शेख हसीना पुढील ४८ तासांत सोडणार भारत! अमेरिकेने रद्द केला व्हिसा, कोणत्या देशात जाणार शरण

नवी दिल्ली: बांगलादेशमधील हिंसाचारानंतर आपला देश सोडून भारतात आलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना पुढील ४८ तासांत युरोपला जाऊ शकतात. दरम्यान, युरोपातील कोणत्या देशात जाणार याबाबतची माहिती समोर आलेली नाही. याआधी त्या लंडनमध्ये जाणार असे बोलले जात होते. मात्र ब्रिटनने त्यांना देशात येण्याची परवानगी दिली नाही तर अमेरिकेने त्यांचा व्हिसाही रद्द केला आहे.


दरम्यान, त्या सध्या उत्तर प्रदेशातील गाझियाबाद स्थित हिंडन एअरबेसच्या एका सेफ हाऊसमध्ये आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार शेख हसीना युरोपातील कोणत्याही देशात जाऊ शकतात. सोबतच इतर देशांशीही चर्चा सुरू आहेत. चर्चा अशीही होत आहे की त्या रशियालाही शरण जाऊ शकतात.


यासोबतच हे ही म्हटले जात आहे की शेख हसीना यांना भारत पूर्णपणे सुरक्षा देईल आणि त्यांच्या जाण्याची व्यवस्थाही करेल. यामागचे कारण आहे की जे विमान शेख हसीना यांना भारतात सोडण्यास आले होते ते बांगलादेशच्या वायुसेनेचे होते आणि ते परतले आहे. अशातच आता त्या ज्या देशात जातील त्यांच्या जाण्याची व्यवस्था भारत करेल.



फिनलँड की रशिया? कुठे जाणार शेख हसीना


शेख हसीना यांच्या सुरक्षित बाहेर पडण्याची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवारी संध्याकाळी भारतात पोहोचलेल्या हसीना फिनलँड आणि रशिया यांसारख्या देशांशी चर्चा करत आहेत.भारत त्यांच्या पुढील परदेशी प्रवासासाठी त्यांच्या सुरक्षेचीही व्यवस्था करेल. याआधी त्यांनी लंडन जाण्याचा निर्णय घेतला होता.

Comments
Add Comment

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या