Mhada Lottery : सर्वसामान्यांसाठी खूशखबर! म्हाडा मुंबईत काढणार २ हजारहून अधिक घरांची सोडत

जाणून घ्या कोणत्या भागात आहे घरांचा समावेश?


मुंबई : मुंबईत घराच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मुंबईत घर घेणे अशक्य होते. यासाठी सर्वसामान्य नागरिकांना सिडकोसह (Cidco) म्हाडाच्या (Mhada Lottery) घरांच्या लॉटरीची वाट पाहत असतात. त्यामुळे दरवर्षी म्हाडाकडून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घर मिळण्यासाठी विविध भागात घरे उपलब्ध करुन दिली जातात. गतवर्षीही म्हाडाने तब्बल ४ हजार घरांसाठी लॉटरी काढली होती. त्याचा उत्तम प्रतिसाद पाहता यंदाही म्हाडाने मुंबईत घरांसाठी लॉटरी काढली आहे. यंदा म्हाडा मुंबईतील विविध भागात २हजार ३० घरांची लॉटरी जारी करणार आहे. तर यामध्ये मध्यम गटासाठी सर्वाधिक घरे असणार आहेत.


म्हाडा मुंबई मंडळाकडून येत्या दोन दिवसांत लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तातडीने अर्जविक्री आणि स्वीकृतीला सुरुवात होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच मुंबई मंडळाची लॉटरी जाहीर होणार असल्यामुळे १३ सप्टेंबर रोजी घरं सोडतीची तारीख असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अर्जदारांना अर्ज दाखल करण्यासाठी केवळ एक महिन्याचा कालावधी मिळणार आहे.


दरम्यान, म्हाडाने यंदा गोरेगाव, पवई, विक्रोळी या भागातील घरांचा समावेश सोडतीत केला आहे. या घरांसाठी अर्जदार म्हाडाच्या वेबसाइटवर नोंदणी करू शकणार आहेत. त्यासाठी अर्जदारांना आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, शपथपत्र, जात प्रमाणपत्र आणि त्या प्रवर्गाचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे.

Comments
Add Comment

Cyprus and India : सायप्रस आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक संबंध दृढ

सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस 'इश्का' बॉलिवूड चित्रपटाचा थाटात मुहूर्त मुंबई :

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच