शेख हसीना पुढील ४८ तासांत सोडणार भारत! अमेरिकेने रद्द केला व्हिसा, कोणत्या देशात जाणार शरण

नवी दिल्ली: बांगलादेशमधील हिंसाचारानंतर आपला देश सोडून भारतात आलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना पुढील ४८ तासांत युरोपला जाऊ शकतात. दरम्यान, युरोपातील कोणत्या देशात जाणार याबाबतची माहिती समोर आलेली नाही. याआधी त्या लंडनमध्ये जाणार असे बोलले जात होते. मात्र ब्रिटनने त्यांना देशात येण्याची परवानगी दिली नाही तर अमेरिकेने त्यांचा व्हिसाही रद्द केला आहे.


दरम्यान, त्या सध्या उत्तर प्रदेशातील गाझियाबाद स्थित हिंडन एअरबेसच्या एका सेफ हाऊसमध्ये आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार शेख हसीना युरोपातील कोणत्याही देशात जाऊ शकतात. सोबतच इतर देशांशीही चर्चा सुरू आहेत. चर्चा अशीही होत आहे की त्या रशियालाही शरण जाऊ शकतात.


यासोबतच हे ही म्हटले जात आहे की शेख हसीना यांना भारत पूर्णपणे सुरक्षा देईल आणि त्यांच्या जाण्याची व्यवस्थाही करेल. यामागचे कारण आहे की जे विमान शेख हसीना यांना भारतात सोडण्यास आले होते ते बांगलादेशच्या वायुसेनेचे होते आणि ते परतले आहे. अशातच आता त्या ज्या देशात जातील त्यांच्या जाण्याची व्यवस्था भारत करेल.



फिनलँड की रशिया? कुठे जाणार शेख हसीना


शेख हसीना यांच्या सुरक्षित बाहेर पडण्याची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवारी संध्याकाळी भारतात पोहोचलेल्या हसीना फिनलँड आणि रशिया यांसारख्या देशांशी चर्चा करत आहेत.भारत त्यांच्या पुढील परदेशी प्रवासासाठी त्यांच्या सुरक्षेचीही व्यवस्था करेल. याआधी त्यांनी लंडन जाण्याचा निर्णय घेतला होता.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने