासोबत गेलेल्या ४१ आमदारांना सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावली होती. याप्रकरणी अजित पवारांनी कोर्टाकडे वेळ वाढवून मागितला आहे. त्यांच्या विनंतीनुसार सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांना तीन आठवड्यांचा वेळ दिला आहे.

Comments
Add Comment

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर