शेख हसीना पुढील ४८ तासांत सोडणार भारत! अमेरिकेने रद्द केला व्हिसा, कोणत्या देशात जाणार शरण

  761

नवी दिल्ली: बांगलादेशमधील हिंसाचारानंतर आपला देश सोडून भारतात आलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना पुढील ४८ तासांत युरोपला जाऊ शकतात. दरम्यान, युरोपातील कोणत्या देशात जाणार याबाबतची माहिती समोर आलेली नाही. याआधी त्या लंडनमध्ये जाणार असे बोलले जात होते. मात्र ब्रिटनने त्यांना देशात येण्याची परवानगी दिली नाही तर अमेरिकेने त्यांचा व्हिसाही रद्द केला आहे.


दरम्यान, त्या सध्या उत्तर प्रदेशातील गाझियाबाद स्थित हिंडन एअरबेसच्या एका सेफ हाऊसमध्ये आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार शेख हसीना युरोपातील कोणत्याही देशात जाऊ शकतात. सोबतच इतर देशांशीही चर्चा सुरू आहेत. चर्चा अशीही होत आहे की त्या रशियालाही शरण जाऊ शकतात.


यासोबतच हे ही म्हटले जात आहे की शेख हसीना यांना भारत पूर्णपणे सुरक्षा देईल आणि त्यांच्या जाण्याची व्यवस्थाही करेल. यामागचे कारण आहे की जे विमान शेख हसीना यांना भारतात सोडण्यास आले होते ते बांगलादेशच्या वायुसेनेचे होते आणि ते परतले आहे. अशातच आता त्या ज्या देशात जातील त्यांच्या जाण्याची व्यवस्था भारत करेल.



फिनलँड की रशिया? कुठे जाणार शेख हसीना


शेख हसीना यांच्या सुरक्षित बाहेर पडण्याची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवारी संध्याकाळी भारतात पोहोचलेल्या हसीना फिनलँड आणि रशिया यांसारख्या देशांशी चर्चा करत आहेत.भारत त्यांच्या पुढील परदेशी प्रवासासाठी त्यांच्या सुरक्षेचीही व्यवस्था करेल. याआधी त्यांनी लंडन जाण्याचा निर्णय घेतला होता.

Comments
Add Comment

भारत, विंडीज-आफ्रिकेसोबत कसोटी मालिका खेळणार

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार सामने नवी दिल्ली : भारताने इंग्लंडसोबत पाच कसोटी सामन्यांची मालिका बरोबरीत

नोवाक जोकोविचची ‘सिनसिनाटी ओपन’मधून माघार

नवी दिल्ली : ग्रँडस्लॅम विजेता नोवाक जोकोविचला आगामी यूएस ओपनपूर्वी आणखी एक धक्का बसला आहे. त्याने सिनसिनाटी

Amit Shah: अमित शहांनी लालकृष्ण अडवाणींचा विक्रम मोडला! भूषविले सर्वाधिक काळ गृहमंत्रीपद

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावे एक विक्रम प्रस्थापित झाला आहे. सर्वाधिक काळ देशाचे

DRDO गेस्ट हाऊसच्या मॅनेजरला हेरगिरी प्रकरणात अटक

नवी दिल्ली: ज्योती मल्होत्रानंतर भारतातील गुप्तचर यंत्रणानी आणखी एका हेराला अटक केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर

Uttarkashi Cloud burst: उत्तरकाशीच्या धारलीमध्ये ढगफुटी, डोंगरावरून वाहत आले हजारो टन पाणी, चार जणांचा मृत्यू, अनेक लोक ढिगाऱ्यात गाडले, पहा VIDEO

उत्तरकाशी: उत्तरकाशीमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे सर्वत्र हाहाकार पसरला आहे. येथील धारली गावात आलेल्या

माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन

नवी दिल्ली: जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे मंगळवारी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात